शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

हवाहवासा ‘हवाई’ विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 12:32 AM

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे.

‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने विकास करीत असलेल्या नागपूर शहराचे नाव देशाच्या हवाई नकाशावर ठळकपणे घेतल्या जात आहे. नागपूरसह विदर्भात विमान प्रवासाची आवश्यकता सर्वसामान्यांदेखील वाटत असून २०१७ या वर्षभरात नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थोड्याथोडक्या नव्हे तर १० लाख प्रवाशांनी उड्डाण केले. मोठ्या शहरांच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी ही ‘मिलियन’भरारी भविष्यातील संधी आणि बदलांचे संकेत देणारी आहे. उपराजधानीची वाटचाल देशातील प्रमुख हवाई शहरांकडे होत असल्याचेच हे द्योतक आहे. भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपूरचा महामार्ग व रेल्वेच्या तुलनेत क्षमता असूनदेखील ‘हवाई’ क्षेत्रात हवा तसा विकास झाला नाही. विमानतळाचा विस्तारदेखील विविध तांत्रिक बाबींमध्ये अडकला व राजकीय इच्छाशक्तीचीदेखील साथ मिळाली नाही. मात्र गेल्या दशकापासून हे चित्र पालटताना दिसून येत आहे. मध्य भारतातील एक महत्त्वाचे विमानतळ अशी नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. येथील विमानांची वर्दळ वाढली असून खासगी विमानांची वाढती संख्या ही शहराचे वाढते महत्त्व स्पष्ट करणारी आहे. विमानप्रवास हे केवळ ‘व्हीआयपी’ व धनाढ्यांच्या प्रवासाचे साधन राहिलेले नाही. मुंबई, पुणे किंवा इतर शहरात जाण्यासाठी रेल्वेलाच प्राधान्य देणारी मंडळी आता बिनदिक्कतपणे विमानप्रवासाकडे वळत आहेत. नागपूरप्रमाणेच विदर्भात गोंदिया, अकोला, अमरावती येथे विमानतळ आहेत. गोंदिया येथील बिरसी विमानतळाची धावपट्टी तर बरीच जुनी आहे. या विमानतळांसाठीदेखील येणारा काळ चांगला राहू शकतो. २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी लहान विमानतळांच्या विकासासाठी घोषणाच केली. ‘हवाई चप्पल’ वापरणाºया सर्वसामान्य मनुष्यालादेखील विमानप्रवास करता यावा, यासाठी केंद्राकडून ‘उडान’ योजनेला बळकटी देण्यात येणार आहे. फारशी वापरात नसलेली ५६ विमानतळे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. याची अंमलबजावणी जर योग्य पद्धतीने झाली तर विदर्भातील ‘हवाई’ क्षेत्राला नक्कीच ‘अच्छे दिन’ येतील. येथील विमानतळांचा विकास करण्यासाठी राजकीय पुढाकारदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. नागपूरबाबत तशी पावले उचलण्यात येत आहेत. इतर विमानतळांनादेखील प्राधान्य दिले गेले तर विदर्भात उद्योग स्थापनेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीकडे ते एक मोठे पाऊल ठरेल. असा ‘हवाई’ विकास उद्योगक्षेत्रापासून ते सर्वसामान्यांना हवाहवासाच वाटेल यात शंका नाही.