शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

सर्वोच्च घूमजाव

By admin | Published: August 09, 2015 9:56 PM

भारतीय संसदेने संमत केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखणे

भारतीय संसदेने संमत केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे आणि हे स्वातंत्र्य अबाधित राखणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे, असे निक्षून सांगत हे कलम रद्द करण्याची भूमिका घेणाऱ्या त्याच सर्वोच्च न्यायालयाने आता सोशल मीडियावर बंधने लागू करण्यासाठी संसदेने तत्काळ हालचाल करून नवा कायदा संमत करावा, असे सांगणे यालाच सर्वोच्च घूमजाव असे म्हणता येईल. सोशल मीडियात समाविष्ट होणाऱ्या फेसबुक आणि ट्विटर यांच्या तुलनेत व्हॉट्स अ‍ॅप हे माध्यम दिवसेंदिवस तापदायक ठरत चालले आहे. दुर्दैवाने एरवी अत्यंत उपयुक्त ठरण्याची क्षमता असणाऱ्या या विशिष्ट माध्यमाचा प्रारंभच शून्य वा उणे विश्वासार्हतेने झाला आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक वा व्यावसायिक संघटनांनी समविचारी लोकांचे ग्रुप या माध्यमाच्या आधारे तयार केले असून, त्यापैकी अनेकांचे स्वरूप ‘टेरर ग्रुप’समान झाले आहे. मुळात स्वातंत्र्य कोणतेही असो, ते कधीही अनिर्बन्ध असू शकत नाही. राज्यघटनेतील मूलभूत स्वातंत्र्येदेखील अनिर्बन्ध नाहीत. पण भारतातले सुजाण नागरिक त्यांना बहाल केलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचा वापर विवेकाने करतील, अशी घटनाकारांची अपेक्षा असावी. पण ती फोल ठरत चालल्याचे याआधीच उघड होत चालले होते. पण सामाजिक माध्यमांचा उदय झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कडेलोटापर्यंत वापर सुरू झाला तेव्हाच सरकारला कायदा करणे भाग पडले. याच कायद्यातील विशिष्ट तरतुदीला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले. ते ठरविताना न्यायालयासमोर ज्या बाबी आल्या, त्यात संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडून निश्चितच हडेलहप्पी झाली. पण म्हणून कायदाच चुकीचा हा निष्कर्ष तितकाच अतिरेकी होता, ही बाब आता खु्द्द त्याच न्यायालयाने मान्य केली हे बरे झाले. त्याला याच न्यायालयात व्यवसाय करणारे ज्येष्ठ विधिज्ञ एल. नागेश्वरराव कारणीभूत ठरले. त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचा एक तद्दन खोटा संदेश म्हणे व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होता (याला व्हायरल होणे म्हणतात). राव यांना त्याची कल्पनाही नव्हती. अपघाताने त्यांना ती आली तोवर त्यांची बरीच मोठी बदनामी होऊन गेली होती. राव यांच्या कथनाला अन्य विधिज्ञ के. पराशरन यांनीदेखील जेव्हा दुजोरा दिला तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातली आपली नवी भूमिका जाहीर केली. कोणाच्याही विरोधात बदनामीकारक संदेशांचे वहन करण्याचा मुक्त परवाना दिला जाऊ शकत नाही, हे न्यायालयाचे यासंदर्भातील विधान पुरेसे बोलके म्हणावे लागेल.