शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सज्ज व्हा, पण...

By admin | Published: May 09, 2016 2:52 AM

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे

कोणाचे काहीही होऊ द्या त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नाही याच अविर्भावात बहुतांशी राजकीय पक्ष आणि त्यांची नेतेमंडळी वागत असतात. परिस्थितीनुरूप निर्णय घेणे वा तसे पाऊल उचलणे हे सगळ्यांनाच जमते असेही नाही, पण जो काळासोबत चालतो तोच यशस्वी होत असतो आणि जनतेच्या मनातही त्याच्याविषयीच जागा तयार होत असते. राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे, त्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न गहन झालेला आहे. दुष्काळाच्या वेदना सहन न झाल्याने एक-दोन दिवसाआड शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे सत्र सुरू आहे. हंडाभर पाण्यासाठी माणसा-माणसांत वैर निर्माण होत आहे. अशा मन सुन्न करणाऱ्या वातावरणात केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे; तर सर्वसामान्य माणसांना धीर देण्याची गरज आहे. त्यांच्यासाठी काही सकारात्मक योजना राबविण्याची गरज आहे. पाणी नसलेल्या भागातील नागरिकांची तहान कशी भागेल याचा विचार होणे गरजेचे आहे. अपवाद वगळता ज्या तुलनेत हे प्रयत्न व्हायला हवेत तसे न होता राजकारणी मंडळी आपली सिंहासने कशी शाबूत राहतील याचीच चिंता बाळगताना दिसत आहे. लोणावळा येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. ‘अनेक विकासयोजना राबविल्याने भाजपाबद्दल लोकांचे चांगले मत आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकांसाठी सज्ज व्हा’ असे आवाहन दानवे यांनी केले. हा झाला त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक भाग, पण अशाप्रकारचे आवाहन करतानाच राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी आणि पाणीटंचाई असलेल्या भागासाठी त्या-त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी तातडीने काही योजना राबवाव्यात असे फर्मानही सोडले असते, तर दानवे आणि त्यांच्या पक्षाविषयी एक आस्थेचा संदेश जनतेपर्यंत पोहचला असता. पण तसे न करता केवळ निवडणूक सज्जतेचा संदेश देणे म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजविण्यासारखा प्रकार म्हणायला हवा.