शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गडकरीजी, बोडक्या रस्त्यांवरून गायब झाडांचा आक्रोश ऐका..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:15 IST

महामार्गाचा विस्तार करायचा म्हणजे आधी कडेची सगळी जुनी झाडे तोडायची, हा प्रकार थांबला तर रस्ताही होईल आणि झाडेही वाचतील !

-शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक

देशातील महामार्गाचा विस्तार करताना आपण काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्यास विसरलो :  वृक्षांविषयी दूरदृष्टीचा अभाव ही त्यातली सर्वात मोठी चूक ! पूर्वी महामार्ग तयार करताना कडेच्या वृक्षांना तेवढेच महत्त्व दिले गेले. ती तोडली गेली नाहीत. त्यामुळे प्रवासाला वेळ लागत असला, तरी तो आल्हाददायी होता. आजच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महामार्गाच्या विस्तारामुळे त्या त्या भागातील स्थानिक लोकजीवनावर आपण खूप मोठ्या प्रमाणावर संकटे लादली आहेत. काही महामार्गांमुळे त्या त्या गावाची ओळख पूर्णतः संपलेली आहे. रस्त्यांच्या कडेने उभ्या राहिलेल्या छोट्या मोठ्या रोजगारांचे (चहा टपरी, रसवंती, छोटे मोठे गॅरेज, इत्यादी) गणित विस्कटले आहे. 

महामार्ग उभारणीसाठी  निसर्गाच्या संपत्तीची दैना तर हताश करणारी आहे.  डोंगर प्रचंड प्रमाणामध्ये पोखरले जात आहेत. दगड मातीसाठी मोठा उपसा केल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.  नैसर्गिक नाले कोंडले गेले आहेत. डोंगर कापल्यामुळे त्या ठिकाणच्या पर्जन्यमानावर परिणाम येत्या काळात जाणवेलच. डोंगर उताराची झाडे झुडपे कापली गेल्याने मातीचा आधार संपला आहे. उरलेले डोंगर कापणीच्या वेळी, ब्रेकरच्या हादऱ्यामुळे खिळखिळे झाले आहेत, ते कधी ढासळतील यांचा नेम नाही. बऱ्याच ठिकाणी चांगल्या विस्तारलेल्या वन जमिनीमधून महामार्ग गेले आहेत. अशा ठिकाणच्या प्रदेशनिष्ठ वृक्षांच्या तोडीमुळे तेथील जैवविविधता पूर्णतः संपलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या शेतीवर दुष्परिणाम दिसून येतील.जुन्या महामार्गाचा विस्तार  चार आळी (फोर लेन) ते आठ आळी (एट लेन) पर्यंत वाढवण्यात येतो आहे.  जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूचे, शेकडो वर्ष जुने वृक्ष सर्रास कुठलाही दूरदृष्टिकोन न ठेवता तोडले गेले आहेत व तोडले जात आहेत. हे वृक्ष तसेच ठेवून  रस्ता रुंदीकरण होऊ शकले असते. वृक्ष न तोडता, त्यांच्या दोन्ही बाजूने जमीन संपादन करणे शक्य होते व शक्य आहे.

आज  फुटपट्टीच्या रेषेत बांधण्यात येणारे समृद्धी महामार्ग असो, सुरत ते चेन्नई महामार्ग असो किंवा अहमदाबाद ते हैदराबाद; या महामार्गांसाठी जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे.  त्याच पद्धतीने जुन्या महामार्गांच्या बाबतीत कडेच्या वृक्षांच्या बाजूने जमीन संपादन करून मधला जुना मार्ग हा दुचाकी किंवा तीन चाकी वाहनांसाठी, वृक्षांच्या बाजूचे मार्ग हे चार चाकी आणि अवजड वाहनांसाठी ठेवता आले असते. जुन्या आणि परिपूर्ण वाढलेल्या वृक्षांच्या सावलीमुळे छोट्या वाहनाने प्रवास करताना आरामदायी झाले असते. मात्र महामार्ग तयार करताना बऱ्याचदा हा विचारच केला जात नाही. हा प्रयोग एखाद्या तरी महामार्गाचा विस्तार करताना होणे गरजेचे आहे.महामार्गाचा विस्तार करायचा म्हणजे आधी कुठलीही दूरदृष्टी न ठेवता झाडे कापायची हा हा प्रकार आपण त्वरित थांबवला पाहिजे.  वृक्ष म्हणजे अडथळा, वृक्ष म्हणजे उपद्रवी घटक, वृक्ष म्हणजे विकासाला बाधा... हे काय आहे?

अहो, तुम्ही साधारण आठशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, आधुनिक साधनसामग्री असल्याकारणाने चार वर्षात बांधू शकता, पण चार वर्षात एखादे वडाचे, पिंपळाचे, चिंचेचे झाड किती उंच वाढवू शकता, याचा थोडासा जरी विचार केला, तरी नक्कीच  लक्षात येईल की आपण आयता मिळालेला हा निसर्गाचा ठेवा सहज नष्ट करून महाभयंकर परिस्थिती ओढवून घेत आहोत. 

एकीकडे  महाकाय  वृक्षांची तोड करायची आणि दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून हरित रस्ते तयार करण्याच्या गोष्टी करायच्या, हे काय आहे?  ज्या तातडीने रस्ता बांधणीचे काम सुरू होते त्याच आत्मीयतेने रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड व  संवर्धन होणे गरजेचे आहे. खरे तर अशा ठिकाणी झाडांची वाढ झाल्यानंतरच टोल वसुली झाली पाहिजे !गडकरी साहेब, या बोडक्या रस्त्यांवरून गायब झालेल्या हजारो, लाखो झाडांचा आक्रोश तुम्ही कधीतरी ऐकाल काय?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी