शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

पक्ष फोडाफोडीच्या संभ्रम-काळात अविचल निष्ठेचा सन्मान

By अतुल कुलकर्णी | Updated: July 30, 2024 08:12 IST

सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ बागडे यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले, ही आजच्या काळात मोठी सुखद बातमी!

अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई.

या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा हा काळ. पक्षनिष्ठा, नेत्यांविषयीची निष्ठा या गोष्टी दिवसेंदिवस दुर्मीळ होत असणारा हा काळ. फोडाफोडीचे राजकारण हेच खरे राजकारण; हे आजचे वास्तव. एखादा नेता सलग दोन वर्षे एका पक्षात राहिला तर आश्चर्य वाटावे अशी स्थिती असणारा हा काळ. अशा काळात सलग ४० वर्षे एकाच पक्षात राहून सक्रिय राजकारण करणाऱ्या हरिभाऊ किशनराव बागडे ऊर्फ नाना यांना त्यांच्या पक्षाने निष्ठेचे फळ दिले आहे. 

राजस्थानच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. (वसंतदादा पाटील, प्रभा राव, प्रतिभाताई पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, राम नाईक आणि आता हरिभाऊ बागडे. महाराष्ट्रातल्या नेत्यांना राजस्थानमध्येच राज्यपाल का नेमले जाते हा एका वेगळ्या लेखाचा विषय.) त्यांचा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील जुने-नवे राजकारणी हरिभाऊ बागडे यांना नाना या नावाने ओळखतात. ‘बागडे साहेब’ असे कोणी त्यांना म्हटले की ते त्याला ‘नाना म्हणत जा’ असे सांगतात. त्याने आपुलकी वाटते असे त्यांचे म्हणणे. पूर्वीच्या जनसंघापासून नानांनी राजकारणाची सुरुवात केली. 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याने त्यांना आकर्षित केले. पुढे त्यांच्याच नावाची शिक्षण संस्था काढून त्यांनी ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय सुरू केले. १९७२-७३ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दुष्काळ विमोचन समितीचे प्रमुख कार्यवाहक म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली. शेतकरी, सहकार आणि ग्रामीण राजकारण यांची नस जाणून असल्याने नाना टिकून राहिले. ते किती वेळा आमदार झाले, मंत्री झाले याचा तपशील सर्वत्र उपलब्ध आहे. मात्र माणूस म्हणून त्यांचे वेगळेपण त्यांच्या कामातून त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते कायम त्यांच्या भाषणात दादासाहेब मावळणकरांचा  किस्सा सांगायचे. मावळणकर लोकसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा दिल्लीत एक नातेवाईक त्यांच्याकडे गेला. अर्थशास्त्राचा पदवीधर होता. दादासाहेबांनी नियोजन आयोगात त्याची शिफारस करावी अशी त्याची इच्छा होती. दादासाहेबांनी दोन दिवस त्याला घरी जेवायला बोलावले.

तिसऱ्या दिवशी सांगितले, ‘तू तुझ्या मूळ गावी परत जा. तिथे तुझी मी काही व्यवस्था लावता येते का बघतो. नियोजन आयोग ही काही तुझी जागा नव्हे!’  त्या तरुणाने कारण विचारल्यावर दादासाहेब म्हणाले, ‘माझ्यासोबत तू दोन वेळा जेवलास. पहिल्या वेळी  एक पोळी जास्त मागून घेतली आणि ताटात टाकून दिलीस. दुसऱ्या दिवशी भाजी आणि भात जास्तीचा मागून घेऊन तोही पुरता खाल्ला नाहीस. ज्या तरुणाला आपल्या पोटातली भूक किती आणि ताटात किती वाढून घ्यायचे याचे नियोजन करता येत नाही, तो देशाच्या विकास खर्चाचे नियोजन कसे करणार..?’ दादासाहेबांच्या या उत्तराने तो तरुण खजिल झाला... विधानसभेत नाना हा किस्सा सतत सांगत. मात्र ‘आज आपण कोणत्या पक्षात आहोत आणि उद्या कुठल्या पक्षात जायचे आहे’ याच्याच नियोजनात मग्न असणाऱ्यांना त्यातले मर्म किती उलगडेल, कोणास ठाऊक..?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना नानांनी पारदर्शक कारभार दाखवण्यासाठी धान्य खरेदीच्या निविदा ज्या दिवशी उघडणार होत्या, त्या दिवशी मंत्रालय कव्हर करणाऱ्या सर्व पत्रकारांना बोलावले. त्यांच्या समक्ष निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले. इतक्या पारदर्शकतेत कसलीही मसालेदार बातमी न मिळाल्यामुळे कोणी त्याचे फारसे कव्हरेज केले नाही ही बाब वेगळी!  विधानसभेचे अध्यक्ष असताना लोकप्रतिनिधींना बोलावून ‘अमुक विषय तुम्ही सभागृहात मांडा. हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे’, असे सांगणारे नाना मी पाहिले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या आडनावाचा उल्लेख नाना अनेकदा वट्टेडीवार असा करायचे. शेवटी एकदा वडेट्टीवार यांना नानांनी भेटून त्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यानंतर सभागृहात आल्यावर नानांनी वडेट्टीवार यांचे आडनाव बरोबर घेतले खरे, पण ‘आता मी वट्टेडीवार म्हणालो नाही’ असेही सांगितले. सभागृहात एकच हशा पिकला. 

असे  हसत-खेळत सभागृहाचे कामकाज चालवणे आणि प्रसंगी विरोधकांकडे पूर्णपणे पाठ करून सत्ताधाऱ्यांना हवे असणारे कामकाज नेमके काढून देणे यात नानांचा हातखंडा होता. आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले आहेत. महाराष्ट्र आणि राजस्थानचे राजकीय नातेसंबंध चांगले की वाईट हे पक्ष आणि त्यांचे नेते ठरवतील. पण यानिमित्त महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये जाणाऱ्यांना एक हक्काचे घर हरिभाऊ बागडे यांच्यामुळे मिळाले आहे. श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल असताना महाराष्ट्रातून येणाऱ्यांचा ज्या आपुलकीने मान सन्मान करायचे, तसेच आदरातिथ्य आता महाराष्ट्रातल्या लोकांना राजस्थानमध्ये मिळेल यात शंका नाही.atul.kulkarni@lokmat.com

 

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेRajasthanराजस्थान