शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

साखरेच्या निधीची बांधणी! कर्जाद्वारे पैसा मिळतो, ताे परत केला जात नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 8:37 AM

मुळात साखर उद्याेगातूनच उभारण्यात आलेला हा निधी आहे. ताे व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा दाेन टक्के कमी व्याज आकारून साखर कारखान्यांनाच देण्यात येतो.

साखर विकास निधीतून देण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याची पुनर्बांधणी करण्याची याेजना केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने जाहीर केली आहे. साखर उद्याेगातून उभ्या करण्यात आलेल्या ऊस विकास निधीतून साखर कारखान्यांना कर्ज दिलेले आहे. केंद्र सरकारने १९८२ मध्ये ऊस विकास कायदा केला. त्याची अंमलबजावणी १९८३ मध्ये तयार केलेल्या नियमावलीद्वारे सुरू झाली. केंद्र सरकार साखरेच्या प्रतिक्विंटलमागे ९५ रुपये अधिभार तेव्हापासून वसूल करते. यापैकी २४ रुपये सेस म्हणून जमा केलेली रक्कम ऊस विकास निधीत जमा केली जाते. उर्वरित प्रतिक्विंटल ७१ रुपये सरकारच्या तिजाेरीत अबकारी कर म्हणून जमा हाेतात. ऊस विकास निधीतून आजवर ११ हजार ३३९ काेटी रुपये जमा झाले. ही रक्कम नव्या साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी, आधुनिकीकरण, विस्तारीकरण, इथेनाॅल प्रकल्प उभारण्यासाठी तसेच ऊस विकासासाठी कर्ज रुपाने दिली जाते.

सहकार तसेच खासगी क्षेत्रातील १७९ साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जापैकी १३०८ काेटी रुपये मुद्दल आणि ११८१ काेटी रुपये व्याज परत केलेले नाही. हप्ते थकल्याने ७९७ काेटी रुपयांची येणे बाकी थकीत आहे. एकूण ३२८६ काेटी रुपये कर्ज आणि व्याज रुपाने या साखर कारखान्यांकडे थकीत आहेत. साखर उद्याेगाला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने या कर्जाच्या परतफेडीची पुनर्बांधणी करण्यासाठी याेजना आखली आहे. सार्वत्रिक निवडणुका समाेर आल्या की, सरकार अशा प्रकारच्या अनेक याेजना तयार करते. त्यापैकीच ही सुद्धा एक याेजना आहे. मुळात साखर उद्याेगातूनच उभारण्यात आलेला हा निधी आहे. ताे व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा दाेन टक्के कमी व्याज आकारून साखर कारखान्यांनाच देण्यात येतो. असा निधी वापरणारे साखर कारखाने त्याचा याेग्य प्रकारे वापर करतात की नाही, याचे नियमन केले जात नाही. परिणामी काही कारखाने आर्थिक गैरव्यवहारात आघाडीवर आहेत. त्या साखर कारखान्यांनाही हा निधी कर्ज रुपाने दिला जाताे. ताे परत केला जात नाही. अशा गैरवापर करणाऱ्यांना बेड्या ठाेकल्याचे काेठे ऐकिवात नाही. कारण केंद्र सरकारही बेफिकीर राहते. किमान ऐंशी टक्के पैसा परत येताे. नव्या कर्जांची पुनर्बांधणी करून दिली जाते. त्यातून आवश्यक निधी पुन्हा उभा राहताे. ऊस विकास निधीमध्ये पैसा नाही, असे कधी हाेत नाही. दरवर्षी गाळप हंगामानुसार निधी येतच राहताे. निधी असल्याने त्याचे मूल्य काेणालाच नाही.

वास्तविक सहकारी साखर उद्याेगाला अडचणीच्या काळात किंवा नव्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्याचा हा चांगला मार्ग आहे. त्यावर व्याजदरही कमी असल्याने साखर कारखान्यांना दिलासाही मिळताे. साखर उद्याेगात दर तीन-चार वर्षांत चढ-उतार येतात. अशा परिस्थितीत मदत करणारा हा निधी आवश्यक असताे. अलीकडच्या काळात उसाची एफआरपी वाढविताना साखरेच्या दरातील चढ-उताराचा विचार केला जात नाही. तसेच साखर उत्पादनाचा खर्च वाढल्याने साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक गैरव्यवहारात अडकणारे व्यवस्थापन असेल तर त्या साखर कारखान्यांना काेणतीही याेजना दिली तरी ते साखर कारखाने संकटातून बाहेर येत नाहीत.

महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना आपला कारभार गुंडाळावा लागला. अनेक साखर कारखाने चालविण्यास देण्यात आले. काही सहकारी साखर कारखाने कवडीमाेल किमतीत राजकीय नेत्यांनीच कंपन्या स्थापन करून त्यांच्या नावाने खरेदी करून टाकले. हा सर्व प्रकारचा व्यवहार गैर वाटत असताना सरकार त्यावर कारवाई करीत नाही. पाेलिस आणि चाेर एकत्र बसून वाटून घेतात अशीच भावना शेतकऱ्यांची झाली असेल तर आश्चर्य वाटायला नकाे. काँग्रेसने अनेक वर्षे ग्रामीण विकासाच्या नावाने सहकारी कारखानदारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, डाेळेझाक केली; मात्र त्यामुळे डाेळ्यात धूळफेक करणाऱ्यांची गर्दी वाढत गेली. सरकार बदलून भाजपचे सरकार आले. साखर कारखान्यांच्या संदर्भात धूळफेक करणाऱ्यांनी कायमच गर्दी केली आहे. अशांनाच कर्ज वसुलीच्या सवलती देण्याच्या याेजना आखून त्यांच्या चाेऱ्यांवर पांघरून घातले जाते आहे. ऊस विकास निधीचा गैरवापर करणाऱ्यांना आता पुनर्बांधणी याेजनेतून सवलत देऊ नये. काेठेतरी थांबायला शिकले पाहिजे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने