शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

संपादकीय: स्वतंत्र.. आणि स्वायत्तच! चार पंतप्रधान तरी, असा निवडणूक आयुक्त एकदाच लाभला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 08:01 IST

त्यांच्या काळात झालेल्या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीची उदाहरणे आजही दिली जातात. त्यानंतर अन्य कुणी आयुक्त तितके नि:स्पृह, निष्पक्ष व कर्तव्यकठोर वागले नाहीत.

केंद्रीय अन्वेषण विभागाचे महासंचालक व लोकपालांप्रमाणेच निवडणूक आयुक्तही पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, ते नसल्यास सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार नेमले जावेत, अशा आशयाचा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी दिलेला निकाल ऐतिहासिक आहे. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य व स्वायत्तता अबाधित राहावी, यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त तसेच अन्य दोन आयुक्तांची नेमणूक अधिक लोकशाही मार्गाने होण्याच्या दिशेने तसेच या घटनात्मक संस्थेची विश्वासार्हता वाढविण्याच्या दिशेने टाकलेले ते एक मोठे पाऊल आहे.

न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या नेतृत्वातील न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. ऋषिकेश रॉय व न्या. सी. टी. रवीकुमार यांचा समावेश असलेल्या घटनापीठाच्या या निकालाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र सचिवालय, नियम बनविण्याचे व्यापक अधिकार, स्वतंत्र निधी आणि संसदेतील महाभियोगापासून सुरक्षेचे कवच मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. लोकशाही मूल्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने हा निकाल मैलाचा दगड ठरेल. या निकालाला जागतिक परिप्रेक्ष्यही आहे. जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारतावर, लोकप्रतिनिधींवर, त्यांना निवडून देण्याच्या व्यवस्थेवर मोठी जबाबदारी आहे. लोकशाहीत मतदारांच्या मताचे मूल्य सर्वांत महत्त्वाचे. अशावेळी मतदानकेंद्रे ताब्यात घेणारे बाहुबली, मतदान यंत्रांशी छेडछाड करणाऱ्या प्रवृत्ती, गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी किंवा धनदांडगे यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया वेठीस धरली जात असेल तर ते रोखणे हे निवडणूक आयोगाचे आद्यकर्तव्य आहे. बहुतेकवेळा निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्तांकडून ते पार पाडण्याचा प्रयत्न होतोही. तब्बल सहा वर्षे, तेही चार पंतप्रधानांच्या कारकिर्दीत मुख्य निवडणूक आयुक्त हे पद सांभाळणारे टी.एन. शेषन यांच्या रूपाने तर आयोगाची जबरदस्त जरब निर्माण झाली होती. त्यांच्या काळात झालेल्या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीची उदाहरणे आजही दिली जातात. त्यानंतर अन्य कुणी आयुक्त तितके नि:स्पृह, निष्पक्ष व कर्तव्यकठोर वागले नाहीत.

वर उल्लेख केलेल्या या बाबींपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुख्य किंवा इतर निवडणूक आयुक्त पदावर बसलेल्या व्यक्तींच्या निष्पक्षतेचा. सध्या पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार या नियुक्त्या राष्ट्रपती करतात. परिणामी, ज्यांच्या शिफारशींमुळे आपण पदावर गेलो त्यांना न दुखावण्याचा, त्यांच्या कलाने निर्णय घेण्याचा प्रयत्न शेषन यांच्यासारखे अपवाद वगळता बहुतेक सगळे अधिकारी करतात. त्यात सत्ताधाऱ्यांच्या सोयीने निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवेळी सांभाळून घेतले जाते, पक्षांच्या मान्यता व फुटीचे निर्णय सत्ताधाऱ्यांना अनुकूल घेतले जातात, असे आक्षेप स्वायत्त म्हणविल्या जाणाऱ्या आयोगाबद्दल घेतले गेले. महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष व चिन्हाचा ताजा निकाल याच मुद्द्यांवर चर्चेत आहे. आता इतर याचिकांसोबतच निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचे प्रकरण घटनापीठापुढे जाण्यासाठीही आयुक्त पदावरील एक नियुक्तीच कारणीभूत ठरली.

गुजरात व हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील अरुण गोयल यांना केंद्र सरकारच्या सेवेतून वायुगतीने, अवघ्या २४ तासांत निवडणूक आयुक्तपदी नेमले गेले. त्यांच्यासोबत ज्या चौघांची नावे विचारार्थ होती, त्यात सहा वर्षांचा कार्यकाळ मिळू शकणार नाही असेही होते. सरकारने नाव निश्चित करताच डिसेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या गोयलांनी १८ नोव्हेंबरला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिला. तो लगोलग मंजूर झाला. १९ला त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. २१ तारखेला ते अनुपचंद्र पांडेय यांच्यासोबतचे दुसरे निवडणूक आयुक्त म्हणून रुजूही झाले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या निवृत्तीनंतर सेवाज्येष्ठतेनुसार ते २०२५च्या फेब्रुवारीत मुख्य निवडणूक आयुक्त बनतील. या वायुवेगाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्तींसाठी वापरल्या जाणाऱ्या कॉलेजियमसारखी व्यवस्था असावी, अशी मागणी झाली. मुळात कॉलेजियम पद्धतीवरून सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सरकार असा वाद सुरू असताना न्यायालयाने निवडणूक आयोगासंदर्भात मोठा निकाल दिला आहे. तेव्हा, या निकालावर सरकारची प्रतिक्रिया काय असेल, निकालाची अंमलबजावणी कशी होईल, हे पाहणे रंजक असेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग