शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

निर्नायकी विद्रोह

By admin | Published: October 12, 2016 7:25 AM

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते

लोकशाहीमधील व्यवस्था कोणतीही असो, तिच्या विरोधात संघर्ष करणे वा अगदी विद्रोह आणि द्रोहदेखील करणे लोकशाही शासन व्यवस्था आपल्या नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्याचे जे अधिकार बहाल करते, त्यात एकप्रकारे अनुस्यूतच असते. पण अशा संघर्षाचा किंवा विद्रोहाचा कुणी नायक असावा लागतो आणि जेव्हां तो उपलब्ध असतो तेव्हां त्याच्याशी किंवा त्यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढणे सुलभ जात असते. सामान्यत: व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष तिच्यातील दोषांचे निर्मूलन व्हावे हाच असतो, किंवा असावा लागतो. पण जेव्हां विद्रोह निर्नायकी असतो तेव्हां कशी गंभीर आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण होते तिचा अनुभव संपूर्ण नाशिक जिल्ह्याने सलग दोन दिवस घेतला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव-अंजनेरी गावातील एका अजाण बालिकेवर झालेला शारीरिक अत्याचार सभ्य समाजाला लाज आणणारा होता यात वाद नाही आणि तो घडून गेल्यानंतर लोकांची तीव्र प्रतिक्रिया उमटणे हेदेखील अनैसर्गिक नाही. अशा जहाल प्रतिक्रियेचा रोख स्वाभाविकच शासन व्यवस्थेच्या विरोधातला असतो. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीचे ऐकूनच घ्यायचे नाही हेदेखील संतप्त जमावाच्या विशिष्ट मानसिकतेला धरुन असते असेही मान्य करता येईल. पण शनिवार रात्रीपासून ठिकठिकाणी ज्या विद्रोहाचे दर्शन घडत होते, तो शांत करण्यासाठी गेलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचे आणि केवळ तितकेच नव्हे तर विविध सामाजिक तसेच ज्ञाती संस्थांच्या नेत्यांचेही ऐकून घ्यायला जमाव तयार होत नव्हता. उलट त्यांच्यावरही आपला संताप व्यक्त करीत होता. असा निर्नायकी जमाव लोकशाहीसमोरील किती मोठा धोका ठरु शकतो, याचेच दर्शन त्यातून घडले. त्याची उकल करताना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जे शांततापूर्ण मोर्चे निघत आहेत त्यांना बदनाम करण्यासाठीच हे सारे कोणीतरी जाणीवपूर्वक करीत आहे, असे अनुमान काढणे हा फारच बाळबोधपणा झाला.