शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

मोर्चे आणि मोर्चेबंदी

By admin | Published: September 14, 2016 11:02 PM

राज्यातील मराठा ज्ञातीसमूहाच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मूक मोर्चांनीे ‘मोर्चा’ या संकल्पनेलाच पूर्णपणे धक्का दिला असून विशेष म्हणजे हा धक्का अत्यंत सुखद आहे

राज्यातील मराठा ज्ञातीसमूहाच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या मूक मोर्चांनीे ‘मोर्चा’ या संकल्पनेलाच पूर्णपणे धक्का दिला असून विशेष म्हणजे हा धक्का अत्यंत सुखद आहे. प्रचंड मोठी संख्या असूनही अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघणाऱ्या या मोर्चांमागे मराठा जातीमधील आक्रोश आहे असे म्हणण्याऐवजी त्यामागे जातीच्या अंत:स्थ वेदना आहेत असे म्हणणे सयुक्तिक ठरेल कारण आक्रोशात जितका आवाज ्असतो तितकाही आवाज या मोर्चांमध्ये नसतो. आवाजापेक्षा शांतता अधिक गंभीर आणि प्रसंगी भयकारी असते असे म्हटले जाते आणि कदाचित त्यामुळेच राज्य सरकारने या मोर्चांची धास्ती घेतली आहे असे म्हटले जात असावे. मोर्चेकरांच्या भावनांशी सरकार सहमत आहे असेही सांगितले जात आहे. पण सहमत आहे म्हणजे काय आहे? शैक्षणिक संस्था व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) कथित गैरवापरास प्रतिबंध या मराठी ज्ञातीच्या केवळ मागण्याच नव्हे तर ठसठसणाऱ्या वेदना आहेत. त्यांच्याशी राज्य सरकार सहमत आहे म्हणजे नेमके काय आहे, याचा उलगडा होत नाही. मराठा जातीला आरक्षण देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात, हरयाणा वा तत्सम कोणत्याही राज्य सरकारच्या कटिबद्धतेस सर्वोच्च न्यायालय जुमानायला तयार नाही. तरीही सर्वोच्च न्यायालयात प्रकरण जाईल तेव्हा जाईल पण तोवर आरक्षण देऊन टाकून मराठा मंडळींना जिंकून घेऊ असा विचार करावा तर कोणाचे तरी आरक्षण कमी करावे लागणार व तसे केले की तो वर्ग किंवा ती जात सरकारच्या अंगावर धाऊन जाणार. तोच प्रकार अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या कथित गैरवापराचा. हा गैरवापर अनुसूचित जाती-जामातींकरवी नव्हे तर सवर्णांकरवी केला जातो असे शरद पवारांचे सुधारित विधान आहे. पण ती त्यांची पश्चातबुद्धी वा सारवासारव आहे. त्यामुळे प्रस्तुत कायदा रद्द करणे तर राहोच पण त्यात सुधारणा करण्याची बाब सरकार उच्चारुदेखील शकत नाही हे वास्तव आहे. पण तरीही सरकारला संशयाचा फायदा देत, त्याच्या सहवेदना मराठा ज्ञातीच्या पाठीशी आहेत असे मान्य करायचे तर मग अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपाचे एक खासदार मराठा मोर्चाच्या पुढ्यात प्रतिमोर्चाचे आव्हान उभे करण्याची भाषा का करीत आहेत आणि या प्रतिमोर्चावर टीका करतानाच प्रकाश आंबेडकर राजधानीत दलितांचा जो मोर्चा काढू पाहात आहेत त्याचे प्रयोजन तरी काय आहे? साऱ्यांचेच प्रयोजन सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यामागे भविष्यकालीन निवडणुका लक्षात घेऊन केली जाणारी मोर्चेबांधणी आहे.