शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

गोवा फॉर गोवन्स ओन्ली : गोयंकार ‘बाहेरच्यां’वर का चिडलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 08:52 IST

दिल्ली व अन्य ठिकाणच्या लॉबी गोव्याचे लचके तोडत असताना, गोव्याचे काँक्रिटीकरण होत असताना गोमंतकीय माणूस शांत कसा बसेल?

- सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा

गोवा फॉर गोवन्स ओन्ली’ अशा प्रकारची स्थिती कधी अस्तित्वात येऊ शकत नाही, अशा अर्थाचे विधान गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांनी गेल्या आठवड्यात केले. गोवा राज्य हे फक्त गोमंतकीयांसाठीच असावे, अशी भूमिका घेता येत नाहीत, अशा प्रकारचा मुद्दा राज्यपालांनी मांडला आहे. आतापर्यंत राज्यपाल पदावरील व्यक्तीने या विषयाला स्पर्श केला नव्हता. राज्यपाल जे बोलले ते गैर नाही. तरी देखील सध्या वेग पकडत असलेल्या ‘गोवा फॉर गोवन्स’ या घोषणेमागील भूमिका काय आहे, मूळ प्रेरणा काय आहे, हे समजून घ्यावे लागेल. कोणतेच राज्य हे आताच्या काळात केवळ भूमिपूत्रांसाठी म्हणून मर्यादित राहू शकत नाही. 

देशाच्या विभिन्न भागांतील माणसे स्थलांतर करत असतात. उपजीविकेच्या शोधात मूळ गोयंकारदेखील जगभर पोहोचला आहेच. गोवा मुक्त होण्यापूर्वीही गोमंतकीयांनी स्थलांतर केले आणि आताही तेच सुरू आहे.  शिक्षणाचा फारसा प्रसार नव्हता, तेव्हाही हिंदू व ख्रिस्ती गोमंतकीय  मुंबईसह सगळीकडेच जाऊन स्थायिक झाले. आता आयटीच्या पदव्या घेतलेले किंवा अन्य व्यवसाय कौशल्य असलेले गोमंतकीयही गोव्याबाहेर जाऊन राहत आहेत. ही प्रक्रिया सुरूच राहील. 

तरीदेखील गोव्याचा निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, भाषा आणि गोव्याचे स्वत:चे वेगळेपण अबाधित राहायलाच हवे. ‘गोवा फॉर गोवन्स ओन्ली’ या स्थानिक आग्रहामागे ही भावना आहे.  स्थलांतरित मजुरांना सन्मानाने वागवा, भेदभाव करू नका, असा मुद्दा कार्डीनल फिलीप नेरी फेर्राव यांनी अलीकडेच मांडला. स्थलांतरित मजुरांविषयी ग्रामीण भागात अलीकडे चीड निर्माण होऊ लागलीय. कारण  गुन्ह्यांमध्ये वाढलेला सहभाग! खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीला या मजुरांनाच जबाबदार धरले. आर्चबिशप किंवा कार्डीनल यांनी कधी या मुद्द्यावर भाष्य केले नव्हते. फिलिप नेरी फेर्राव यांनी भाष्य करण्याचे धाडस दाखवले व ते सकारात्मक बोलले! 

मूळ गोमंतकीयांमध्ये गोंयकारपणाचे तत्त्व कायम राखण्यासाठी जो आग्रह मूळ धरू पाहतो आहे, तो नजरेआड करता येणार नाही. महाराष्ट्रात भूमिपुत्रांचा मुद्दा शिवसेनेने गाजविला होता; पण काळाच्या कसोटीवर पुढे जास्त वर्षे तो आग्रह टिकला नाही. मग सेनेने स्वत:च्या राजकारणाचा बाज व ब्रँड बदलला. गोवा फॉरवर्ड पक्षाने २०१७ च्या निवडणुकीत गोयंकारपणाचा मुद्दा पुढे केला होता. त्याला मर्यादित प्रतिसाद लाभला. आता रिव्होल्युशनरी गोवन्सने अधिक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आरजीने गेल्या निवडणुकीत १० टक्के मते मिळवली. 

आरजीच्या युवकांमधील अंगार व जोम  नवा आहे. गोयंकारांचे हितरक्षण व्हायला हवे हा आरजीचा हेतू  गैर म्हणता येणार नाही. गोव्याचे खरे सोंदर्य हे गोयंकारपण टिकविण्यात आहे म्हणूनच तर महाराष्ट्रात विलीनीकरणाचा प्रस्ताव गोमंतकीयांनी १९६४ साली फेटाळून लावला. 

- मात्र ‘गोवा फॉर गोवन्स’ असे म्हणतानाच पूर्ण भारतीय समाजासाठी राज्याची दारे बंद करता येत नाहीत. अशावेळी गोवा सरकारला आर्थिक धोरणेच अशी तयार करावी लागतील, की गोमंतकीयांनाच नोकऱ्या मिळतील. कामाची कंत्राटे प्राप्त होतील. विकासाच्या संधी अधिकाधिक मिळतील. सरकार ते करत नाही. राज्यपाल पिल्लई यांनी गोवा फॉर गोवन्स असे होऊ शकत नाही, असे धाडसाने सांगितले. मात्र गोव्यातील शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना नष्ट करून परप्रांतीयांचे खुल्या दिलाने स्वागत करणे या राज्यातील जनता आता फार काळ सहन करणार नाही, हेही खरेच आहे! त्यासाठी अगोदर स्थानिकांचे हित असेल अशीच धोरणे पुढे नेण्यास राज्यपालांनी सावंत सरकारला सांगितले तर मग गोवा फॉर गोवन्स अशी वेगळी घोषणाही लोकांना करावी लागणार नाही.  दिल्ली व अन्य ठिकाणच्या लॉबीज गोव्याचे लचके तोडत असताना, गोव्याचे पूर्ण काँक्रिटीकरण करत असताना गोमंतकीय माणूस शांत कसा बसेल?

टॅग्स :goaगोवा