शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पक्ष गेला, जिद्द कायम!! जाणाऱ्या मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:57 IST

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते.

'एक तुतारी द्या मन आणुनी', असे खरे म्हणजे शरद पवार म्हणालेले नव्हते. पण, निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात ही तुतारी आणून दिली आहे. आता ती स्वप्राणाने फुंकण्याचे आव्हान शरद पवारांसमोर आहे. स्वतःच स्थापन केलेला पक्ष हातातून गेला आहे. चिन्ह गेले आहे. डझनभर आमदार वगळता सगळे आमदार गेले आहेत. 'आणखी काही जाणार आहेत', अशा बातम्या येत आहेत, अशा बातम्यांतील मुख्य पात्रांनाच पवारांनी तुतारी फुंकायला लावली हा मुद्दा वेगळा, पण चित्र एकूण सोपे नाही. 

वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते. छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे रूप बदलले आणि शिवरायांच्या इतिहासाची मांडणीही बदलत गेली. रायगडाला जाग असतेच, पण त्याची 'याद' कोणाला आणि कधी येईल, याचे आडाखे मात्र बदलत असतात. इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी आणि यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे असे अनेक बदल या काळात रायगडाने पाहिले. सगळे बदलले. एक मात्र कायम आहे. शरद पवार तेव्हाही झुंजत होते. आजही झुंज देत आहेत. 

१९७८मध्ये मुख्यमंत्री झालेल्या पवारांचे पुलोद सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये बरखास्त केल्यानंतरही शरद पवार दिल्लीला थेट आव्हान देत राहिले. पराभूत झाले. सोबतचे बहुतेक सगळे शिलेदार सोडून गेले, तरीही पवार लढत राहिले. आजही पवार लढताहेत. या लढाईचा निकाल काय लागेल, हे पवारांच्या हातात नाही. बैलजोडी, गायवासरू, चरखा, हाताचा पंजा, घड्याळ अशा चिन्हांनंतर वयाच्या ८४व्या वर्षी शरद पवार तुतारी फुंकत आहेत, ही घटना लक्षणीय अशीच. शरद पवारांचा राजकीय प्रवास एकरेषीय नाही. ते फार लवकर मुख्यमंत्री झाले खरे, मात्र दिल्लीला आव्हान देण्याच्या त्यांच्या सततच्या पवित्र्यामुळे ते अनेकदा सत्तेपासून दूर फेकले गेले. आधी इंदिरा गांधींना त्यांनी आव्हान दिले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी विक्रमी जागा जिंकत पंतप्रधान झाले. राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नंतर सोनिया गांधींना थेट आव्हान दिल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून आणि पक्षातूनही बाहेर पडावे लागले. 

स्वतःचा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला तो १९९९मध्ये, जन्मल्यापासून सत्तेचा चमचा तोंडात असण्याची सवय असल्याने २०१४ मध्ये पवारांच्या पक्षाला धक्का बसला, एकेक 'सरदार' त्यांना सोडून गेले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तर या 'आउटगोइंग ने कळस गाठला. मात्र, इडीला आव्हान देत शरद पवार उभे राहिले. त्यानंतर ते पावसात असे भिजले की त्यांच्या राजकीय आयुष्यातील अनेक डागही त्यामुळे धुऊन निघाले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होणे हा पुलोदपेक्षाही अतिशय वेगळा प्रयोग होता. दिल्लीला पुन्हा आव्हान देत पवारांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आणि ते पुन्हा एकदा पाडले गेले! त्यानंतर जसे सगळे शिलेदार त्यांना सोडून गेले, तसेच पुन्हा घडले, आणि, आहे त्यांना सोबत घेऊन पवार आता पुन्हा उभे राहिले आहेत. 'हे बळ येते कुठून?', असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, "साहित्य, संगीत, कला आणि खेळ या माझ्या आंतरिक प्रेरणा आहेत !" हे त्यांचे वेगळेपण खरे, पण आज त्यांच्या हातात वय नाही. शिवाय, विरोधकांकडे सत्ता, यंत्रणा, मनुष्यबळही आहे.

 पवारांसोबत सहानुभूती असेलही, तिचे रूपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पवारांचे राजकारण नेहमीच अनपेक्षित असते म्हणूनही असेल कदाचित, पण सुरुवातीला शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या संघर्षाकडेही अनेकजण संशयाने पाहत होते. मात्र, आता हे प्रकरण पुढच्या टप्यावर गेले आहे. अजित पवारांची प्रतिमा धडाकेबाज राजकारण्याची आहे. त्यांच्याकडे नेते आहेत. सत्ता आहे. शरद पवारांकडे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच सहानुभूती आहे. शिवाय, आमदार कुठे गेले, ते समजते. मतदार मात्र आमदारांसोबत जातातच, असे नाही. या मतदारांवर शरद पवारांची भिस्त आहे. शरद पवारांची 'सेकंड इनिंग' कशी असेल, हे यथावकाश समजेलही, पण 'मी अजून जहाज सोडलेले नाही', असे सांगत पवारांनी या वयात तुतारी मात्र फुंकली आहे!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस