शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 7:38 AM

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पहिला सामना भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पहिला सामना भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तेवर येईल, असे चित्र कधी नव्हतेच. त्यामुळे सगळे लक्ष हरयाणावर होते आणि तिथे सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येत आहे. पाच वर्षे भाजपसोबत संसार केलेल्या दुष्यंत चाैतालांच्या पक्षाचे पानिपत झाले आहे. आता महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणुकीला सामाेरे जाताना भाजपचा व महायुतीचा विश्वास दुणावलेला असेल. या निकालांनी अनेकांना धक्का दिला, धडा शिकविला. 

लोकसभेसारखेच एक्झिट पोल पुन्हा फसले. विशेषत: हरयाणात. लोकसभेच्या निम्म्या जागा जिंकणारी काँग्रेस सहज सत्तेवर येईल, भाजपला हॅट्रिक साधणार नाही, हा अंदाज सपशेल खोटा ठरला. किसान, जवान व पहेलवानांच्या भरवशावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसला जोरदार धक्का बसला. हे जाटबहुल राज्य असले तरी केवळ एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही, हे सिद्ध झाले. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांना हा मोठा धक्का आहे. दलित व महिला चेहरा कुमारी शैलजा यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न हुड्डा यांच्या अंगलट आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसजवळ आलेले दलित मतदार दूर गेले. इंडिया आघाडीत फूट, आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात, काँग्रेसमधील गटबाजी, हवेतला प्रचार,  विधानसभा निवडणुकीचे वेगळेपण लक्षात घेण्यात आलेले अपयश, ही काँग्रेसच्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत. 

याउलट, भारतीय जनता पक्ष ही निवडणूक युद्धासारखी लढला. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा नवा चेहरा पुढे आणला. प्रत्येक मतदारसंघात विरोधी मतांच्या विभाजनाचे सूक्ष्म नियोजन केले. अग्निवीर योजनेत दुरुस्ती केली व तिचा जोरदार प्रचारही केला. लाभार्थी व्होटबँकेवर अधिक काम केले. गैरजाट समाजांची मोट बांधली. बलात्कारी राम रहीम याला निवडणुकीसाठी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर काढल्याचा आरोप झाला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून भाजपने निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. याउलट इंडिया आघाडीला यातून खूप काही शिकावे लागेल. लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस हवेत होती. छोटे यश डोक्यात गेले. 

इंडिया आघाडीचा जमिनीपासून दोन बोटे वर चालणारा रथ जमिनीवर आला. काँग्रेस तसेच इंडिया आघाडीला अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. भाजपविरोधात थेट विजय अजूनही काँग्रेसला शक्य नाही. विरोधकांची एकजूट हवीच. त्यासाठी नेत्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवायला हव्यात. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेसने आता ज्येष्ठांना दूर ठेवायला हवे. कमलनाथ, अशोक गहलोत व आता भूपिंदरसिंह हुड्डा असा इजा, बिजा, तिजा झाला आहे. या ढढ्ढाचार्यांच्या दरबारी राजकारणाला लोक कंटाळले आहेत. 

पक्षाची परिस्थिती थोडी सुधारली की, लगेच या नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडायला लागतात व त्यापाठी धावताना ते पक्षाचे मोठे नुकसान करतात. जम्मू-काश्मीर हा महत्त्वाचा प्रांत या निवडणुकीने पुन्हा मुख्य राजकीय प्रवाहात आला आहे. तिथे दहा वर्षांनंतर निवडणूक झाली. दरम्यान, ३७० वे कलम हटले, विशेष दर्जा गेला, जुन्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश बनले. तरीही ६० टक्क्यांहून अधिक मतदान करून तेथील जनतेने निवडणूक प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला. तेथील जनमताचा काैल राजकीय अभिनिवेशाच्या पलीकडे विचारात घ्यायला हवा. तिथे नॅशनल काॅन्फरन्स व काँग्रेसची इंडिया आघाडी सत्तेवर येणे चांगली गोष्ट आहे. अब्दुल्लांच्या तीन पिढ्यांचा तिथे प्रभाव आहे आणि हे घराणे भारताच्या हिताची स्पष्ट भूमिका घेण्यासाठी ओळखले जाते. गेल्यावेळी फुटीरवाद्यांप्रती सहानुभूती असलेल्या पीडीपीला भाजपने सोबत घेणे लोकांना रुचले नव्हते. अर्थात, यात एक राजकीय तिढादेखील आहे. 

जम्मू आणि काश्मीर हे दोन प्रदेश धार्मिक, सामाजिक, भाैगोलिक व राजकीय अशा सगळ्याच दृष्टींनी वेगळे आहेत. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला हिंदूबहुल जम्मूमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो, तर काश्मीर खोऱ्यात याच कारणाने तो पक्ष अत्यंत कमकुवत आहे. त्यातूनच जम्मूमध्ये अधिकाधिक जागा जिंकायच्या आणि खोऱ्यातील प्रादेशिक पक्षांमधील एखाद्याला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची हा प्रयोग भाजपने याआधी केला. आताही तसाच मनसुबा होता. तथापि, खोऱ्यात नॅशनल काॅन्फरन्सने एकहाती यश मिळविल्याने ही योजना उधळली गेली. आता जम्मू-काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावा ही मागणी जाेर धरील. केंद्रशासित लडाखमधूनही तशीच मागणी होत आहे. यावर पुढचे राजकारण कसे आकार घेते याकडे देशाचे लक्ष असेल. 

 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस