शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

सारांश : बाप्पा, जरा निबर लोकांमध्ये माणुसकी जागवा ना!

By किरण अग्रवाल | Published: September 08, 2024 5:37 PM

व्यवस्था तर ढेपाळल्याच, कुटुंब कलहही वाढीस लागल्याने अमंगलकारी मानसिकता बदलाची गरज

किरण अग्रवाल

माणुसकी शिल्लक आहे का, असा प्रश्न उपस्थित होण्यासारख्या घटना नित्य वाढू लागल्या असताना गजानना श्री गणरायाचे आगमन झाले आहे. त्यांच्या आगमनाने व्यवस्थेतील विघ्ने तर दूर व्हावीच, शिवाय कुंठीत होऊ पाहणाऱ्या मानसिकतेत मांगल्याची ज्योत तेवावी, हीच प्रार्थना!

संपूर्ण खान्देशसाठी वरदान ठरणाऱ्या नारपार प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची मंगलवार्ता घेऊन बाप्पांचे आगमन झाले आहे. या आगमनावेळी बाप्पांचाही प्रवास रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे खडतर झाला असेल, तेव्हा आता त्यासाठी बाप्पांनीच संबंधितांना सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा गैर ठरू नये.  

निवडणूक तोंडावर असल्याने यंदा बाप्पांचे आगमन धडाक्यात झाले आहे. तसेही श्रावण संपून गणेशोत्सव आला, की त्यापुढे सर्व सणावारांचा कालावधी असतो. सर्वत्र चैतन्याचा माहोल आणि मांगल्याचीच बरसात असते. अशात निवडणूक समोर असली की विचारायलाच नको. मंडळांच्या वर्गणीची सोय होते आणि नेत्यांच्या जनसंपर्काची. अर्थात तसे का असेना, बाप्पांच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्य ओसंडून वाहते आहे. या श्रद्धेच्या व आनंददायी कार्यात सहभागी होत जनसंपर्काची संधी घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून जनता जनार्दनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये हीच अपेक्षा आहे. 

जळगावच नव्हे, तर संपूर्ण खानदेशातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न खूपच बिकट बनला आहे. गेल्यावेळी याच स्तंभात यासंबंधीची चर्चा करून झाली आहे. त्यानंतर ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरा, पण गुन्हेच दाखल होणार असतील तर दुरुस्ती कशाला करायची; असा विचार होऊ नये म्हणजे झाले. बाप्पांच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातून अनेक जण  कुटुंबासह शहरात येत असतात. त्यांची ही वाट सुकर व्हावी म्हणून बाप्पांनीच संबंधितांना सुबुद्धी द्यावी. 

महत्त्वाचे म्हणजे, अलीकडे कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यातून पोलिसांकडे गुदरल्या जाणाऱ्या तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे. भाऊबंदकीत खुनाचे प्रकारही पुढे आले आहेत. 30 लाख रुपयांसाठी परिचीतांनीच एका सेवानिवृत्त परिचारिकेचा खून करून तिचा मृतदेह नदीत फेकून देण्याची घटना नुकतीच समोर आली आहे.  इतकेच कशाला; पोटच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पित्याच्या तक्रारीवरून आईवर गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर ओढवली आहे. कुठे शिल्लक आहे नातेसंबंधातील आपुलकी व माणसा माणसांमधील माणुसकी, असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना प्रतिदिनी घडत आहेत. विषण्ण करणारे सारे वातावरण आहे. ही अमंगलकारी मानसिकता बदलण्याची सुबुद्धी बाप्पा आपण द्यावी, कारण कायद्याला आता फार कोणी मनावर घेईनासे झाले आहे. 

दुर्दैव असे की, समोर अन्याय अत्याचार होत असताना तो निमुटपणे बघून त्याचा व्हिडिओ बनविणारे वाढले आहेत; पण गैरप्रकाराला कोणी रोखतांना दिसत नाही. विद्वत्तेचा व समाजाच्या पुढारपणाचा ठेका घेतल्यागत स्वतःला मिरवणारे वाईटावर मोठ्या अहमहमिकेने चर्चा करतात, मात्र चुकणाऱ्याला त्याची चूक लक्षात आणून देण्याचे धाडस दाखवताना दिसत नाहीत. अनेकांचे मन अनेक कारणास्तव आक्रंदीत आहे, पण बधिरता आलेल्या समाजाला त्या वेदना कळताना दिसत नाहीयेत.

समाजात वाढीस लागलेली ही निबरता, निर्ढावलेपण कसे दूर करता येईल हाच खरा प्रश्न आहे. या बाबी मानसिकतेशी निगडित आहेत. मी व माझ्यातले गुंतलेपण वाढत चालल्याने इतरांबद्दलची बेफिकिरी ओढवली आहे. आपलाच गुंता आपल्याला सोडवता येईनासा झाल्यावर इतरांकडे कोण कसे लक्ष देणार?  मोबाईलवरील सोशल मीडियातल्या गुरफटलेपणात खरी सामाजिकताच ध्वस्त होऊ पाहते आहे. वास्तवातल्या जगण्यापेक्षा आभासीपणात सुखा समाधानाचे शोध घेतले जाऊ लागले आहेत. तेव्हा यासंदर्भातले मानसिक बदल बुद्धीदात्या बाप्पालाच घडवून आणावे लागतील. 

सारांशात, प्रश्न फक्त व्यवस्थेचेच नसून मानसिकतेचेही आहेत. सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षिततेसाठी मानसिकतेतीलच बदल गरजेचा आहे. बाप्पा गणराया हे बुद्धीदाता आहेत, तेव्हा बाप्पांनीच आता सुबुद्धी द्यावी आणि माणसातली माणुसकी जागवावी अशी प्रार्थना आहे.