शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

तसे न होते तर?

By admin | Published: March 25, 2016 3:23 AM

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता तर काय झाले असते? आज हिरो ठरवला गेलेला हार्दिक पंड्या किती बोगस गोलंदाज आहे, धोनीच्या नेतृत्वात कसा कस राहिलेला नाही, भारतीय क्रिकेट संघ कसा गल्ली क्रिकेट खेळण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही आणि सरतेशेवटी ‘खात्रीने सांगतो, मॅच फिक्स झाली होती हो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊन धोनीसकट त्याच्या संपूर्ण संघाची बंगळुरुबाहेर पडणारी वाट रोखली गेली असती की नाही? १८ चेंडूत २७ धावा हे सतराव्या षटकानंतरचे समीकरण अखेरच्या षटकात १२ चेंडूत ११ आणि अखेरच्या तीन चेंडूत तर अवघ्या दोन धावा इतके सोपे आणि सहजसाध्य झाले होते. मर्यादित वीस षटकांच्या विश्व करंडक सामन्यातील ‘अ’ गटात न्यूझीलंडकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभूत करुन भारत बुधवारी बांगलादेशविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नाप्पा स्टेडियममध्ये उतरला होता. आधी फलंदाजी करताना भारताचे फलंदाज तसे ढेपाळलेच. पण हा सामना कमी धावांचा राहील असे समीक्षक सांगत होते. तरीही आशियाई करंडकात पाकिस्तानला लोळवणारा बांगलादेशचा संघ लेचापेचा नसल्याचे त्याने अगोदरच दाखवून दिल्यामुळे विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य त्याच्या दृष्टीने असाध्य नव्हते. प्रत्यक्षात झालेही तसेच. सामना खरे तर त्या संघाने हाणतच आणला होता. भारतीय कर्णधार धोनी याची देहबोली त्याच्यातील अस्वस्थता दाखवून देत होती. सामना बरोबरीत सुटला तरी मिळवली अशीच प्रेक्षकांचीही प्रतिक्रिया होती. पण म्हणतात ना विजयासारखा विजयच. तरीही या सामन्याने आणि आशिया करंडकातील अंतिम सामन्याने एक बाब ठळकपणे दाखवून दिली आहे की क्रिकेटच्या मैदानावर भारत खेळतो तेव्हां आजवर केवळ पाकिस्तान समोर असतानाच ते धर्मयुद्ध होत असते आता पाकच्या जोडीला बांगलादेशदेखील धर्मयोद्धा ठरतो आहे!