शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संपादकीय - शेअर बाजारात कमाई केली ना? - आता जरा थांबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 06:11 IST

गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण ‘जानकारी’ नसेल त्यांनी सध्या बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

केतन गोरानिया

कोविडनंतरच्या काळात भारतीय शेअर बाजारात नवे गुंतवणूकदार उतरले. बाजाराच्या इतिहासात गेल्या ३० वर्षांत हे असे प्रथमच घडले. मार्च २०२०पासून २२ महिन्यांत निर्देशांक दुपटीहून अधिक वर गेला. त्यात घसरण १० टक्केही झाली नाही. गेल्या दोन वर्षात प्रत्येक घसरणीत खरेदी करणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळाला. यापुढेही ते असेच कमाई करतील की हात पोळून घेतील? जगातल्या सर्व बाजारांना २००९पासून मध्यवर्ती बँकांनी पोसले. अर्थव्यवस्थेत बक्कळ पैसा ओतल्याने शेअर बाजारात तेजी राहिली. कोविडमुळे जागतिक कर्ज वाढले. २२६ ट्रीलियन डॉलर्सपर्यंत  गेले. जागतिक कर्जाचे जी. डी. पी.च्या तुलनेत प्रमाण २००८ साली २८० टक्के होते, ते ३५६ टक्क्यांवर गेले. भारतात हे प्रमाण २००८ साली ७२.८ टक्के होते, ते आता ८८.८ टक्के झाले. 

जगभर चलनवाढ होते आहे. अमेरिकेत ४० वर्षांत प्रथमच ७ टक्के इतका हा दर वाढलाय. मध्यवर्ती बॅंका पतपुरवठा आवळतील, हे आता सगळीकडे स्पष्ट दिसते आहे. जास्त कर्ज आणि कमी व्याजदराच्या काळात जगाचे बरे चालले होते. परंतु, अधिक व्याजदर आणि चलनवाढीच्या काळात अनेक आव्हाने उभी राहतील. जी. डी. पी.च्या तुलनेत जास्त कर्जाच्या काळात व्याजदर वाढणे अर्थव्यवस्थांना जड जाईल. अडचणी उद्भवतील. विशेषत: रशिया-युक्रेन युद्ध लांबले तर चलनवाढ दबाव वाढेल. भारत मोठा आयातदार देश आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. भारतात चलनवाढ अटळ आहे. युद्ध लांबल्यास युरोप व अन्य जगाला होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होऊन जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. 

- हे सारे लक्षात घेऊन सर्व देशांनी स्वत:ला वाचविण्यासाठी निर्यातीवर बंधने आणण्यासारखे उपाय योजायला सुरूवात केली आहे. खते, गहू, बी- बियाण्यांच्या किमती अतिशय वेगाने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या तेल किमतींचे समायोजन करणे भारत सरकारला कठीण जात आहे. चालू तसेच महसुली खात्यावरील तूट त्यातून मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. तेल बॅरलमागे १० डॉलरने वाढले की, चालू खात्यावरील तूट ५ टक्के वाढते. भौगोलिक राजकीय संघर्षामुळे भारताच्या निर्यातीवरही परिणाम होणार आहे. जगात व्याज दर वाढत गेले तर विदेशी संस्थांची गुंतवणूक बाहेर जात राहील. जगभरात तांत्रिक समभाग घसरले तर भारताला स्टार्टअप्समध्ये पैसा खेचणे कठीण जाईल. या सगळ्यातून रुपया घसरून भारतापुढे आर्थिक कटकटी वाढतील.

सध्या २०२२ या आर्थिक वर्षातले नक्त देशांतर्गत उत्पन्न २३६.४४ लाख कोटी आणि बाजाराचे भांडवल २५२ लाख कोटी अपेक्षिण्यात आले आहे. यात जी. डी. पी.चे बाजार भांडवलाशी प्रमाण १.०६ निघते. जे ऐतिहासिक स्तरावर जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळण्याची शक्यता कमीच. १ जानेवारी २०२० ते १२ मार्च २०२२ या काळात विदेशी संस्थांनी तब्बल १३ हजार कोटींची विक्री करूनही भारतीय शेअर बाजाराने चांगली कामगिरी केली. भारतातील खराब अर्थस्थिती आणि इतर ठिकाणी वाढते व्याजदर यामुळे विदेशी संस्था विक्री चालू ठेवतील. अल्प मुदतीच्या परताव्यावर याचा नक्कीच परिणाम संभवतो. खूप मोठ्या संख्येने नव्याने आलेल्या गुंतवणूकदारांनी मंदीच्या विळख्यातला बाजार किंवा मोठी घसरण पाहिलेली नाही. त्यांनी सावध राहिले पाहिजे. कमी परतावा असला तरी काही वर्षे गुंतवणूक राखण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. बाजार मोठी घसरण दाखवू शकतो किंवा दीर्घकाळ मंदीत राहू शकतो. नव्या गुंतवणूकदारांनी गेल्या दोन वर्षात सहज पैसा कमावला. पण त्यांच्याकडे पृथक्करणाचे कौशल्य, शिस्त नाही. त्यांनी एकतर बाजारापासून दूर राहावे किंवा गुंतवणूक सल्लागारांची मदत घ्यावी हे बरे.

(लेखक गुंतवणूक सल्लागार आहेत)

टॅग्स :share marketशेअर बाजारbusinessव्यवसाय