शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

‘जीएसटी’ लटकणार

By admin | Published: May 10, 2016 2:34 AM

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा

मोदी सरकार जसे केंद्रात सत्तेवर आले तसे संसदेचे कामकाज सुरळीतणे सुरू नाही. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा व्हावी आणि त्यातून मार्ग निघावा, यासाठीच संसद नावाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी एकत्र येतात की, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कायदे करण्यासाठी असलेले हे लोकशाहीचे पवित्र मंदिर व्यवस्थितपणे चालविणे, ही देशातील प्रमुख पक्षांची विशेषत: भाजपा आणि काँग्रेसची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी दोन्ही पक्ष पार पाडताना दिसून येत नाहीत. देशात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी लागू करण्यासाठीचे घटना दुरुस्ती विधेयकाने लटकायचे तरी किती दिवस? जनतेने या बहुचर्चित कराची आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? हे सवाल संसदेचे प्रत्येक अधिवेशन संपताना सातत्याने उपस्थित होत आहेत. भारत देश इतका विस्तीर्ण आहे की, त्याच्या कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये दुर्दैवी घटना घडत असतात. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संघटनांची आंदोलने होतात त्यांना कधी हिंसक स्वरूप प्राप्त होत असते. भ्रष्टाचाराची प्रकरणे उपस्थित होत असतात. या साऱ्यांसंदर्भात कृती, कारवाई करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशात आहेत; पण तरीही त्या कधी लोकसभेत, तर कधी राज्यसभेत उपस्थित करून गोंधळ घातला जातो अन् संसदेच्या अधिवेशनावर पाणी फेरले जाते. यामुळेच लोकसभेत पारीत झालेले ‘जीएसटी’ विधेयक राज्यसभेत लटकले जात आहे. राज्यसभेत सरकार बहुमतात नसल्यामुळेही हे घडत आहे; पण या स्थितीत केवळ जनतेच्या हिताचा विचार करून विरोधी पक्षाने अशी महत्त्वपूर्ण विधेयके पारीत होण्याला सरकारला मदत करणे अपेक्षित असते; पण कुरघोडीच्या राजकारणामुळे तसे होत नाही. गत अधिवेशनांमध्ये असहिष्णुता, रोहित वेमुला आत्महत्त्या प्रकरण, ‘जेएनयू’मधील घडामोडी आणि जाट आरक्षण आंदोलनामुळे विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. आता आॅगस्ट वेस्टलॅण्डच्या प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात रणकंदन सुरू आहे. त्यामुळे याही अधिवेशनात ‘जीएसटी’ लटकणार हे निश्चित आहे. खरं म्हणजे देशातील ग्राहक आणि व्यापाऱ्यांना राज्य आणि केंद्राच्या विविध करांच्या किचकटपणातून सुटका करणारे आणि उत्पादन, विक्री, वापर आणि सेवा या टप्प्यांवर देशव्यापी एकाच करप्रणालीचा मार्ग प्रशस्त करणारे हे विधेयक लवकरात लवकर पारीत होण्यासाठी राजकीय पक्षांनी व सरकारने गंभीर झाले पाहिजे कारण जनतेच्या संयमालाही मर्यादा असतात.