शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

‘आॅनलाईन’वर टाच

By admin | Published: March 16, 2016 8:39 AM

संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे ग्राहकोपयोगी वस्तुंचे किरकोळीतील आॅनलाईन खरेदी व्यवहार गेल्या काही काळापासून भूमितीय पद्धतीने

संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणारे ग्राहकोपयोगी वस्तुंचे किरकोळीतील आॅनलाईन खरेदी व्यवहार गेल्या काही काळापासून भूमितीय पद्धतीने वृद्धिंगत होत चालल्याने अशा उत्पादनांची बाजारात दुकाने थाटून विक्री करणाऱ्या व कमालीच्या हादरलेल्या व्यापारी-दुकानदार यांना दिलासा देण्याचा जो निर्णय उत्तराखंड, बिहार आणि आसाम या राज्यांनी घेतला आहे त्याचाच कित्ता देशातील अन्य काही राज्येही गिरविण्याची शक्यता असल्याने आता हादरुन जाण्याची वेळ तीच सेवा आॅनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या आस्थापनांवर आली आहे. अशा अनेक आस्थापना आज अस्तित्वात आहेत व मेक इन इंडिया अंतर्गत आणखी काही येऊ घातल्या आहेत. अगदी वाणसामानापासून दागदागिन्यांपर्यत आणि कपडेलत्त्यापासून पुस्तकांपर्यंत सारे काही त्यांच्या माध्यमातून खरेदी करता येते. केवळ तितकेच नव्हे तर खरेदी केलेली एखादी वस्तू पसंत पडली नाही तर ती तत्काळ परत घेऊन पैसे परत करण्याची सोयदेखील यातील अनेक आस्थापनांनी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आॅनलाईन खरेदी व्यवहारात वाढ होत जाणे अगदी स्वाभाविकच आहे. अर्थात अशा संस्थांचे व्यवहार अवाढव्य असले तरी अजून या लाऱ्या संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम झालेल्या नाहीत व तोच त्यांच्यावर आता टाच येऊ घातली आहे. ग्राहकाना घरबसल्या निवडीला मोठा वाव आणि बसल्या बसल्याच खरेदी या लाभाखेरीज अशा व्यवहारांमध्ये मोठा आर्थिक लाभदेखील प्राप्त होत असतो. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यापारी-दुकानदारांना मोठमोठाली दुकाने थाटून जो प्रचंड खर्च करणे क्रमप्राप्त असते तो आॅनलाईन आस्थापनांना करावा लागत नाही. त्याशिवाय स्थानिक कर वगैरेदेखील त्यांना द्यावा लागत नाही. आता वरील तिन्ही राज्यांनी आॅनलाईन विक्री होणाऱ्या आणि त्यांच्या राज्यात खेरदी केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या किंमतीवर दहा टक्के प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शुल्काची आकारणी कुरीयर संस्थांमार्फत केली जाणार आहे. एका आॅनलाईन आस्थापनेने या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धावदेखील घेतली आहे. संबंधित राज्य सरकारचा निर्णय दुजाभाव दर्शविणारा व घटनाबाह्य असल्याचा संबंधितांचा दावा आहे. किरकोळीने पण आॅफलाईन विक्री व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटनशक्तीच्या दबावासमोर राज्य सरकारे दबली गेल्याचा आरोप करतानाच हा निर्र्णय दुहेरी कर आकारणी करतो असा त्यांचा आक्षेप आहे. सरकार एकीकडे ग्राहक हिताचा प्रचार करीत असताना जो व्यवहार ग्राहकाला किफायतशीर वाटतो तो करु देण्यात अशा पद्धतीने अटकाव करणे कितपत योग्य आणि समर्थनीय असा एक व्यावहारिक प्रश्न यातूनही निर्माण होतो.