शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 03:52 IST

उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही.

- दिनेश कांबळेउत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. स्त्री म्हणजे भोगवस्तू होय हाच विचार आतापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीत रुजत आला आहे. आज स्त्री शिक्षणाने समृद्ध झाली आहे. ती स्वत:च्या पायावर उभी राहिलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करून ती आर्थिकदृष्ट्या पुरुषावर अवलंबून राहिलेली नाही.आतापर्यंत लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावरून बऱ्याच महिला संघटनांनी आवाज उठवला. महिला आयोगाची स्थापना झाली. महिला लेखकांनीसुद्धा आपल्या साहित्यातून आवाज उठवला. सरकार बदलले; पण शासन आणि न्यायालय स्तरावर कोणतीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. विनयभंगापासून ते बलात्कार करून खुनापर्यंतच्या चौकशीमध्ये पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन स्तरावर ७५ टक्के पुरुष अधिकाºयांचा सहभाग असतो.आज स्वत:च्या पायावर उभी राहणारी स्त्री कोणत्याच क्षेत्रात सुरक्षित नाही. मग ते क्षेत्र सरकारी / खाजगी / मनोरंजन / खेळ / राजकीय असो. सरकारी सेवेत असणाºया महिलांना वेतनवाढ / बढती / बदली या भीतीपोटी त्या वरिष्ठ अधिकाºयाच्या लैंगिक शोषणास बळी पडतात. खाजगी क्षेत्रामध्ये बेरोजगारीची समस्या असल्यामुळे कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कामावरून काढून टाकण्याच्या / रोजगार जाण्याच्या भीतीपोटी महिलांना व्यवस्थापकाच्या लैंगिक शोषणास बळी पडावे लागते.शासन आणि न्यायालय स्तरावर महिलांसाठी स्वतंत्र कार्यालये जलदगतीने स्थापन केली पाहिजेत. कामाच्या ठिकाणी होणाºया लैंगिक शोषणासाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे. प्र्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष महिला कामगारांशी संपर्क साधून चौकशी केली पाहिजे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी हेल्पलाइन नंबर असला पाहिजे. ज्या चित्रपटात गुन्हेगारी विश्वातील गुंतवणूक केली जाते त्याची चौकशी केली पाहिजे. परदेशात वास्तव्य करून राहणाºया आणि भारतातील चित्रपट व्यवसायामध्ये भलीमोठी गुंतवणूक करणाºया गुन्हेगारी विश्वातील म्होरक्यांच्या मुसक्या आवळून भारतात आणण्याची घोषणा करून सत्ता मिळवली़ परंतु सत्ता संपण्याचा काळ आला तरी ही घोषणा हवेतच राहिली.जगाच्या इतिहासामध्ये जेवढे राजे झाले त्यामध्ये शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या राज्यामध्ये स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला होता. त्यांच्या राज्यात स्त्री सुरक्षित होती. स्त्रियांवर अत्याचार करणाºयांचे महाराजांनी हात-पाय तोडले, तोफेच्या तोंडी दिले. त्या शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी पक्ष, संघटना काढल्या त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय ठोस योजना केल्या? कोणती एखादी भक्कम संघटना उघडली? सत्ता मिळविण्यासाठीच फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर किती दिवस करायचा?ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट चित्रपटापासून ते आताच्या डिजिटल चित्रपटापर्यंत त्यांचे नाव आदराने घेतले जाते ते म्हणजे बीग बी अमिताभ बच्चन. त्यांच्या तोडीचा एकही कलाकार आजही चित्रपट व्यवसायामध्ये नाही. बीग बी त्याच दलदलीत मोठे झाले; पण त्यांनी स्वत:वर कधी चिखल उडवून घेतला नाही. आजच्या चित्रपट व्यवसायातील प्रसिद्ध कलाकार अक्षयकुमार यांनी महिलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूून भल्याभल्यांना चित्रपट सोडण्यास भाग पाडले.(सामाजिक कार्यकर्ता)

टॅग्स :Metoo Campaignमीटू