शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

कृषी कायदे परत येणार? मोदी सरकार नेमकं काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 5:51 AM

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का?

उत्तर प्रदेश व पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शेतकरी आंदोलनाकडे लक्ष असलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडला, की आंदोलनाने निकाल फारसे बदलले नसल्याने मागे घेतलेले तीन कृषी कायदे केंद्र सरकार पुन्हा आणील का? त्यावर संयुक्त किसान मोर्चाचे नेते म्हणाले, की कुठल्याही सरकारला पुढच्या दाराने हे कायदे पुन्हा आणता येणार नाहीत. २०१५च्या भूमी अधिग्रहण कायद्यासारखे मागच्या दाराने मात्र हे होऊ शकेल. सरकारकडून अजून त्यावर काही बोलले गेलेले नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे सदस्य, शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे अनिल घनवट यांनी त्या चर्चेला तोंड फोडले आहे. समितीने न्यायालयात बंद लिफाफ्यात असलेला अहवाल घनवट यांनी फोडला असून, त्यांचा दावा आहे की, ८७ टक्के शेतकऱ्यांचा त्या कायद्यांना पाठिंबा होता व कायदे परत घेऊन सरकारने सुप्त बहुमताचा अनादर केला. घनवट यांचे म्हणणे असे, की कायदे रद्द झाल्यामुळे आता या अहवालाला काही किंमत नाही आणि सरकार पुन्हा कायदे आणील, असेही नाही. तरीदेखील शेतकऱ्यांचे कल्याण करणाऱ्या या कायद्यांवर देशभर चर्चा व्हावी म्हणून तो अहवाल जाहीर करीत आहोत.

सर्वोच्च न्यायालयाच्या बेअदबीची जोखीम स्वीकारून अहवाल फोडण्याचे घनवटांचे औधत्य ही मागच्या दाराने कायदे पुन्हा आणण्याची सुरुवात आहे का, सरकारचे प्रतिनिधी यात कधी उतरतात आणि कायदे पुन्हा आणा म्हणून सरकारवर कोण, कसा दबाव टाकते, हे आता बघावे लागेल. शेतमाल कुठेही विकायची परवानगी, करार शेती, तसेच जीवनावश्यक वस्तूंमधून अन्नधान्य, तेलबिया, कांदा वगैरे वगळण्याच्या या तीन कायद्यांवर गेली दीड वर्षे रणकंदन सुरू आहे. तरीदेखील काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. चर्चा, मसलत न करता कायदे का आणले, ते विधेयक घाईघाईने संमत का करण्यात आले, शेतकरी आंदोलन आधी अनुल्लेखाने मारण्याचा, नंतर ते चिरडण्याचा प्रयत्न का झाला, गंभीरपणे आंदोलकांशी चर्चा का केली नाही, दिल्लीलगतच्या सिंघू, टिकरी व गाझीपूर या सीमांवर मरण पावलेल्या सहाशे - सातशे शेतकऱ्यांना साधी श्रद्धांजलीही का वाहिली गेली नाही आणि महत्त्वाचे म्हणजे अचानक गेल्या १९ नोव्हेंबरला तिन्ही कायदे परत घेत असल्याची घोषणा पंतप्रधानांनी का केली? संसदेत ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह अनेकांनी हे कायदे पुन्हा आणण्याचा इरादा का बोलून दाखविला?
एका बाजुला हे प्रश्न आहेत, तर दुसऱ्या बाजुला घनवट सदस्य असलेल्या समितीची कार्यपद्धती आहे. कायद्यांच्या विरोधातील संघटना, शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चार सदस्यांच्या समितीमधून पंजाबचे भूपिंदरसिंग मान यांनी लगेच अंग काढून घेतले होते. अनिल घनवट, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी व आंतरराष्ट्रीय शेतमाल व्यापाराचे तज्ज्ञ प्रमोद कुमार जोशी हे उरलेले तिघेही स्पष्टपणे कायद्यांचे समर्थक असल्याने संयुक्त किसान मोर्चाने त्या समितीवर बहिष्कार जाहीर केला होता. समितीचे चर्चेचे निमंत्रणही मोर्चाने स्वीकारले नव्हते. परिणामी, आंदोलनात नसलेल्या, म्हणजेच कायद्याच्या बाजूने असलेल्या ७३ संघटनांशीच समितीने चर्चा केली. या संघटना देशातील तीन कोटी १८ लाख शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, असा शोध समितीने लावला आणि त्यापैकी बहुतांश शेतकरी कायद्यांच्या बाजूने असल्याचा निष्कर्ष काढला. तरीदेखील केवळ या अहवालाच्या आधारे पुन्हा कृषी कायदे आणणे, दिसते तितके सोपे नाही.
किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी हा त्यातील पहिला अडथळा आहे. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा आंदोलन पुकारले आहे. शेतीचा उत्पादन खर्च काढण्याची पद्धत हा दुसरा प्रमुख अडथळा आहे. कृषी मूल्य आयोगाची ‘ए-२’ म्हणजे केवळ बियाणे, खते, वीज, पाणी या निविष्ठा जमेस धरण्याची पद्धत कुणालाच मान्य नाही. त्याऐवजी ‘सी-२’ म्हणजे विहीर, पाईपलाईन वगैरे मूळ भांडवली खर्च, शेतजमिनीचे भाडे, शेतकरी कुटुंबाचे श्रम, आदींचा उत्पादन खर्च काढताना विचार व्हावा, अशी मागणी आहे. ते गृहीत धरल्यानंतर मग खरोखर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होते का बघा, असे या विषयाच्या अभ्यासकांचे मत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचा मुहूर्त यंदाचाच आहे. तेव्हा आधी उत्पन्न दुप्पट होते, की पाठिंब्याच्या पावसाने दडी मारल्यामुळे पहिली पेरणी वाया गेली म्हणून कायद्यांचीच दुबार पेरणी होते, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन