शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

By गजानन दिवाण | Updated: December 23, 2020 06:56 IST

Farmers : ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.

- गजानन दिवाण(उप वृत्तसंपादक, लोकमत) 

घराच्या बाहेर निघायचे म्हटले तरी पन्नास वेळेस विचार करण्याचा हा काळ. एक कोरोना कमी होता म्हणून की काय, आता ब्रिटनमध्ये दुसरा कोरोना जन्माला आला. आपण आणि आपले घर एवढेच विश्व, असे समजण्याचे हे दिवस असताना दिल्लीच्या केंद्रीय पथकाने एवढा मोठा प्रवास करून, काही राज्ये, काही जिल्ह्यांची सीमा ओलांडून मराठवाड्यात आमच्या बांधावर यावे, हेच आमचे भाग्य. अवकाळी अतिवृष्टीने नुकसान झाले ऑक्टोबरमध्ये, ते पाहण्यासाठी आपण आलात डिसेंबरमध्ये, म्हणून काय झाले? कोरोना संकटाच्या काळात तुम्ही आलात हेच  महत्त्वाचे. येण्यास थोडा उशीर झाला म्हणून एवढे ओरडण्याचे कारण  काय? कुठल्या दुष्काळानंतर आपले पथक अगदी वेळेवर आले, ते आधी सांगा.  केंद्रीय पथक असे उशिरा येण्यालादेखील मोठी परंपरा आहे. हे पथक येऊन काय करते? पाच-दहा गावे, पाच-दहा तासांत फिरून ओला-कोरडा दुष्काळ समजून कसा घेते? व्हिडिओ आणि अहवाल पाहूनच अंतिम अहवाल द्यायचा तर मग  मोठा खर्च करून ही दुष्काळी सहल कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्याचे चातुर्य  उगीच कोणी दाखवू नये. कारण हे पथक प्रत्यक्ष बांधावर येऊन गेल्याशिवाय केंद्राची मदत मिळतच नाही, हेही तितकेच खरे. किती बांधावर आणि काय पाहणी केली याला फारसे महत्त्व नाही. अशी ही मोठी परंपरा असताना मग तीच ती ओरड कशाला करायची? या केंद्रीय पथकाने मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील दहा, जालना जिल्ह्यातील सहा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील गावांची नुकसान पाहणी केली. सात तासांत एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात दहा गावांचे बांध पालथे घातले. तब्बल १८६ किलोमीटरचा प्रवास केला.  म्हणून त्यांचे कौतुक. ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला.  शेतात पीक कितीही चांगले आले तरी घरात येईपर्यंत त्याचा नेम राहत नाही. कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ  पाठ सोडत नाही. काहीच नाही तर व्यापारी पदरात काही पडू देत नाहीत. यंदा निसर्ग अति प्रसन्न झाला. पीक तर चांगले बहरले; पण पाण्यात सारेच वाहून गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी नुकसान झाले. ते कमी म्हणून की काय, पुन्हा ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने होते नव्हते सारेच साफ केले. या पावसामुळे मराठवाड्यात ३६ लाख शेतकऱ्यांच्या २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेकांचे अख्खे शेत खरडून गेले. १३४६ कोटींचा मदतीचा पहिला हप्ता देण्यात आला. काहींना थोडेफार मिळाले, तर अनेकांच्या हाती एक आणाही पडला नाही. विमा काढलेल्या शेतकऱ्यांचेदेखील तेच हाल. विमा कंपनीने त्यांच्याही हातावर तुरी दिल्या. -  राज्याची  मदत मिळाली, आता केंद्राच्या मदतीसाठी हे पथक आले.  तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी पाहणी दौरे केले. पंचनामे झाले. येणाऱ्या प्रत्येकासमोर बायाबाप्यांनी  व्यथा मांडली. या केंद्राच्या पथकासमोर भरल्या डोळ्यांनी तेच सांगितले. मदत मिळेल, हीच भाबडी अपेक्षा.  या पथकाला कोणी कापूस दाखवला, तर कोणी  एका टोपल्यात अति पावसाने खराब झालेला सोयाबीन-मका. कोणी तुराट्या झालेले तुरीचे पीक दाखवले, तर कोणी सडलेले धान्य.  अनेकांसमोर व्यथा मांडून झाल्याने आता अश्रूही येत नाहीत. ...यानिमित्ताने एक बरे झाले. कोरोना झालेल्यांना, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आणि कोरोना होऊ नये म्हणून बाकी सर्वांनाच गेल्या नऊ महिन्यांपासून गाव सोडता आले नव्हते. अनेकांना घरही सोडता आले नव्हते.  सरकारी खर्चात केंद्रीय पथकाची दुष्काळी सहल तरी झाली. हवापालट झाला. तोंडालाही चव आली. या दिल्लीच्या पाव्हण्यांनी आता एकच करावे. राजधानीत पोहोचताच आपली कोरोना टेस्ट करावी आणि नंतरच नुकसानीचा अहवाल सादर करावा. आमच्यासारखे अनेक शेतकरी ओल्या-कोरड्या दुष्काळाने मेले तरी चालतील, दिल्लीतील पोशिंदा जगला पाहिजे, हीच आमची भावना.

टॅग्स :Farmerशेतकरी