शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
5
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
6
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
7
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
8
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
9
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
10
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
11
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
12
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
13
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

घटनाबाह्य आरक्षण

By admin | Published: December 09, 2015 11:41 PM

कोणे एकेकाळी ‘जातीसाठी माती खाऊ’ असे म्हणणारे आणि आपल्या तथाकथित उच्चवर्णीय जातीचा वृथा अभिमान बाळगणारे समाजघटकही अलीकडच्या काळात स्वत:स मागास म्हणवून घेऊ लागले

कोणे एकेकाळी ‘जातीसाठी माती खाऊ’ असे म्हणणारे आणि आपल्या तथाकथित उच्चवर्णीय जातीचा वृथा अभिमान बाळगणारे समाजघटकही अलीकडच्या काळात स्वत:स मागास म्हणवून घेऊ लागले आहेत आणि मागासवर्गीयांसाठी असलेल्या सवलती आणि विशेषत: आरक्षणाच्या सवलतीत वाटा मागू लागले आहेत. अर्थात लोकशाहीने साऱ्यांनाच अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिलेला असल्याने त्यांच्या अशा मागणी करण्याला कोणी आक्षेप घेऊ शकत नाही व आक्षेप घेण्याचे कारणही नाही. राज्यघटनेने समाजातील मागास वर्गाची स्पष्ट विगतवारीच दिली असून जातीनिहाय मागासलेपण हा या विगतवारीचा आधार आहे. त्यामुळे राज्यघटनेत ज्या जाती वा वर्गाला आरक्षण देण्याची मुभा आहे त्यांना ते जरुर मिळेल. परंतु मूळ घटनेमध्येच मागासलेपण ठरविण्याचा निकष हा जन्मावर आधारलेला असून आर्थिक निकषाला वा विद्यमान व्यवसायाला तिथे थारा नाही. असे असताना राष्ट्रीय अन्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या यांनी तथाकथित पुढारलेल्या जातींमध्ये जन्मास आलेल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या परंतु परंपरागतरीत्या जो व्यवसाय अन्य मागास जाती करीत होत्या, तो करणाऱ्यांना अन्य मागासांच्या सवलती देण्याचे म्हणे मान्य केले आहे. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर पुढारलेल्या जातींमधील युवकांमध्ये जे नैराश्य आणि वैफल्य आले आहे त्यांना दिलासा म्हणून आपण हे करु इच्छितो असेही त्यांनी म्हटले आहे. मुळात अन्य मागासवर्गीय आयोगाला आणि त्याच्या अध्यक्षाला असा जाती विस्तार करण्याचा अधिकारच नाही. त्यातून आरक्षणासाठी आर्थिक मागासलेपण या निकषाला राज्यघटनेची मान्यता नाही. तसेच धार्मिक आधारवरदेखील आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याची मागणी मान्य केली जाऊ शकत नाही. घटनेने ज्या जातींचा मागास या श्रेणीत समावेश केला आहे त्यांनाच केवळ आरक्षण मिळू शकत असल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज व गुजरातेतील पाटीदार समाज यांची मागास वर्गात जाण्याची आणि मुळात मागास असताना त्या मागासलेपणाची श्रेणी बदलून घेण्याची (धनगर, जाट आदि) काही वर्गांची मागणी मान्य करण्यात सरकारला अडचणी येत आहेत.