शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

अखेर नमावे लागले!

By admin | Published: October 05, 2016 3:53 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीसमोर अखेर कर्नाटक सरकारला नमावेच लागले आहे. कावेरीतील पाणी सोडा असा स्पष्ट आदेश न्यायालयाने देऊनही कर्नाटक राज्य त्यास तयार होत नव्हते

सर्वोच्च न्यायालयाच्या तंबीसमोर अखेर कर्नाटक सरकारला नमावेच लागले आहे. कावेरीतील पाणी सोडा असा स्पष्ट आदेश न्यायालयाने देऊनही कर्नाटक राज्य त्यास तयार होत नव्हते. उलट त्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन पाचारण केले. फक्त पिण्यापुरते पाणी सोडू येथपासून तो राज्य सरकारला सर्वाधिकार बहाल करेपर्यंत काही ठराव अधिवेशनात संमत केले गेले. पण आपल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याबाबत राज्य सरकार टंगळमंगळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम होतील अशीे तंबी जेव्हां न्यायालयाने दिली तेव्हां कुठे पाणी सोडण्याचा ठराव विधिमंडळाने संमत केला आणि कावेरीतून ६८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. एक आॅक्टोबरपासून सलग सहा दिवस रोजी ६००० क्युसेक पाणी सोडण्याचे न्यायालयाचे जे मूळ आदेश होते, त्यांचे पालन करण्याचे अभवचनही आता कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. देशातील अनेक राज्या-राज्यांमध्ये आणि काही राज्यांतर्गतदेखील पाण्याचे वाटप हा संघर्षाचा विषय बनला आहे. सबब कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारमधील कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटपाचा प्रश्न आजचा नाही आणि नवाही नाही. कर्नाटकातून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या कावेरी नदीच्या पाण्यावर तामिळनाडूची तहान आणि शेती दोन्ही अवलंबून आहेत. पण कर्नाटक जोवर पाणी सोडीत नाही तोवर या दोन्ही बाबी साध्य होत नाहीत व कर्नाटक तसे करण्यास यंदाच नव्हे तर कधीच सहसा राजी असत नाही. याआधी एस.एम.कृष्णा मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील तामिळनाडूला ९००० क्युसेक पाणी सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास झुगारुन लावले होते. त्यापायी त्यांच्यावर न्यायालयाने कारवाईदेखील सुरु केली होती. पण आजदेखील ही कारवाई प्रलंबितच आहे. पाण्याच्या वाटपासंबंधी राज्या-राज्यांमध्ये जे तंटे होतात, त्यात केन्द्र सरकारने मध्यस्थी करावी अशी इच्छा नेहमीच व्यक्त केली जाते. पण सहसा केन्द्र अशा वादात पडत नाही. त्यातून एकदा कोणताही वाद जेव्हां न्यायप्रविष्ट होतो तेव्हां इतर कोणालाही त्यात हस्तक्षेप करण्याची मुभा नसते. पण तरीही तामिळनाडूतील समस्त राजकीय पक्षांनी या वादात केवळ मोदी सरकारच नव्हे, तर काँग्रेस पक्षालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कर्नाटक विधानसभेच्या दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीकडे या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे आणि म्हणूनच ते कर्नाटकी जनतेच्या विरोधात जायला तयार नाहीत असा आरोप द्रमुकपासून अण्णा द्रमुकर्यंत सर्वांनीच केला आहे.