शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

घर घेता का घर ?

By admin | Published: May 09, 2016 2:51 AM

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे

नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकरांच्या ‘कोणी घर देता का घर’ या आर्त सवालात किंचितसा बदल करून ‘घर घेता का घर’ असे म्हणण्याची वेळ देशातील बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. कारण, घरांच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के तर व्यावसायिक जागांच्या विक्रीत ३५ ते ४० टक्के घसरण झाली आहे. उद्योग व वाणिज्य क्षेत्रांतील नामांकित संस्था ‘असोचेम’ने जाहीर केलेल्या अहवालानुसार राजधानी दिल्लीत अडीच लाख म्हणजे बांधकाम झालेल्या घरांपैकी सुमारे ३५ टक्के घरे विक्रीअभावी पडून आहेत, तर त्यापाठोपाठ मुंबई महानगराचा नंबर लागतो. तेथे सुमारे एक लाख घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत उभी आहेत. दिल्ली, मुंबईचेच काय, राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबादसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरांमध्येही हीच स्थिती पाहावयास मिळत असून, केवळ भू-विकासक अथवा बांधकाम व्यावसायिकांच्याच दृष्टीने नव्हे तर, या व्यवसायाशी निगडीत सर्वच घटकांसाठी ती चिंतेचीच म्हणता येणारी आहे. नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने गावाकडून शहराकडे स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढल्याने मोठ्या शहरांतील बांधकाम व्यवसाय भरभराटीस आला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, चेन्नईप्रमाणेच हैदराबाद, अहमदाबाद, पुण्यासारखी शहरे अस्ताव्यस्त वाढत आहेत. या शहरांमध्ये भाड्याच्या घरात राहणे महागडे ठरत असल्याने साधारण नोकरवर्गही कर्ज काढून स्वत:चे घर विकत घेऊ पाहतो. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बँकांनीही मोठा हातभार लावल्याने गृहनिर्माण व्यवसायाने जोर धरला होता. परंतु, गेल्या काही दिवसांत किमती कमी करून व बँकांचे व्याजदर घटूनही गृह खरेदी थंडावल्याने या क्षेत्रातील तेजीचा फुगा फुटला आहे. ज्यांनी मोठी गुंतवणूक करून या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यांना आज गुंतवणुकीची रक्कम काढणेही जिकिरीचे झाले आहे. या घर खरेदीतील घसरणीचा परिणाम गृहबांधणीशी संबंधित उत्पादनांसह कामगार क्षेत्रावरही अपरिहार्यपणे घडून येत आहे. गृहबांधणी क्षेत्रात सुमारे एक कोटीपेक्षा अधिक कामगार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने काही जणांना गावाकडे परतणे भाग पडत आहे. म्हणायला ही परिस्थिती ‘चलो गाव की ओर’ या संकल्पनेला पूरक ठरणारीच आहे. परंतु शहरात हाताला काम नाही म्हणून गावाकडे परतणाऱ्या लोंढ्याला तेथे तरी काय काम मिळेल हा प्रश्नच आहे. केवळ व्यावसायिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिक पातळीवरही परिणाम करणारी ही बाब आहे.