शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 07:41 IST

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे.

भारतीय न्याय व्यवस्थेला न्यायाप्रतीच्या कटिबद्धतेची प्रदीर्घ परंपरा आहे; परंतु दुर्दैवाने न्याय व्यवस्थाच प्रलंबित खटल्यांच्या चक्रव्यूहात अडकून पडली आहे. तो तोडण्यासाठी जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयांची संकल्पना पुढे आली; पण त्यांचाच अभिमन्यू झाला आहे. विधि आणि न्याय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात कार्यरत ८६० जलदगती न्यायालयांमध्ये तब्बल १४ लाख ७५ हजार ६८५ खटले तुंबले आहेत. त्यापैकी १०.८२ लाख एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत, तर त्या खालोखाल सुमारे १.७५ लाख महाराष्ट्रातील आहेत. 

गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रातील जलदगती न्यायालयांची संख्याही घटली आहे. कमीअधिक फरकाने संपूर्ण देशात हेच चित्र आहे. गंभीर गुन्हे, महिला व बालकांविरुद्धचे अत्याचार आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या नागरी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना झाली होती. प्रत्यक्षात मात्र जलदगती न्यायालयांमध्येच खटले तुंबणे सुरू झाले आणि बघता बघता या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले. 

जलदगती न्यायालय संकल्पनेच्या या दुर्दशेसाठी कारणीभूत आहे नियमित निधी आणि आवश्यक यंत्रणांचा अभाव! केंद्र सरकारने विशेष जलदगती न्यायालयांसाठी ‘निर्भया फंड’ अंतर्गत निधी दिला असला, तरी जलदगती न्यायालयांसाठी मात्र केंद्राकडून थेट आर्थिक मदत दिली जात नाही. न्याय हा राज्यांचा विषय असल्याचे सांगत, केंद्र सरकार राज्यांवर जबाबदारी ढकलते आणि राज्यांच्या प्राथमिकता वेगळ्या असल्याने ‘न्याय’ हा विषय मागे पडतो. 

चौदाव्या वित्त आयोगाने १,८०० जलदगती न्यायालयांची निर्मिती करण्याची शिफारस केली होती; परंतु सद्य:स्थितीत केवळ ८६० न्यायालयेच कार्यरत असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट दाखवते, की दृष्टी असूनही इच्छाशक्ती कमी पडली! ही केवळ जलदगती न्यायालय संकल्पनेची दुर्दशा नाही, तर हजारो पीडितांची वेदना आहे. 

लैंगिक अत्याचारग्रस्त महिला, बाल पीडित, संपत्तीच्या वादात अडकलेले कुटुंबीय यांना न्यायासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. यामुळे केवळ न्यायालयांवरील विश्वासच कमी होत नाही, तर कायद्याचा वचक कमी होण्याचीही भीती असते. त्याशिवाय, पीडित व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण, निर्दोष व्यक्तींची बदनामी व कोठडीतील शारीरिक-मानसिक छळ, व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याने गुंड, दलालांसारख्या घटकांना मिळणारे अनावश्यक महत्त्व, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ, असे बरेच अदृश्य, पण गंभीर दुष्परिणाम आहेत. खटले तुंबू नयेत, न्याय लवकर मिळावा, या हेतूने अस्तित्वात आलेल्या जलदगती न्यायालयांची जर ही अवस्था असेल, तर नियमित न्यायालयांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच केलेली बरी! 

न्यायालयांपेक्षाही गंभीर अवस्था अर्ध-न्यायिक संस्थांची आहे. एकट्या महाराष्ट्र प्रशासन न्यायाधिकरण म्हणजेच ‘मॅट’मध्ये हजारो प्रकरणे वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्ती वेतनाशी संबंधित प्रकरणे असतात. त्यामुळे आयुष्यभराची घामाची कमाई उतरत्या वयात गरज असताना हाती येत नाही, अशी अनेक वयोवृद्धांची अवस्था झाली आहे. 

अशा अर्ध न्यायिक संस्थांमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीशांची वर्णी लावली जाते. त्यांना सेवानिवृत्तीनंतरही घसघशीत आर्थिक प्राप्ती होत असते; पण गरजू सेवानिवृत्त मंडळींसाठी मात्र आवश्यक ती संवेदनशीलता दाखवली जात नाही. सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवायचा असल्यास, ही परिस्थिती बदलण्याची आत्यंतिक निकड आहे. 

न्याय ही राष्ट्रीय प्राथमिकता असल्याचे लक्षात घेऊन केंद्राने स्वतंत्र निधी तयार करून त्यातून राज्यांना मदत दिली पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय व्यवस्थेला गती देण्याचा विचार व्हायला हवा. न्याय व्यवस्थेत पदे रिक्त राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. सोबतच न्यायालयांची संख्या वाढवली पाहिजे. न्यायालये दोन पाळीत चालविण्याच्या काही राज्यांच्या प्रयोगाची आवश्यक त्या सुधारणांसह देशभर अंमलबजावणी करण्याचा विचार व्हायला हवा. 

जलदगती न्यायालयांची बिकट अवस्था हा भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक मोठा इशारा आहे. वेळेत न्याय ही लोकशाहीची मूलभूत गरज आहे. योग्य धोरणे, निधी आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे आज जलद न्याय ही संकल्पना फक्त नावापुरती उरली आहे. आता तरी राज्यकर्ते आणि न्याय व्यवस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे; कारण ‘तारीख पे तारीख’च्या वाटेने हाती पडणारा उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार