शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

अग्रलेख : हेच मुंबईच्या नशिबी! हेच विदारक सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 7:51 AM

दिवसाची सुरुवातच ज्या शहराची महापालिका अशा खोटेपणाने करीत असेल तिथे शहर स्वच्छ, सुंदर राहावे अशी अपेक्षा तरी कशी करायची?

मुंबईत २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडला तरी मुंबई ठप्प होते. लोकल बंद पडतात. भरतीच्या वेळी पाऊस वाढला तर आणखी बेहाल होतात. तेवढ्यापुरत्या बातम्या, फोटो छापून येतात. माध्यमांमध्ये चर्चा होते. काही उत्साही तरुण सोशल मीडियासाठी रील्स बनवतात. मुंबई, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय..? अशी गाणीही लिहिली जातात. पाऊस थांबला की पुन्हा मुंबईकर आपल्या पोटापाण्याच्या कामाला लागतो. वर्षानुवर्षे हेच होत आले आहे. वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर पुढची काही वर्षेही असेच चित्र पाहायला मिळेल. कोणालाही या समस्येच्या मुळाशी जाण्याची इच्छा नाही. मुंबईकर अधिकाऱ्यांना नावे ठेवतात. अधिकारी नेत्यांकडे बोट दाखवतात. नेते आपत्कालीन कक्षात लावलेल्या स्क्रीनकडे बोट दाखवतात. यातून ना प्रश्न सुटतात, ना मुंबईकरांचे हाल थांबतात. 

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची घोषणा झाली. त्याला आता १९ वर्षे झाली. अजूनही हा प्रकल्प पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. मात्र, एवढ्या वर्षांत मुंबईच्या जलनिस्सारण आणि मलनिस्सारणाचे प्रश्न अकराळ-विकराळ झाले आहेत. याच ब्रिमस्टोवॅडचा एक भाग म्हणून मुंबईत चार होल्डिंग पॉन्ड तयार करण्याचे नियोजन होते. त्यापैकी दोन बांधून झाले. समुद्रात भरती असताना मोठा पाऊस आला तर पाण्याचा निचरा होत नाही. अशावेळी या होल्डिंग पॉन्डमध्ये पाणी साचवायचे आणि नंतर ते ओहोटीच्या काळात बाहेर काढायचे. अशी यामागची कल्पना. एका पॉन्डमध्ये तीन कोटी लिटर पाणी जमा होते. यापैकी फक्त दोन होल्डिंग पॉन्ड तयार झाले. बाकीचे दोन तयार व्हायला आणखी दोन वर्षे लागतील. 

ॲमस्टरडॅमसारख्या समुद्रकिनारा असलेल्या शहरात वाहून जाणारे पाणी नियंत्रित करण्यासाठी समुद्राच्या तोंडाशी फ्लड गेट्स उभे केले आहेत. शेजारच्या नवी मुंबईतही असे गेट आहेत. आशिया खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेला मात्र असे फ्लड गेट्स उभे करायला आणखी तीन वर्षे लागतील. सध्या काही पाइपलाइनद्वारे अख्ख्या मुंबईचे घाण पाणी समुद्रात सोडले जाते. मुंबईतल्या मिठी, दहिसर, पोईसर व वालभट अशा नद्यांचे पात्र दिवसेंदिवस संकुचित झाले. लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केली. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठीची नैसर्गिक यंत्रणा अतिक्रमण करणाऱ्यांनी, त्याला अभय देणाऱ्या नेत्यांनी आणि त्यावरून मतपेटीचे राजकारण करणाऱ्यांनी पूर्णपणे मोडून टाकली. मिठी नदीचा आता मोठा नाला झाला आहे. लोकल रेल्वेच्या मार्गात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग असतात. रेल्वे प्रशासन पालिकेकडे आणि महापालिका रेल्वेकडे बोट दाखवून मोकळे होतात. मात्र, मोठा पाऊस आला की हाच कचरा अख्खी लोकल बंद पाडतो. कोट्यवधी रुपये रेल्वे सेवेतून कमावणाऱ्या रेल्वे प्रशासनाला हा कचरा उचलावा असे कधी वाटत नाही. 

परदेशात जाणारे महाराष्ट्रातले नागरिक तिथल्या रस्त्यावर कुठेही पान खाऊन थुंकत नाहीत. जमा झालेला कचरा खिशात ठेवून हॉटेलमधल्या डस्टबिनमध्ये टाकतात. महाराष्ट्रात आल्यावर त्यांना काय होते माहिती नाही. इथे सरकारी जमीन आपल्या ‘बा’ची अशा थाटात अनेक लोक वाटेल तिथे पिचकारी मारतात. दिसेल तेथे कचरा टाकतात. हे कमी की काय म्हणून, आजही रेल्वे ट्रॅकवर सकाळी प्रातःविधीलाही बसतात. कोणतेही शहर स्वच्छ, सुंदर राहावे ही सरकारची, प्रशासनाची तेवढीच तिथे राहणाऱ्या नागरिकांचीदेखील जबाबदारी आहे. इथे अशी जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नाही. प्रत्येकाला मालकी हक्क मात्र गाजवायचा आहे. विकासकामांच्या नावाखाली अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. एक किलोमीटरचा सलग रस्ता बिनाखड्ड्यांचा दिसत नाही. महापालिका ओला आणि सुका कचरा वेगळा करा म्हणून सांगते. नेताना मात्र दोन्ही प्रकारचा कचरा एकाच गाडीत भरून नेते. दिवसाची सुरुवातच ज्या शहराची महापालिका अशा खोटेपणाने करीत असेल तिथे शहर स्वच्छ, सुंदर राहावे अशी अपेक्षा तरी कशी करायची? स्वच्छ महानगरांच्या स्पर्धेत मुंबईचा १८९ वा नंबर लागला ही गोष्ट भूषणाची मानायची का, हा ज्याचा त्याचा प्रश्न..! तोपर्यंत मुंबईत पाणी तुंबत राहील. लोक त्रस्त होतील. चरफडत, शिव्या-शाप देत, निमूट माना खाली घालून कामाला जातील. हेच विदारक सत्य आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईRainपाऊसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार