शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की कसाबच्या बाजूने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:31 IST

हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

‘दहशतवादाला धर्म नसतो. ती मनोवृत्ती नाहीशीच करायची असते’ हे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख कै. हेमंत करकरे या देशभक्ताचे उद्गार आहेत. आपली मुलगी जुई नवरे हिला त्यांनी ते ऐकविले आहेत. जुई आता अमेरिकेत राहते. ती दोन मुलांची आई आहे. ‘हेमंत करकरे मी दिलेल्या शापामुळे मरण पावले’ असे अभद्र उद्गार काढणाऱ्या प्रज्ञा ठाकूर या भाजपच्या भोपाळमधील उमेदवार बाईविषयी बोलताना जुई म्हणाली, ‘तिला किंवा तिच्या शापवाणीला मला प्रतिष्ठा मिळवून द्यायची नाही. मात्र दहशत हा माणुसकीविरोधी अपराध आहे. कोणत्याही धर्माचा माणूस वा स्त्री तो करू शकतो. देशाचे पोलीस व अन्य संरक्षक यंत्रणा यांनी या अपराधाचा बंदोबस्त केला पाहिजे,’ असेही ती एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी म्हणाली.

मालेगाव बॉम्बस्फोटात दोन डझन निरपराध माणसे मारली गेली. त्या स्फोटात प्रज्ञा ठाकूर ही पहिल्या क्रमांकाची आरोपी होती. तिला सगळ्या पुराव्यांनिशी करकरे यांनी पकडून गजाआड केले होते. त्या वेळी प्रज्ञाच्या नावामागे असलेल्या ‘साध्वी’ या उपाधीमुळे अनेक कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पित्त खवळले होते. त्यांनी करकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फलक त्यांच्या घराभोवती लावले होते. मात्र त्याच सुमारास मुंबईवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बंदोबस्त करताना कसाब या शत्रूसैनिकाच्या गोळ्यांनी करकरे यांचा बळी घेतला. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच त्यांच्या घराभोवतीचे ते फलक संबंधितांनी गुपचूप काढून घेतले. हेमंत करकरे यांना त्यांच्या देशभक्तीसाठी शौर्य पदके दिली गेली. त्यांचे पुतळे अनेक जागी लागले. अनेक शहरांतील चौकांना त्यांचे नाव दिले गेले. इकडे प्रज्ञा ठाकूरविरुद्धचे पुरावे क्रमाने कमी होत गेले. साक्षीदार फितूर होत गेले व संशयाचा फायदा देत न्यायालयाने तिची नाइलाजाने सुटका केली. या खुनाच्या व दहशतखोरीच्या आरोपी स्त्रीला भाजपने भोपाळचे लोकसभेचे तिकीट दिले. वर ‘तिला तिकीट देऊन हिंदुत्वावरील दहशतखोरीच्या आरोपाला आम्ही उत्तर दिले’ असे निंदनीय उद्गार खुद्द पंतप्रधान मोदी यांनी काढले.

हा देश आणि त्याचे सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात, ते दहशतीला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांना न्याय देणारे की त्यांना शाप देणाऱ्यांच्या बाजूने जाणारे आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी ही स्थिती आहे. हेमंत करकरे पोलीस खात्यात असताना त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांचा बीमोड केला, म्हणून त्यांना ‘रॉ’मध्ये बोलाविले होते. काही काळ परदेशात प्रशिक्षण घेऊन ते भारतात आले व महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख झाले. जेथे जेथे त्यांची नियुक्ती होती तेथे तेथे त्यांनी आपल्या निष्पक्ष कामाचा ठसा उमटवला. अन्याय करणाऱ्यांवर कारवाई केली. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांशी नाते ठेवणारे करकरे आपल्या कर्तव्यात चोख होते. त्यांना त्यांचा पोलिसी गणवेश व देश याविषयी अभिमान होता. दहशतवाद्यांच्या धमक्या येत असताना व कर्मठ हिंदुत्ववाद्यांचे पक्ष त्यांना जीवे मारण्याची धमकी देत असताना व त्यांचे सारे कुटुंब दहशतीच्या छायेखाली असतानाही हा बेडर अधिकारी आपल्या कर्तव्याला जागला. त्याने प्राण दिला तोही देशाचे व मुंबईचे रक्षण करताना.

त्याला शाप देण्याची बुद्धी फक्त बुद्धिभ्रष्टांना व देशविरोधी वृत्तीच्या लोकांनाच होऊ शकते. करकरे हे त्यांच्या खात्यातील लोकांच्या, अधिकाऱ्यांच्या, मराठी माणसांच्या व देशाच्याही अभिमानाचा विषय होते व आहेत. त्यांची देशभक्ती व दहशतवादाला त्यांनी केलेला विरोध जरा लक्षात घेतला असता तर या साध्वीचे डोकेही ठिकाणावर राहिले असते. साध्वीच्या शापाला पाठिंबा दर्शविणारे पंतप्रधान आणि त्यांचा भाजप देशाच्या संरक्षणाच्या बाजूने आहे की त्याच्यावर हल्ला करणाऱ्या कसाबच्या बाजूने, हा प्रश्न अशा वेळी साऱ्यांना पडावा. साध्वीची बाजू देशविरोधी आणि करकरे यांची बाजू देशभक्तीची आहे हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNarendra Modiनरेंद्र मोदी