शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

कल्पना चांगली पण..

By admin | Published: March 28, 2016 3:41 AM

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून

संत तुकाराम म्हणायचे, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’. पण अलीकडे अशी पावले दिसेनाशी होत चालली आहेत. काही जण केवळ औपचारिकता म्हणून बोलतात तर काही वेळ निभावून नेण्यासाठी बोलतात. नेतेमंडळींच्या बोलण्याला तर लोक बऱ्यापैकी ओळखून असतात. जे केवळ बोलण्यासाठीच असते, ते कृतीत उतरण्याचा प्रश्नच नसतो. कारण वांझोट्या बोलाकडून अपेक्षा बाळगणे म्हणजे निव्वळ भाबडेपणाच ठरत असतो. पण अशाही सभोवतालच्या वातावरणात काही जण बोलतात, कल्पनाही मांडतात आणि त्याला कृतीची जोडही देतात, त्यामुळे त्या बोलण्याला नैतिक अर्थ प्राप्त होत असतो. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधी पदरमोड करून मदत केली त्यानंतर दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांना मदतीसाठी आवाहन केले होते. त्यास उत्तम प्रतिसादही लाभू लागला आहे. तोच कित्ता गिरवित नागपूर येथे ‘नाम’ फाउंडेशनच्या कार्याला आर्थिक हातभार लावून प्रयोगशील नाटककार महेश एलकुंचवार यांनी उक्ती आणि कृतीची सांगड घालून दिली आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचे कौतुक करून एलकुंचवार यांनी राज्यातील सुखवस्तू परिवारांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एका पाल्याला शिक्षण आणि इतर कार्यासाठी दत्तक घेण्याचे आवाहन केले. एलकुंचवार केवळ आवाहन करूनच थांबले नाहीत, तर त्या कामाला आपल्यापासून सुरुवात व्हावी म्हणून त्यांना पुणे येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी अध्यक्ष म्हणून मिळालेला एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यांनी दिलेल्या रकमेला जेवढे मोल आहे, त्यापेक्षा दु:खितांच्या अश्रूंचे मोल जाणण्याची भावना अधिक महत्त्वाची आहे. त्याच भावनेतून त्यांनी केलेल्या आवाहनाला दाद देऊन सुखवस्तू कुटुंबांनी पुढाकार घेतला तर दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ती एक झुळूक ठरणार आहे. त्यासाठी पुढाकार कोण घेईल हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.