शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

त्याने-तिने लग्न केले, तर सरकारने ‘पैसे’ का द्यावेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 07:21 IST

पैशाच्या आमिषापोटी झालेले आंतरजातीय विवाह भविष्यात मोडले तर दिलेला निधी सरकार परत घेणार का ? असे विवाह हे स्वप्रेरणेने आणि स्वपुढाकारानेच व्हावेत!

आंतरजातीय विवाह करणाऱ्या पाच हजार जोडप्यांना अर्थसाहाय्य देण्यात येणार असून, या आर्थिक वर्षात राज्यासाठी आंतरजातीय विवाह उत्तेजनार्थ २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मध्यंतरी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी विशेष कायदा तसेच असा विवाह करणाऱ्या जोडप्यातील एकाला शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याची तरतूद करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे वृत्त वाचनात आले, तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाहावरून सख्ख्या भावाने बहिणीचा शिरच्छेद केल्याची घटना घडली. या हत्येत त्या मुलीची आईदेखील सामील होती. तसेच आंतरजातीय विवाह केल्यामुळे १५० दाम्पत्ये बहिष्कृत केल्याची घटना मध्यंतरी महाराष्ट्रातील एका गावात घडली.

आंतरजातीय विवाह मुख्यत्वे प्रेमविवाह असतात. प्रेम करणे हा गुन्हा नव्हे, हे अगदी आजही अनेक समाजघटक स्वीकारायला तयार नसतात. पाश्चात्य संस्कृतीच्या विकृत अंगाचे अंधानुकरण  अशीच प्रेम भावनांची आपल्याकडे संभावना केली जाते. यातही  प्रेम कोणावर करावे याचे काही अलिखित नियम वा चौकटी आपल्याच समाजाने आखून ठेवलेल्या आहेत. म्हणजे स्वजातीय - स्वधर्मीय प्रेमविवाह बहुधा विनाअडथळा, राजीखुशीने समाजमान्य होतो. अगदी वर-वधूंच्या कुटुंबीयांचा विरोध असला तरी समाजातून या विवाहास फारसा विरोध होत नाही. परंतु, प्रेमाला आंतरजातीय विशेषतः आंतरधर्मीय किनार असली की प्रेमीयुगुलांच्या वाटेत जाती-धर्माचे काटे पेरले जातात.देशात  मागील दहा वर्षांत ‘ऑनर किलिंग’ सदरात मोडणाऱ्या हत्येच्या घटनांत तब्बल २४ टक्के वाढ झाल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवालातून समोर आली आहे. 

जाती-धर्म भेद संपविण्यासाठी संतांपासून समाजसुधारकांपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले,  आपली आयुष्ये वेचली. महात्मा ज्योतिबा  फुले यांनी स्वतःच्या दत्तक मुलाचा सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह  लावून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वैयक्तिक आयुष्यात तो आचरणात आणला,  समाजातील अस्पृश्यता, जाती, धर्मभेद निर्मूलनावर महात्मा गांधी भर देत आणि फक्त  आंतरजातीय - आंतरधर्मीय विवाहासच उपस्थित राहत. जाती-धर्म भेदाचे समाजातून समूळ उच्चाटन करायचे असेल तर  आंतरजातीय - आंतरधर्मीय विवाह हा एक मार्ग आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये सांगून ठेवले आहे. आज कैक दशके लोटली तरी केंद्र सरकारच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर पाॅप्युलेशन सायन्स या संस्थेच्या अहवालानुसार देशात आंतरजातीय  विवाहाचे प्रमाण १०-१५ टक्क्यांच्या वर जाणारे नाही. 

महत्त्वाचे म्हणजे एका बाजूला सरकार  आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर / उत्तेजनार्थ अनुदान योजना जाहीर करते, तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री तसेच लोकप्रतिनिधी या अशा सामाजिक अभिसरणासाठीच्या योजनांचे यशापयश जनतेच्या सहभागावर सोडून नामानिराळे राहताना दिसतात. स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारे आणि भाषणात आंतरजातीय        - आंतरधर्मीय विवाहाचा, जाती-धर्म भेद निर्मूलनाचा पुरस्कार करणारे बोलघेवडे राजकीय पुढारी त्यांच्या मुला-मुलींचे  विवाह (अपवाद वगळता) स्वजात, स्वधर्म,  तसेच आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परस्परावलंबन बघूनच करताना दिसतात. 

वास्तविक देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली तरी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसाहाय्य  द्यावे लागत असेल, तर आपण एक समाज म्हणून कोठे चाललो आहोत याचा विचार करावा लागेल. आंतरजातीय विवाहाला अर्थसाहाय्याच्या  आमिषापोटी झालेले आंतरजातीय विवाह भविष्यात मोडले तर दिलेला शासकीय निधी सरकार परत घेणार  का? म्हणूनच आंतरजातीय विवाह हे स्वप्रेरणेने, स्वस्फूर्तीने आणि स्वपुढाकारानेच व्हावेत, तेव्हा कुठे आंतरजातीय विवाहाला एक सामाजिक अधिष्ठान प्राप्त होईल.- बाळकृष्ण शिंदे, पुणे

टॅग्स :marriageलग्न