शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एका थराराची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:19 IST

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता.

तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जागतिक फुटबॉलचा थरार रविवारी संपला. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जगावर फुटबॉल ज्वर चढला होता. अनेक धक्कादायक निकाल यंदाच्या स्पर्धेत लागले असले तरी यंदाची स्पर्धा आतापर्यंतची सर्वात अटीतटीचीही ठरली. विशेष म्हणजे ज्या संघांकडून फारशा अपेक्षा ठेवल्या जात नव्हत्या त्या संघांनी चक्क बाद फेरीत धडक मारताना बलाढ्य संघांना बाहेरचा रस्ता दाखवला. यावरूनच जागतिक फुटबॉल किती उच्च स्तरावर पोहचले याची प्रचिती येते. महिनाभरापूर्वी कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या फ्रान्सने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे काहीसे आश्चर्यकारक असले तरी अनपेक्षित मात्र नव्हते. गेल्या दशकात या खेळातल्या एकंदर व्यूहरचनेत झपाट्याने झालेल्या बदलांची फलश्रुती केवळ या अंतिम सामन्यातच नव्हे तर स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून दिसू लागली होती. एखाद्या नामचीन आणि अर्थातच कुशल खेळाडूभोवती संघाचा संपूर्ण खेळ बेतणाऱ्या संघावर उपउपांत्य फेरीपर्यंत कसेबसे जात मग माघार घेण्याची नामुष्की आली. लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल किंवा नेमारचा बलाढ्य ब्राझील ही याची ठळक उदाहरणे. आघाडीच्या फळीत खेळणाºया आपल्या स्टार खेळाडूला केंद्रस्थानी ठेवून या संघांच्या डावपेचांची रचना करण्यात आली होती. तिला प्रत्युत्तर देताना अन्य संघांनी या स्टार खेळाडंूना जखडून ठेवण्याची आणि त्याचबरोबर संधी मिळताच आपल्या आक्रमणाचे रूपांतर आघाडी मिळवण्यात करण्याची नीती अवलंबिली. या स्पर्धेतील उपविजेता क्रोएशिया, स्वीडन आणि बेल्जियमचे संघ काही तरी अकल्पित करून दाखवतील अशी अटकळ काही तज्ज्ञ व्यक्त करीत होते. या संघांचा बचावावर आधारलेला खेळ संधी मिळाल्यावर क्षणार्धात आक्रमकतेत परिवर्तित व्हायचा. सुसाट खेळासाठी परिचित असलेल्या उरुग्वे, ब्राझील, पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया या लॅटिन अमेरिकन संघांना हे डावपेच भारी पडले. याचे एक कारण हेही आहे की, फुटबॉलचा केंद्रबिंदू आता युरोपकडे सरकलेला आहे. या केंद्रबिंदूत आहे ते अब्जावधींची उलाढाल असलेले क्लब स्तरावरचे फुटबॉल. ही उलाढाल अविश्वसनीय मोल देऊन खेळाडू विकत घेत असते. तिला अपयश मान्य नसते. त्यातून बेफाम फुटबॉलच्या डावपेचांना आवरून घेणारी संयत व्यूहरचना आकारास आली. ही व्यूहरचना आधी आपली बाजू सुरक्षित करते आणि मग प्रतिस्पर्ध्यांच्या रचनेतील कच्चे दुवे शोधते. रोनाल्डो, मेस्सी वा नेमारच्या यशात तिचा वाटा मोलाचा राहिला आहे. तिच्यात आघाडीच्या फळीइतकेच महत्त्व मध्य आणि बचावफळीला असते. मात्र देशाचा संघ घडवताना प्रशिक्षकांवर प्रचंड मर्यादा येत असतात. परिणामी उपांत्य फेरीत खेळलेले चारही संघ एकाच खंडातले निघाले. फुटबॉलला पेले ते मॅराडोना या मन्वंतरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया गेली दोन दशके सुरु होती; ती आता अंतिम टप्प्यात आली आहे, असेच या स्पर्धेतील उपांत्य फेरी व अंतिम सामना सुचवतो. या प्रक्रियेत आफ्रिका आणि आशिया या खंडांचेही महत्त्वाचे योगदान आहे. उर्वरित जगाबरोबर भारतालाही विश्वचषक स्पर्धेचा ज्वर चढला होता. लाखो भारतीयांनी रात्र जागवत ही स्पर्धा पाहिली. ‘मेरी दुसरी कन्ट्री’ म्हणत एकेका देशाला समर्थन दिले. पण सव्वाशे कोटींच्या या देशाला इतरांसाठी टाळ््या वाजवण्यावरच समाधान मानावे लागते आहे. जागतिक क्रमवारीतले आपले आजचे स्थान आहे ९७ वे. जपान, दक्षिण कोरिया, चीन, इराण, सौदी अरेबिया यासारखे आशियायी देश आपली अमीट छाप खेळावर सोडत असताना आपण मात्र आपल्याच पायात पाय घालून पडल्यासारखे पिछाडीवर आहोत. क्रिकेटच्या भावविश्वात रमलेल्या भारतीयांना आता फुटबॉलचा थरार समजला आहे. वेळ आहे ती या थरारमध्ये भारतीय तरुण किती लवकर उतरतो याची. त्यासाठी अंतिम सामन्यात धडकलेल्या छोट्या क्रोएशियाचे उदाहरण पुरेसे ठरेल, हे नक्की.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशिया