शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

उपेक्षा बालकवींच्या स्मारकाची

By admin | Published: May 19, 2017 2:39 AM

अजरामर अशा निसर्ग कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घालणाऱ्या बालकवींची स्मृतिशताब्दी सुरूझालीय. या वर्षात तरी त्यांच्या जन्मगावी व मृत्युस्थळी यथायोग्य स्मारक उभे रहायला हवे.

- मिलिंद कुलकर्णी अजरामर अशा निसर्ग कवितांनी मराठी रसिकांना भुरळ घालणाऱ्या बालकवींची स्मृतिशताब्दी सुरूझालीय. या वर्षात तरी त्यांच्या जन्मगावी व मृत्युस्थळी यथायोग्य स्मारक उभे रहायला हवे. बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी सारस्वताला पडलेले एक गोड स्वप्न आहे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे... श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे... ऐल तटावर पैल तटावर, हिरवाळी लेवून.. यासारख्या अजरामर निसर्ग कवितांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या कवीच्या स्मृतिशताब्दी वर्षाला ५ मेपासून सुरुवात झाली. अभ्यासक्रमापासून तर प्रबंधापर्यंत अजूनही बालकवींच्या कवितांमधील निसर्गसौंदर्य, गूढता याचा अभ्यास नवीन पिढी करीत आहे. त्यांचे साहित्य हे खरे तर त्यांचे स्मारक आहे; परंतु जन्मगावी धरणगाव व मृत्युस्थळी भादली रेल्वे स्टेशनवर त्यांचे समर्पक असे स्मारक व्हावे, ही रसिकांची अपेक्षा मात्र फोल ठरत आहे. शासकीय लालफितीचा फटका बालकवींच्या स्मारकालाही बसला आहे.केळी, कापूस आणि कवितांचा देश म्हणजे खान्देश अशी या प्रांताची ओळख आहे. ‘काव्यरत्नावली’सारखे केवळ कवितांसाठी वाहिलेले नियतकालिक जळगावात शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध होत असे. त्याच जळगावात १९०७मध्ये कविसंमेलन झाले. त्यात १७ वर्षीय त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी उत्स्फूर्तपणे पटका सादर केला. या तरुणाची विलक्षण प्रतिभा पाहून संमेलनाचे अध्यक्ष डॉ.कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ‘बालकवी’ ही उपाधी दिली. रेव्हरंड टिळक आणि कवी विनायक यांच्या उपस्थितीत हा गौरव झाला. बालकवींनी अवघ्या २८ वर्षांच्या आयुष्यात १६३ कविता लिहिल्या. त्यापैकी ४० प्रकाशित, तर १२३ अप्रकाशित आहेत.धरणगाव येथे त्यांचा १३ आॅगस्ट १८९० ला जन्म झाला. वडील फौजदार होते. आजोळी राहिलेल्या बालकवींना कवितेची गोडी आई गोदूबाईकडून लाभली. रेव्हरंड टिळक यांच्याकडे काही काळ त्यांनी वास्तव्य केले. मिशनरी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर ते खान्देशात परतले. ५ मे १९१८ रोजी जळगावनजीकच्या भादली रेल्वे स्टेशन येथे त्यांचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात की आत्महत्या याविषयी साहित्यविश्वात तर्कवितर्क लढविले गेले. अवघ्या ११ वर्षांच्या कालखंडात विलक्षण प्रतिभेने मराठी सारस्वतात ध्रुवासारखे अढळ स्थान बालकवींनी निर्माण केले.धरणगावच्या जैन गल्लीत त्यांचा जन्म झाला. पण त्या ठिकाणी बालकवींचे स्मारक नाही. तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी हे गाव मतदारसंघात असल्याने स्मारकाचा प्रस्ताव मंजूर केला. शासकीय जागा मिळाली. तिला कुंपण घातले गेले. ४.५ कोटी रुपयांचा हा प्रस्ताव देवकरांच्या नंतर लालफितीत अडकला आहे. योगायोगाने याच मतदारसंघाचे गुलाबराव पाटील हेदेखील मंत्रिमंडळात राज्यमंत्री असल्याने स्मारकाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. भादली रेल्वे स्टेशन येथे जन्मशताब्दीनिमित्त छोटे स्मारक उभारण्यात आले. एका संगमरवरी स्तंभावर ‘निर्झरास’ ही कविता कोरण्यात आली आहे. त्यावर निर्झर आणि बालकवींचे चित्र असून, त्यावर छत उभारण्यात आले आहे. शाळकरी मुलांच्या सहली अधूनमधून या ठिकाणी येत असतात. परंतु रेल्वेमार्गाच्या विस्तारीकरणात आता हे स्मारक अडथळा ठरत असल्याने हटविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मृत्यूनंतरही एखाद्या कवीची किती अवहेलना होऊ शकते, त्याचे हे उदाहरण आहे. दिलासा देणाऱ्या गोष्टी एवढ्याच की, त्यांच्या स्मृती जपण्याचे काही प्रयत्नदेखील झाले आहेत. जैन उद्योगसमूहाने जळगावात ‘काव्यरत्नावली चौक’ सुशोभित केला असून, त्यात बालकवींची ‘श्रावणमासी’ ही कविता कोरली आहे. तसेच भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन ट्रस्टतर्फे बालकवी ठोंबरे यांच्या नावाने द्वैवार्षिक राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.भौतिकता, यांत्रिकतेच्या आहारी जाऊन आम्ही संवेदनहीन होत असल्याचे सभोवताली चित्र असताना ‘काव्य-शास्त्र-विनोदा’ने जीवन आनंदमयी बनविण्याचा मार्ग आम्ही विसरत चाललो आहे, हे खरे म्हणजे बालकवींच्या स्मारकाच्या उपेक्षेमागील कारण आहे. परदेशी साहित्यिकांच्या स्मारकाचे गोडवे गाणारे आम्ही आमच्या श्रेष्ठ साहित्यिकांविषयी मात्र उपेक्षा करण्यात आघाडीवर आहोत. स्मृतिशताब्दी वर्षात तरी ही उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा करूया.