शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

काठावरचा शहाणा

By admin | Published: September 06, 2015 9:29 PM

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो

जो प्रत्यक्ष पाण्यात उतरून हातपाय मारण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याच्यापेक्षा काठावर उभे राहून पाण्यात पडलेल्यास अक्कल शिकवीत राहतो, तो म्हणे शहाणा समजला जातो. असे शहाणपण तूर्तास राज ठाकरे यांनी पत्करलेले दिसते. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी दुष्काळाचे ‘पर्यटन’ थांबवून पीडितांना तत्काळ मदत पुरवावी, दौरे करायची काय गरज, असा सवाल त्यांनी केला आहे. नाशकातील सिंहस्थाच्या निमित्ताने ठाकरे साधुग्रामात गेले होते आणि त्यांना बघून एका दाढीधारी संधिसाधूला अगदी भरून आले होते! मुळात राज यांना तरी या सिंहस्थ पर्यटनाची गरज काय असा सवाल कुणीही विचारू शकतो. पण ठाकऱ्यांना सवाल पुसायचे नसतात. तो मक्ता पूर्णपणे त्यांचा. दुष्काळ वा तत्सम संकटे येतात तेव्हा राज्यकर्त्यांनी तिथे जाणे आणि समवेदना प्रकट करणे हा भले एक रिवाजाचा भाग बनला असला तरी तो उभयपक्षी आवश्यक मानला जातो. आपत्तीची साधी चौकशी करण्याचीदेखील गरज सरकारला भासू नये असा प्रश्न उपस्थित करून सरकारला बदडून काढले जाते. ते टळावे म्हणून आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी परिस्थिती पाहून तिचा नेमका अंदाज यावा म्हणूनही राज्यकर्ते दौरे काढीत असतात. त्याचबरोबर जे आपद्ग्रस्त असतात, त्यांनाही मनोमन कुणीतरी (म्हणजे सरकारने) येऊन आस्थेवाईकपणे आपली चौकशी करावी असे वाटत असते. आपत्ती दुष्काळाची असो की अतिवृष्टीची, लोकांच्या सरकारकडूनच्या अपेक्षा अफाट असतात व त्यांना विराट स्वरूप देण्याचे काम विरोधकच करीत असतात. आपल्या साऱ्या मागण्या मान्य केल्या जाणार नाहीत, हे संबंधितांनाही चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे कुणीतरी आपल्या पाठीशी आहे ही सद्भावनादेखील बऱ्याचदा पुरेशी ठरत असते. त्यासाठीच आवश्यक ठरणाऱ्या दौऱ्यांना कोणत्या शब्दाने संबोधायचे हे ज्याच्या त्याच्या संस्कृतीवर अवलंबून असते.