शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

...अखेर ‘सत्तांतर’ झाले!, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांचेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 7:46 AM

नाट्यमय सत्तांतरानंतर पंधरा दिवस उलटले तरी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परिणामी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ आहे.

नाट्यमय सत्तांतरानंतर पंधरा दिवस उलटले तरी महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. परिणामी,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ आहे. अशावेळी मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतलेले निर्णय महत्त्वाचे असले तरी अगदीच अनपेक्षित नाहीत. ते राजकीय आहेतच, शिवाय या मंत्रिमंडळावरील भारतीय जनता पक्षाचा प्रभाव अधोरेखित करणारेही आहेत. मूल्यवर्धित कर म्हणजे ‘व्हॅट’ कमी करून राज्यातील जनतेला पेट्रोल ५ रुपयांनी, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त दरात देण्याचा निर्णय अत्यंत चांगला, महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने असा दिलासा द्यावा यासाठी मोठी मागणी होती, सरकारवर दबाव होता. केंद्राने असा निर्णय घेतला तेव्हा भाजपशासित राज्यांनी त्याचे अनुकरण केले.

महाराष्ट्रात मात्र ते झाले नाही. तेव्हा भारतीय जनता पक्षाने आंदोलनही केले होते. परंतु, केंद्राकडून मिळणाऱ्या ‘जीएसटी’ परताव्यातील थकबाकीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे व अजित पवार यांनी तो दिलासा दिला नाही. महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना ‘सन्मान निधी’ देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी बदलला होता. आता ती योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनोमन सुखावणारा, राज्यात पुन्हा आपली सत्ता आली याची खात्री देणारा हा निर्णय आहे. ‘अमृत योजना’ किंवा ‘स्वच्छता अभियान’ यांसारख्या अन्य किरकोळ निर्णयाशिवाय नव्याने चर्चेला तोंड फोडणारा निर्णय आहे तो सरपंच व नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड करण्याचा. शिंदे व फडणवीस यांनी शपथ घेतल्याबरोबर भाजपच्या नेत्यांकडून हा निर्णय घेण्याची मागणी होऊ लागली होती. कारण, देशभर प्रभाव असलेल्या आपल्या पक्षाला अशा थेट निवड पद्धतीचा फायदा होतो, पॅनल विजयी झाले नाही तरी सरपंच व अध्यक्ष आपला बसू शकतो, अशी भाजपच्या नेत्यांना खात्री आहे, मागचा अनुभवही आहे.

हा निर्णय पूर्णत: राजकीय असल्याने त्याच्या परिणामांची चर्चाही राजकीय अंगानेच होईल. हा निर्णय म्हणजे एका अर्थाने विधानसभा निवडणुकीची चाचपणी आहे. कारण, महाराष्ट्रात महापालिका वगळल्या तरी नगरपालिका व नगरपंचायतींची संख्या साधारणपणे विधानसभा मतदारसंघांएवढीच आहे. या निर्णयामुळे विधानसभा मतदारसंघात कोणाचा किती प्रभाव हे सहजपणे लक्षात येणार असल्याने उमेदवार निवडीसाठी पक्षांना या व्यवस्थेची मदत होणार आहे. तथापि, ग्रामपंचायत तसेच नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदारांनी त्यांच्या त्यांच्या वॉर्डातून सदस्य निवडून द्यायचे व ज्यांचे सदस्य अधिक असतील त्यांनी त्यांच्यापैकीच एकाची अनुक्रमे सरपंच व नगराध्यक्ष म्हणून निवड करायची, ही मूळ उतरंड अधिक चांगली मानली जाते. कारण, त्यामुळे नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी थेट नगराध्यक्ष किंवा सरपंचांपर्यंत जाण्याची गरज राहात नाही.

सदस्याला पुन्हा त्याच वॉर्डातून निवडून येण्याची गरज असल्याने तो तक्रारींकडे कानाडोळाही करू शकत नाही. गावातील असे नेते ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, पक्षात तसेच वरिष्ठ नेत्यांसोबत ऊठबस आहे. परंतु, जे स्वत:चे पॅनल निवडून आणू शकत नाहीत, अशांना थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडीच्या निर्णयाचा आधी फायदा झाला व आताही होईल. परंतु, याआधीचा अनुभव असा आहे, की बहुमत वेगळ्या गटाचे व सरपंच किंवा नगराध्यक्ष वेगळ्या गटाचा, राजकीय पक्षाचा. त्यामुळे सरपंच किंवा अध्यक्ष सदस्यांचे ऐकेनात. ते त्यांच्या भागातील बड्या नेत्यांशी जवळीक साधणार.

गावाच्या विकासाचे काहीही होवो, त्यांचे पद, प्रतिष्ठा टिकून राहणार आणि एक गाव ताब्यात असल्याचे समाधान वरच्या पुढाऱ्यालाही लाभणार. बाजार समित्यांच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार हा शिंदे-फडणवीस यांचा निर्णयदेखील पूर्णपणे राजकीय हेतूंनीच घेतलेला आहे. अलीकडे अनेक बडे सहकार नेते भारतीय जनता पक्षात आले असले तरी तो पक्ष अजूनही सहकार क्षेत्र, विशेषत: बाजार समित्या हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शक्तिस्थळ असल्याचे मानतो. ग्रामपंचायत गटातून सदस्य निवडीद्वारे सध्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी व अन्य मतदारांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देऊन तो प्रत्यक्ष करण्याचा हा निर्णय आहे. थोडक्यात, शिंदे-फडणवीस या दोघांच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयांनी राज्यात सत्तांतर झाल्याचे प्रत्यंतर दिले आहे. 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र