शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ नाही मिळाले, तर आभाळ कोसळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 06:58 IST

ज्यांना सीईटीमध्ये कमी पर्सेंटाइल आहे, असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या प्रचंड काळजीत आहेत! त्यांच्यासमोर असलेल्या पर्यायांची यादी...

प्रा. डॉ. संदीप ताटेवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीप्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 'सामाईक प्रवेश परीक्षा’ कक्षामार्फत महाराष्ट्रात  सुरू झाली आहे व प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने पालकांची प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी), आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड डिझाईन या शाखांसाठी विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल असून, याच शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी जीवापाड प्रयत्न करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात या शाखांचा कट-ऑफ सर्वाधिक (९० पेक्षा जास्त पर्सेंटाइल) असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटायझेशनला असणारे प्राधान्य लक्षात घेता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जास्त नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण किंवा कमी गुण आहेत त्यांचे पालक  आता आपल्या मुलांचे कसे होईल? - अशा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहेत. काही पालकांनी  सीईटीचा निकाल लागण्याआधीच विनाअनुदानित महाविद्यालयात संपर्क साधून मॅनेजमेंट  कोट्यात आपला प्रवेश याच शाखेत निश्चित केल्याचे कळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण जवळपास ४४० अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयात जवळपास कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखा उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी प्रक्रियेमध्ये प्रवेशाच्या तीन फेरी होणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये आपल्या पसंतीची शाखा व महाविद्यालय मिळण्याची शक्यता बरीच वाढत जाणार आहे.  आजच्या घडीला जरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेला जास्त मागणी असली तरी भविष्यात काय स्थिती राहील याची भविष्यवाणी आज आपण करू शकत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकीच्या मूळ शाखा असून यावरच बांधकाम उद्योग, दूरसंचारण व्यवस्था, यंत्र कारखाने, विद्युत निर्मिती व संचारण या सारख्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे या शाखेतील अभियंत्यांची गरज नेहमीच भासणार आहे.लॉकडाऊन नंतर ही क्षेत्रे म्हणावी तितकी स्थिरावलेली नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरी भरतीत आज सातत्य नसल्याचे दिसून येत आहे; पण हीच परिस्थिती भविष्यात राहणार नाही.  या क्षेत्रातील अभियंत्यांना काही विशेष फायदे आहेत.  स्वत:चा व्यवसाय कमी भांडवलात व छोट्या गावात चालू करता येऊ शकतो, परदेशातच किंवा महानगरातच नोकरी अथवा व्यवसायासाठी स्थायिक होण्याची गरज नसते, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक अभियांत्रिकी परीक्षा देऊन सरळ भरतीने उच्च पदे मिळविण्याची संधीही असते. आजकाल या शाखेतील विद्यार्थ्यांनासुद्धा महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलद्वारे संगणक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. या शाखेतील विद्यार्थीसुद्धा संगणक क्षेत्रातील कमी कालावधीचे आवश्यक अभ्यासक्रम करून संगणक क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवताना दिसतात.त्यामुळे फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतच प्रवेश मिळाला नाही तर आभाळ कोसळणार आहे ही धारणा ठेवून निराश होण्यात काहीही अर्थ नाही. यावर्षी कमी पर्सेंटाईल असले तरी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व तत्सम शाखेच्या तुलनेत इतर शाखेत चांगल्या महाविद्यालयात  प्रवेश मिळणार आहे.sandiptatewar123@gmail.com

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा