शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

वारकऱ्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 8:13 AM

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे.

कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कार घुसून आठजणांचे बळी गेले. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं वाटत असतानाच भरधाव वेगाचे हे वारकरी बळी ठरले. वर्षानुवर्षे वारीची परंपरा सुरू आहे. वाटेत अनेक विघ्ने आली तरी सुखनैव वाटचाल करणारे वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. होय होय वारकरी, जाय जाय तू पंढरी म्हणत हा वैकुंठाचा मेळा विठुरायाच्या चरणी लीन होतो. अवघ्या दीनांचा हा नाथ, गरिबांचा देव म्हणून विठ्ठलाकडे पाहिले जाते. अशा गरीब वारकऱ्यांचा पायी पंढरपूरला जाण्याकडे ओढा असतो. मात्र, वाहनांची गर्दी, काही ठिकाणी अरुंद रस्ते यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. यापूर्वीही दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बाबतीत असे अनेक अपघात झाले आहेत.

अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आषाढीसाठी वारकऱ्यांना विशेषत: मोठ्या दिंडीतील वारकऱ्यांना पोलीस संरक्षण मिळते. मात्र, लहान-मोठ्या गावांमधून येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा वाऱ्यावर असते. उत्तर भारतात कावड यात्रा मोठ्या प्रमाणावर निघतात. त्यांचीही सुरक्षिततेची व्यवस्था केलेली असते. तरीही अपघात होतच असतात. त्या प्रमाणात सुरक्षेचे उपाय दिसत नाहीत. रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे काही भान राहिलेले नाही. शासनाच्या आकडेवारीनुसार २०२० साली रस्ते अपघातात १ लाख ३१ हजार ७१४ लोकांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सांगण्यात आले होते. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेसंदर्भात प्रशासन निर्देश देते, त्या प्रमाणात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या काळजीबाबत प्रशासन तितकेसे जागरूक आहे, असे वाटत नाही. पंढरपूरकडे येणारे रस्ते आता मोठे झाले आहेत.

अनेक महामार्ग तयार झाले आहेत. मात्र, रस्त्यावर अपघात झाल्यास तातडीने मदत कशी मिळेल, याची उपाययोजना अद्यापही झालेली नाही. रस्त्यावर पायी चालणाऱ्यांची गर्दी वाढली असली तरी त्यांच्यासाठी वेगळे मार्ग उपलब्ध नाहीत. वाहनांचे आयुष्यमान, वाहनांची वाढती गर्दी, वाहनचालकांचे ड्रायव्हिंग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, रस्त्यांचे योग्य पद्धतीने नियोजन नसणे, खड्ड्यांचे वाढते प्रमाण ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. दरवेळी अपघात झाल्यानंतर त्याची कारणे शोधली जातात. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. परदेशात अपघात झाल्यानंतर तातडीने मदत मिळते. तशी परिस्थिती भारतात नाही. त्यामुळे वाहतूक प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. वारीच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांची वाढती संख्या.

दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या महिला वारीच्या निमित्ताने बाहेर पडतात. त्या विठुराया-रुक्मिणी मातेला साकडे घालून आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. ही वारी म्हणजे आयुष्याचे सार आहे. आपल्या आयुष्यातील सारी दु:खे बाजूला सारून आनंदाचे चार क्षण आपल्या पदरात पडावेत म्हणून भाविक त्या विठुरायाकडे धाव घेतात. त्याच्या चरणी आपला माथा टेकवतात. केवळ धार्मिक भावनेतून नव्हे तर या जगाचा त्राता असणाऱ्या विठुरायाने आपले आयुष्य अधिक सुखकर करावे, ही त्यामागची आंतरिक तळमळ असते. त्यासाठी तेे मैलोनमैल, उन्हातान्हाची, पावसाची तमा न बाळगता चालत येतात. निर्मळ मनाने येणाऱ्या भाविकांना मृत्यूच्या दाढेत लोटण्याचे काम अशा अपघातांनी होते.

मुद्दा केवळ अपघातांचा नसून, रस्त्यावरून चालण्याचा सामान्यांचा अधिकार आपण अबाधित राखणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. कोट्यवधी रुपये आपण रस्त्यांसाठी खर्च करीत आहोत, त्याचवेळी नागरिकांना रस्त्यावरून निर्धोकपणे जाता यावे, यासाठी उपाययोजना मात्र आपण करीत नाही. एखादा अपघात झाल्यानंतर आपण त्याकडे काही काळापुरते पाहतो, मृतांना मदतही करतो. ही अल्पावधीची मलमपट्टी फार काळ उपयोगी पडणार नाही. रस्त्यांचा विकास झाला, त्याने वाहनांचा वेग जरूर वाढला असेल. मात्र, त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागणार असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. गर्दीचे नियोजन करताना सामान्य नागरिकांच्या जिवाचेही मोल अधिक प्रभावीपणे जपणे गरजेचे आहे. दरवर्षी किती अपघात होतात आणि त्यावर कोणती उपाययोजना करावी, याचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. अन्यथा अशा निष्पाप जिवांचे हकनाक बळी जातच राहतील. वारकऱ्यांची वारी अधिक सुखकर करणे ही काळाची गरज आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDeathमृत्यू