शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रतिमा भंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 21:31 IST

काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे.

मिलींद कुलकर्णीखान्देशातील धुळे हे शहर सांस्कृतिक, साहित्यिक, पुरोगामी, औद्योगिक विकासाकडे वाटचाल करणारे शहर म्हणून लौकिकप्राप्त आहे. मु.ब.शहा, मुकुंद धाराशिवकर, पुरुषोत्तम पाटील, अनिल सोनार, कॉ.शरद पाटील, झेड.बी.पाटील, पी.डी.दलाल, डॉ.एन.के.ठाकरे यांच्यासारख्या विविध क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्ती, श्री समर्थ वाग्देवता मंदीर, राजवाडे संशोधन मंडळ, गरुड वाचनालय, जयहिंद शिक्षण संस्था, कमलाबाई विद्यालय यासारख्या अनेक संस्था, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, नर्मदा बचाव आंदोलन, अंधश्रध्दा निर्मूलन समिती या पुरोगामी चळवळींना मिळालेले जनसमर्थन हे सगळे धुळ्याचे वैभव आहे. काळाची पावले ओळखत धुळे बदलत गेले. भौगोलिक लाभ होऊन दळणवळणाचे मोठे माध्यम ठरलेले तब्बल ७ राष्टÑीय महामार्ग कार्यरत आहेत. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश असल्याने औद्योगिक क्षेत्राचे चित्र आशादायी आहे. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला मिळालेली चालना उत्साहवर्धक आहे. या आशादायी वातावरणात भूतकाळात घडलेले भास्कर वाघ प्रकरण, तेलगी प्रकरण विस्मृतीत जात असताना पुन्हा धुळ्याला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. ११ महिन्यांमध्ये खुनाच्या तब्बल ६ घटना घडल्या. पारोळा रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी हॉटेलमध्ये १५-२० लोक येऊन शस्त्रांचा बेछूट वापर करीत खून करुन पळून जातात. देवपूरसारख्या भागात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ७-८ लोक शस्त्र घेऊन बाप-बेट्याचा निर्दयी खून करतात. कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणा-या या घटना आहेत. नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेल्या विनयकुमार चौबे यांनी गेल्या महिन्यात अवैध शस्त्र आणि गुंडांविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिल्याने खान्देशात सर्वत्र मोठा शस्त्रसाठा जप्त झाला. तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. याचा अर्थ बिनबोभाटपणे अवैध व्यवसाय सुरु होते. चौबे यांनी लक्ष दिले नसते, तर ते सुरुच राहिले असते. ही मोहीम राबविल्यानंतरही खून होतो, या गुन्हयात तलवारी, कुकरी, चाकू अशा शस्त्रांचा वापर होतो. त्यातून या मोहिमेच्या यशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. जिल्हा परिषदेच्या आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणा-या ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला घरात घुसून मारहाण या घटना पोलीस दलाच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित करणाºया आहेत. वर्षाखेर होणाºया जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून तर वातावरण दूषित केले जात नाही ना, अशी शंका घेण्याला वाव आहे. सत्ताधारी आमदार मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती, महिलांना स्वसंरक्षणार्थ काठ्या वाटप करतात, त्यात सारे आले असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :DhuleधुळेCrimeगुन्हा