शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

शिवध्यासाने धगधगणारे अग्निकुंड शांत झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 05:53 IST

बाबासाहेब पुरंदरे यांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही...

ठळक मुद्देबाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या

प्रा. मिलिंद जोशी

बाबासाहेबांची प्राणज्योत मालवली आणि  शिवशाहिरीचे एक तेजस्वी पर्व लोपले. आयुष्यभर शिवध्यासाने धगधगणारे एक अग्निकुंड शांत झाले. त्यामुळे इतिहासही क्षणभर थबकला असेल. ‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. गोष्टी सांगण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. ही कला बाबासाहेब शिकले ते त्यांच्या वडिलांकडून. बाबासाहेबांनी आयुष्यातले पहिले भाषण वयाच्या आठव्या वर्षी केले. ताथवडे हे त्यांचे आजोळ, तिथे नृसिंहाचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा व्हायचा तो थाटामाटात. त्या उत्सवासाठी बाबासाहेब आईबरोबर मामांकडे जायचे. नृसिंह जयंतीच्या दिवशी एका कीर्तनकाराचे नृसिंह अवतारावर सुंदर कीर्तन व्हायचे. त्या कीर्तनकाराला त्यावेळी दोन रुपये बिदागी मिळायची. त्या दोन रुपयांतूनच त्याने पेटी आणि तबला वाजविणाऱ्या कलाकारांची बिदागी द्यायची, असा सगळा मामला असायचा. त्यावर्षी नृसिंह जन्माची वेळ जवळ आली तरी कीर्तनकाराचा पत्ता नव्हता. सगळे लोक अस्वस्थ होते. मामांच्या जिवाची घालमेल सुरु होती. कारण त्या उत्सवाचे यजमानपद त्यांच्याकडे होते. त्यांच्या इभ्रतीला साजेसा उत्सव त्यांनी आजवर केला होता. हाफ चड्डी आणि शर्ट घातलेले पोरसवदा बाबासाहेब हे सारे पाहत होते. त्यांचे मामा त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, ‘तुला नृसिंह जन्माची गोष्ट माहीत आहे ना? , ती तू सांग.’

बाबासाहेब गडबडलेच, कारण त्यांना नुसती गोष्ट येत होती. कीर्तनकार जसे पूर्वरंग आणि उत्तररंग अशा दोन भागात कीर्तन करीत, तसे त्यांना जमणे शक्य नव्हते. आपला आवाज चांगला नाही, तालाचे आणि वाद्याचे ज्ञान नाही असे त्यांना वाटत होते.  त्यामुळे कीर्तनकारासारखी गोष्ट कशी सांगायची, असा प्रश्न बाबासाहेबांना पडला होता. धीर देत मामा म्हणाले, ‘तुला जशी गोष्ट सांगता येते तशी तू सांग. त्या कीर्तनकाराप्रमाणेच सांगितली पाहिजे असा आग्रह नाही.’ इतर लोकांनीही त्यांना खूप आग्रह केला. प्रोत्साहन दिले. मनाची हिंमत करून बाबासाहेब उठले. त्यांनी साभिनय नृसिंह जन्माची गोष्ट सांगितली. लोकांना ती खूप आवडली. लोकांनी अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट केला. ते बाबासाहेबांचे पहिले जाहीर भाषण. खांबातून प्रकटलेल्या नृसिंहाने प्रल्हादाचा छळ करणाऱ्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन स्वतःच्या नखांनी त्याचे पोट फाडले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला, हा प्रसंग बाबासाहेबांनी इतक्या तन्मयतेने सांगितला की, लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. या प्रसंगाने शिवचरित्र व्याख्यानरुपाने कथन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

बाबासाहेबांची एक बहीण नागपूरला होती. ती बाबासाहेबांना म्हणाली, ‘बाबासाहेब, तुम्ही शिवचरित्राचा अभ्यास करताय. एक व्याख्यान नागपूरला द्या.’ बाबासाहेब नाही म्हणण्याच्या तयारीत असताना त्या म्हणाल्या, ‘तुम्ही नाही म्हणालात तर, लोक काय म्हणतील?’ त्या असं बोलल्यामुळे बाबासाहेबांना नकार देणे अवघड झाले. त्यांच्या बहिणीचे भगिनी मंडळ होते. ते मंडळ आणि नागपुरातील सीताबर्डी भागातील राजाराम सीताराम लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने ते व्याख्यान झाले. लोकांना शिवचरित्र ऐकायला खूप आवडते, याचा त्या दिवशी बाबासाहेबांना प्रत्यय आला आणि शिवचरित्र कथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला. इतिहासाकडून नेमकं काय शिकायचं याची संथा शिवशाहिरांनी दिली. अव्याभिचारी जीवननिष्ठा, घोर तपश्चरण, सातत्य आणि वक्तशीरपणा या सूत्रातले शिवशाहिरांचे जीवन हीच एक मूर्तिमंत गाथा होती. हा इतिहासपुत्र कमालीचा हळवा होता. पीडितांना पाहून कळवळणाऱ्या शिवशाहिरांची कळवळ मुकी नव्हती. तिला मदतीचे हात होते. समाजाला ते सतत देत राहिले. हे देणं कधीच फिटणार नाही.बाबासाहेबांनी शंभरीत पदार्पण केले, पण त्यांची   शतकपूर्ती होऊ शकली नाही याची खंत महाराष्ट्राला नक्कीच राहील. बाबासाहेब ज्या तपाच्या वाटेने गेले ती वाट चोखाळणे हीच  त्यांना खरी आदरांजली ठरेल.

(लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत)joshi.milind23@gmail.com

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेnagpurनागपूर