शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Independence Day 2021 : अन् अमेरिकी गहू खाणारा देश बदलला!, ‘पंचवार्षिक’ अभिमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 09:08 IST

Celebrating Happy Independence Day 2021: स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला.

- नंदकिशोर पाटील

राज्यघटनेतील लोककल्याणकारी संघराज्याच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यात पंचवार्षिक योजनांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. लोकशाहीची तत्त्वे तळागाळापर्यंत रुजवायची असतील तर सर्वसामान्य माणसांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे, या नीतीवर पंचवार्षिक योजनांची आखणी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होताच. त्यामुळे जोसेफ स्टालिन यांनी सोव्हिएत युनियनमध्ये यशस्वीपणे राबविलेल्या पंचवार्षिक योजनेचे प्रारूप नेहरूंनी भारतात आणले आणि १९५१ मध्ये पहिली पंचवार्षिक योजना लागू केली.

स्वतंत्र भारताच्या विकासाची वाट कृषी क्षेत्रातून काढता येऊ शकते, यावर ते ठाम होते. म्हणूनच पहिल्या पंचवार्षिक योजनेत कृषी-औद्योगिक विकास आणि सिंचन योजनांवर भर देण्यात अला. हिराकूड, भाक्रा-नांगलसारख्या धरणांची पायाभरणी केली. कधीकाळी अमेरिकेतील गव्हावर विसंबून राहणारा देश बघताबघता अन्नधान्याच्या बाबतीत नुसता स्वयंपूर्णच नाही तर निर्यातदार देश बनला. नेहरूंची दूरदृष्टी आणि पंचवार्षिक योजनांची ही फलश्रुती आहे.

गेल्या ७४ वर्षांच्या कालखंडात आजवर बारा पंचवार्षिक योजना झाल्या. हरितक्रांती, श्वेतक्रांती, अणुऊर्जा, अण्वस्त्र निर्मिती, औद्योगिक विकास, संगणक क्रांती आणि जागतिकीकरण असे महत्त्वाचे टप्पे पार करत भारताची आज विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे.

पंचवार्षिक योजनांचे फलित काय?- भारताच्या आर्थिक विकासाची पायाभरणी- सर्वसमावेशक विकास सूत्राची अंमलबजावणी- कृषी उत्पादनात स्वयंपूर्ण- औद्योगिक विकासाला चालना- शिक्षणाचे सार्वत्रीकरण, साक्षरता वाढली- हरितक्रांती, धवलक्रांती- अवकाश संशोधनात भरारी- अण्वस्त्रांची निर्मिती- पायाभूत सुविधांचा विकास- दळणवळण सुलभ- सिंचन क्षमतेत वृद्धी- आदिवासी, मागास वर्गांचा विकास

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन