शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

आणखी किती बळी

By admin | Published: September 02, 2016 2:53 AM

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता

हल्ली सररास कायदा मोडण्याची भाषा केली जाते. कायद्यातूनही पळवाटा काढता येतात, असे म्हणत कायद्याची लक्तरे अनेकदा वेशीवर टांगली जातात. असेच करता करता एक दिवस ‘आपल्या’पैकीच एक जण पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो. वरळीतल्या इवल्याशा पोलीस क्वाटर्समध्ये वास्तव्यास असलेले विलास शिंदे बुधवारच्या घटनेनंतर शहीद झालेही असतील. पण यापुढे असे किती पोलीस ‘आपण’ शहीद करणार आहोत; हा प्रश्न यानिमित्ताने मन सुन्न करणारा आहे. विलास शिंदे यांची चूक काय? तर त्यांनी केवळ हेल्मेट न घातलेल्या तरुणाला अडवले. आणि याचा राग मनात धरून तरुणाने आपल्या भावाच्या मदतीने शिंदे यांच्या डोक्यावर दांडा मारला. या हल्ल्यानंतर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिंदे यांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने शिंदे यांच्या कुटुंबीयांना देऊ केलेल्या २५ लाखांच्या मदतीने ही जखम नक्कीच भरून येणारी नाही. कारण यापूर्वी भिवंडी असो वा ठाणे; येथे वाहतूक पोलिसांना झालेल्या मारहाणीनंतरही राज्य सरकार यासंबंधात काहीच कार्यवाही करू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते. विलास शिंदे यांच्यासारखे अनेक वाहतूक पोलीस आपल्याला विविध नाक्यांवर भेटतात. आणि जर हेल्मेट घातले नसेल तर आपण त्यांना चुकवण्यात कसे माहीर झालो आहोत? याचे दाखले अनेक जण देत असतात. मात्र शिंदे यांच्यासारखे कर्तव्यदक्ष पोलीस कार्यरत आहेत, म्हणून आपण सुखासुखी झोपतो. दिवसाचे चोवीस तास ही माणसं वाहतूक नाक्यावर ताटकळत उभी असतात. ही माणसं ज्या घरात, ज्या इमारतीमध्ये वास्तव्य करतात तेथील बांधकामांना कधीच तडे गेलेले आहेत. कुठलीही पोलीस वसाहत असो. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धड पगार नाही, धड घर नाही आणि निवृत्त झाल्यानंतरचे आयुष्य कसे असेल? याची शाश्वती नाही. तरीही कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस तुम्हा-आम्हाला दुचाकी चालवताना हेल्मेटची सक्ती करतात. कारण तुमचा जीव, तुमच्याच कुटुंबासाठी हवा आहे. मशीद बंदर आणि मोहम्मद अली रोडवर वाहतूक पोलीस असूनही नसल्यासारखे असतात. कारण येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करायची म्हटले, तरी वादाला सामोरे जावे लागते. जे. जे. फ्लायओव्हरबाबत फारसे काही निराळे नाही. ही माणसं तुम्हाला आम्हाला फार काही वेगळे सांगत नाहीत. नियमांचं पालन करा, एवढाच आग्रह ते धरत असतात. तथापि, हेल्मेट न घालणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडण्यात पटाईत असलेल्या ‘पुणे’करांवर जोवर विनोद होत राहतील, तोवर विलास शिंदे यांच्या शहीद होण्याला कोणताही अर्थ प्राप्त होणार नाही.