शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

असा कसा बेभान उत्सव? बेफिकिरी रोखणे हाच उपाय शिल्लक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:04 AM

शहरांमधून आलेल्या सगळ्या बातम्या पाहा: रॉकेटने डोळ्याची पापणी फाटली, डोळ्यात रक्त साकळले व गोठले. 

देशाच्या बहुतेक भागांत आणि विशेषतः महाराष्ट्रात अतिवृष्टी, महापूर अशा अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी काळी दिवाळी साजरी केली. अशावेळी शहरांमधील बुडव मध्यमवर्गीयांनी दिवाळीत घडविलेले त्यांच्याकडील समृद्धीचे, संपत्तीचे दर्शन क्लेशदायक आहे. उंची कपडे, दागिने, गोडधोड पदार्थ यांच्याबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीने शहरांचे आसमंत यंदाच्या दीपोत्सवात कमालीचे उजळून निघाले. या शहरी मंडळींना ग्रामीण भागातील गरीब, वंचित अशा शेतकरी-शेतमजूर वर्गाचे दुःख दिसले नाही. सतत कोणत्या ना कोणत्या उत्सवात रमणाऱ्या या वर्गाने फटाक्यांच्या रूपाने एक नवे संकट स्वत:वर ओढवून घेतले आहे. शहरांमधून आलेल्या सगळ्या बातम्या पाहा: रॉकेटने डोळ्याची पापणी फाटली, डोळ्यात रक्त साकळले व गोठले. 

फटाक्यांमुळे मुलांचे चेहरे भाजले. समोरच्या इमारतीत राहणाऱ्यांवर राग असल्यामुळे खोडसाळपणे त्या दिशेने रॉकेट सोडणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. बाहेरून आलेल्या रॉकेटमुळे चार बेडरूमचा आलिशान फ्लॅट जळून खाक झाला, गोदामाला आग लागली. फटाके वाजवू नका म्हटले म्हणून मारहाण झाली. दिवाळीसारखे प्रकाशाचे पर्व साजरे करतानाही आपण बेभान होतो. सहज जाणवतील असे धोकेही आंधळे झाल्याने जाणवत नाहीत. भान हरपून आपण आपलाच जीव धोक्यात घालतो, हेच या प्रकारांमधून दिसून येते. 

अर्थात, जनतेच्या मनातले म्हणजे हिंदूचे सरकार सत्तेवर आल्यामुळे यंदा सण-उत्सव दणक्यात साजरे करा, असे आवाहन थेट राज्यकत्यांनीच केले असल्याने लोकांनी थोड्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांना कसा दोष देणार? त्यातूनच ज्यांचा विवेक अजूनही जाग्यावर आहे, अशांनी फटाक्यांच्या धोक्यांबद्दल सावध केले तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी थेट संबंधितांना देश सोडून जावे, असा इशारा दिला. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये दिवाळीच्या तीन-चार दिवसांमध्ये अग्निशमन दलाकडे नोंद झालेल्या आगीच्या घटना आणि त्यात जखमींची संख्या पाहिली तरी चित्र बरेच स्पष्ट होते. हे केवळ महाराष्ट्रात घडले असे नाही.

देशाच्या बहुतेक भागांमध्ये अशाच घटना घडल्या. राजधानी दिल्ली तर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. तो डाग पुसण्याचा एक प्रयत्न म्हणून सरकारने येत्या १ जानेवारीपर्यंत सर्व प्रकारचे फटाके उडविणे, साठवण्यावर बंदी घातली आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने भाजपने लगेच आप हा हिंदूविरोधी पक्ष असल्याचे आकांडतांडव सुरू केले. नेते, प्रवक्ते सरकारवर तुटून पडलेच; शिवाय भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि हिंदू म्हणून दिवाळी साजरी करताना फटाके वाजविण्याचा हक्क असल्याचा दावा केला. ती याचिका तातडीने सुनावणीस घेण्यास नकार देताना न्या. एम. आर. शाह व न्या. एम. एम. सुंद्रेश यांनी संबंधित खासदारांना सुनावले की, नागरिकांच्या जीवितापेक्षा तुमचा धार्मिक हक्क महत्त्वाचा नाही. 

लोकांना जरा शुद्ध हवेत श्वास घेऊ द्या. तरीदेखील बंदी असूनही दिल्लीकरांनी दिवाळीत मनसोक्त फटाके फोडलेच. फटाक्यांवर बंदीचा फज्जा उडाला. फटाकेबंदीसह इतर सारे प्रयत्न करूनही राजधानीतले प्रदूषण फार कमी झाले नाही. दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद या सर्व भागांत यंदाही श्वास घेणे मुश्कील होते. त्यातल्या त्यात समाधान एवढेच की, २०१९ पासून चार वर्षांतील किमान प्रदूषण यंदा नोंदवले गेले. अर्थात, त्यात माणसांपेक्षा निसर्गाची साथ अधिक होती. यंदा दिवाळीच्या दिवसांमध्ये राजधानी परिसरात हवा वाहती होती. त्यामुळे धूर एका ठिकाणी साचून राहिला नाही. 

खरेतर टोकाच्या धर्माभिमानी प्रचारामुळे अलीकडे धार्मिक भावना कमालीच्या टोकदार झाल्या आहेत. प्रत्येक धर्माच्या अनुयायांवर हेच बिंबविले जाते की, आपलाच धर्म संकटात आहे. त्यामुळे अशा अपघातांबद्दलदेखील काही बोलले, लिहिले की दरवेळी आमच्याच सणावेळी हे प्रदूषण वगैरे कसे काय आठवते, असे प्रतिप्रश्न केले जातात. स्वतःचा, कुटुंबातील सदस्यांचा, लहान मुले व वृद्धांचा जीव धोक्यात घालून साजरा केला जातो तो कसला उत्सव, हा प्रश्न मात्र पडत नाही. थोडक्यात सांगायचे तर आता प्रबोधन वगैरे प्रयोग मागे पडले आहेत. कायद्याने अशी बेफिकिरी रोखणे हाच उपाय शिल्लक आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022