शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

विशेष लेख: वकिलांना ग्राहक कायद्यातून सूट देणे न्याय्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 12:09 IST

ज्ञानावर आधारलेली सेवा देताना त्या सेवेचे मूल्य आकारले जाते. अशा सेवादाराशी ग्राहकांचे संबंध मालक-नोकर असे नक्की नसतात !

- दिलीप फडके(ग्राहक हक्क चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते)

सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने अलीकडेच एका निवाड्यात वकिलांसाठी ग्राहक कायदा लागू होणार नाही असा निकाल दिला आहे. याचा अर्थ, सेवेतल्या त्रुटी किंवा न्यूनतेच्या कारणांसाठी वकिलांच्या विरोधात ग्राहक न्यायालयात जाता येणार नाही. वकिलांच्या पाठोपाठ वैद्यक व्यावसायिकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने तीस वर्षांपूर्वी दिलेल्या निकालाचेही पुनर्विलोकन करावे, अशी विनंतीही न्यायालयाने मा. मुख्य न्यायाधीशांना केली आहे. तसे झाले तर वैद्यक व्यावसायिकांबद्दलच्या तक्रारींसाठीदेखील ग्राहक मंचाचे दरवाजे बंद होतील.

वस्तू, सेवा यांच्यातले दोष, त्रुटी, न्यूनतेपासून संरक्षण करण्यासाठी सामान्य ग्राहकाला एक प्रभावी मार्ग ग्राहक संरक्षण कायद्यामुळे उपलब्ध झाला आहे. या मूळ कायद्यात 'सेवा' या संज्ञेच्या व्याख्येत वैद्यक किंवा वकिलांचा उल्लेख नव्हता. पुढे 'सेवा' या शब्दाची व्याप्ती वाढायला लागली. सुरुवातीला एलआयसी, बँका, दूरसंचार यांच्यासह सेवा क्षेत्रातल्या अनेक संस्थांनी आपल्या क्षेत्राचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध असल्याने आपल्या संबंधातल्या तक्रारी ग्राहक कायद्याखाली विचारात घेतल्या जाऊ नयेत असा युक्तिवाद केला. तीस वर्षांपूर्वी तीन न्यायाधीशांच्या पीठाने या प्रश्नाचा विचार केला होताच. ताज्या निकालातही तोच मुद्दा नव्याने मांडला गेलेला आहे. वकिलांसाठी बार कौन्सिल, वैद्यक व्यावसायिकांसाठीची मेडिकल कौन्सिल या स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आलेल्या संस्थांना त्यांच्या व्यवसायाचे नियमन करण्याचे, अनिष्ट प्रथा रोखण्याचे व्यापक अधिकार आहेत हे खरे; पण याबाबतची या संस्थांची कामगिरी समाधानकारक नाही. प्रसंगोपात एकमेकांना पाठीशी घालण्याचे कामच त्यात केले जाते असा सार्वत्रिक अनुभव आहे. अशा स्थितीत सामान्य माणसासाठी ग्राहक न्यायमंचाकडे जाणे हा साधासोपा मार्ग आहे. किंवा डॉक्टरांच्या संबंधातल्या वकील तक्रारी तांत्रिक, गुंतागुंतीच्या असतात, असेही सांगितले जाते; पण अनेकदा वस्तूंमधल्या दोषांबद्दलच्या तक्रारीदेखील तांत्रिक, गुंतागुंतीच्या असतातच. वैद्यक व्यवसायाच्या बाबतीत तक्रारीच्या सुनावणीच्या वेळी दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरचे मत घेतले पाहिजे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ते मत मिळवण्यासाठी किती उठाठेवी कराव्या लागतात याची कल्पनाच केलेली बरी. सेवेतल्या त्रुटीबद्दल अशा नियामक संस्थांकडे आलेल्या ग्राहकांच्या तक्रारी खऱ्या आहेत असे आढळले तरी त्या फारफार तर संबंधित व्यावसायिकाला दंडित करू शकतात; पण ग्राहकाचे झालेले नुकसान भरून देण्याबद्दल कोणताही आदेश देण्याचे अधिकार या नियामक संस्थांना नाहीत.

वकिलांचा व्यवसाय विशेष ज्ञानावर आधारलेला एक' असे त्याच्या अशिलाचे स्थान असते, असे हा निकाल सांगतो. वकील हे न्याययंत्रणेतले एक महत्त्वाचे अधिकारी आहेतच; पण त्यांचे प्राथमिक दायित्व त्यांच्याकडे आपली बाजू न्यायालयात मांडण्याचे काम सोपविणाऱ्या अशिलाच्या संदर्भात असते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यात त्रुटी किंवा न्यूनता आढळल्यास त्याबद्दल दाद मागण्याचा एक सोपा उपाय या निकालामुळे ग्राहकांना नाकारला गेला आहे हे नक्की. वकिलांबद्दलच्या तक्रारी ग्राहक न्याययंत्रणेकडे मांडण्याचा मार्ग सुरू ठेवला तर प्रचंड तक्रारी येतील, असे न्यायालय सांगते. म्हणजे आज वकिलांबद्दल ग्राहकांच्या खूपच तक्रारी आहेत, असा याचा अर्थ समजावा का? वैद्यक व्यावसायिकांबद्दलचा आजवरचा अनुभव काय आहे? रुग्णांना ग्राहक न्यायालयाचे दरवाजे आज उघडे असले तरी किती दावे आज दाखल होतात? सर्वच तक्रारी नेहमी ग्राहक न्यायालयात नेल्या जात नाहीत. अनेकदा फुटकळ आणि निरर्थक दावे केले म्हणून न्यायालयाने तक्रारदाराला शासनदेखील केलेले आढळते आहेच की!

टॅग्स :Mumbaiमुंबई