शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

गोवा ...तर खाण उद्योग पुन्हा बंद

By admin | Published: June 11, 2017 1:45 AM

शासकीय यंत्रणा, न्यायालये, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी गोव्यातील खनिज खाण उद्योग क्षेत्रातील नियमभंगांची गंभीर दखल घेणे सुरू केले आहे.

- सदगुरु पाटीलशासकीय यंत्रणा, न्यायालये, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी गोव्यातील खनिज खाण उद्योग क्षेत्रातील नियमभंगांची गंभीर दखल घेणे सुरू केले आहे. त्यामुळे खनिज खाण उद्योगाचे भवितव्य पुन्हा एकदा डळमळीत झालेले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक भूमिका घेतल्यामुळेच गोव्यातील बारा खनिज खाणी गेले महिनाभर बंदच आहेत. अन्य खनिज लिजधारकांनाही सध्या कडक चाचणीच्या अग्निदिव्यातून जावे लागत आहे.गोव्याच्या खाण व्यवसाय क्षेत्रात केवळ गोमंतकीयच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार येथील हजारो व्यक्ती काम करतात. सध्या वार्षिक सरासरी वीस दशलक्ष टन खनिजाची गोव्याहून चीन व अन्यत्र निर्यात होते. २०१२ साली गोव्याचा खनिज खाण व्यवसाय निवृत्त न्या. शहा यांनी दाखवून दिलेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्यानंतर बंद झाला होता. पण गोव्याचे पर्यावरण, शेती व्यवसाय, जलस्रोत यात खाणबंदीच्या तीन वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाली. २०१५ सालानंतर गोव्याचा खनिज खाण व्यवसाय नव्याने सुरू झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविण्यापूर्वी ज्या सूचना गोव्याच्या खाण उद्योगाला, खाण खात्याला, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, इंडियन ब्युरो आॅफ माइन्स व एकूणच सरकारी यंत्रणांना केल्या होत्या, त्या सर्व सूचनांचे पालन झालेले नाही. गोव्यात स्वतंत्र मायनिंग कॉरिडॉरचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव सरकारने पुढे आणला होता; पण त्या आघाडीवर काही घडले नाही.गोव्यात वार्षिक सरसरी ४५ दशलक्ष टन खनिज उत्पादन होत होते. त्यातून पस्तीस हजार कोटींचा खनिज खाण घोटाळा घडला. पोलिसांची विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) त्या खाण घोटाळ्यांची चौकशी करत आहे. सत्तेत असताना अनेक वर्षे खाण खाते आपल्याकडे ठेवलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा सध्या एसआयटीने लावला आहे. सध्या पावसाळा असल्याने खाण व्यवसाय तात्पुरता बंद ठेवला गेला आहे. मात्र, खाण क्षेत्रातील अंदाधुंदी सुरूच राहिली तर पुन्हा गोव्याला पूर्ण खाणबंदीस सामोरे जावे लागू शकते, असे गोवा फाउंडेशन या बेकायदा खाणविरोधी चळवळीतील अत्यंत नावाजलेल्या संस्थेसह अन्य पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.पर्यटनाप्रमाणेच खाण हा गोव्याचा मोठा व्यवसाय असला तरी, सर्वोच्च न्यायालयाने २०१२ साली बंदी लागू करण्यापूर्वी खाण क्षेत्रात जी अंदाधुंदी सुरू होती, तीच स्थिती आता देखील सुरू आहे. खाण व्यावसायिक मुळीच सुधारलेले नाहीत. ही स्थिती अशीच कायम राहिली तर, पुन्हा गोव्याला खाणबंदीस सामोरे जावे लागू शकते.- डॉ. क्लॉड अल्वारीस, ज्येष्ठ पर्यावरणवादीखनिज खाण प्रदूषणाचा अनुभव घ्यायचा असेल तर कुणीही खाण व्यवसाय सुरू असताना ‘सोनशी’च्या पट्ट्यात फिरून पाहावे. पर्यावरणाची हानी हा विषय तर आहेच; पण लोकांच्या आरोग्याचे प्रश्न अंदाधुंद खाण व्यवसायामुळे गोव्यात निर्माण झाले आहेत.- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी