शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भारतीय दर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 4:07 AM

प्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन

- डॉ. रामचंद्र देखणेप्राचीन काळापासून भारतात दार्शनिक विचारांची परंपरा अखंडपणे वाहत आलेली असून, वेगवेगळ्या कालखंडात अनेक नवनवीन विचारांचे प्रवाह येऊन मिळाले आणि दर्शने उदयास आली. भारतीय तत्त्वज्ञानातील षड्दर्शने ही संकल्पना आपण नेहमीच वापरतो. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग्य, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही सहा दर्शने प्रसिद्ध आहेत. यांनाच (षड्दर्शने किंवा सहा शास्त्रे) असे म्हणतात.याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शनही तितक्याच आदराने स्वीकारले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात वेद आणि उपनिषदे यांचा वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाचे विविध मतप्रवाह आपापल्या विचारांचा मागोवा घेत अवतरले आणि विविध मतप्रणालीतून हे तत्त्वज्ञान अधिक विकसित झाले. काही तत्त्वे ही मूलस्वरूपी व सर्वांनी मान्य केलेली असली तरी त्यात विविधता व समृद्धी पहायला मिळते.जीवनाची विशालता, व्यापकता, खोली, संकीर्णता व अमेयता त्यामुळे लक्षात येते व जीवनसंज्ञा किती अमर्याद आणि अनंत आहे याची जाणीव होते. अशा या असीम, अनंत, विविधांगी व संकीर्ण अस्तित्वाचा बुद्धिवादी व सुसंगत रितीने अर्थ लावण्याचे जे अनेक प्रयत्न झाले तेच तत्त्वज्ञानाचे विविध दृष्टिकोन किंवा प्रणाली यांनाच दर्शने असे म्हटले गेले.ज्याच्या योगाने यथार्थतत्त्व पाहिले आणि जाणले जाते ते शास्त्र म्हणजे दर्शन होय. दर्शन हे शास्त्र आहे. आणि दर्शन ही अनुभूती आहे. मानवी जीवनात लौकिक आणि पारलौकिक तत्त्वांची अनुभूती येते आणि त्यातून यथार्थ ज्ञान होते. त्या अर्थाने ‘तत्त्वज्ञानसाधनं शास्त्रम्’ तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधक असे शास्त्र म्हणजे दर्शन होय.सर्व दर्शने ही आत्मज्ञानासाठीच प्रवृत्त झालेली आहेत. ‘आत्मानं विद्धी’ म्हणजे आत्म्याला जाणणे हेच दर्शनाचे खरे प्रयोजन आहे. आत्म्याचे ज्ञान व्हायला हवे असेल तर सर्व अनात्म पदार्थापासून आत्म्याला वेगळे करणे आवश्यक ठरते. त्यालाच आत्मानात्वविवेक असे म्हणतात. भारतीय दर्शनांनी बुद्धिवादाचा अवलंब करून हा आत्मानात्मविवेक देणारी दृष्टी दिली.विश्व, परमात्मा, लोकजीवन या सर्वांकडे पाहण्याची दृष्टी देणारे शास्त्र दर्शनांनी उभे राहिले. युक्ती, तर्क आणि ज्ञानी पुरुषांची अपरोक्ष अनुभूती यांच्या आधारावर सर्व दर्शनांची उभारणी झालेली आहे.उपनिषदे आणि त्यातील सिद्धांताची चिंतने विविधांगाने होऊ लागली आणि त्यातूनच दर्शनांची सूत्रे निर्माण झाली आणि ही सूत्रे त्या त्या दर्शनांचे मूळ रूप मांडू लागली. ही सारी दर्शने कोणत्यातरी अज्ञेयाला उभे करून विवेचन करत नाहीत तर ज्ञेयाला जीवनसृष्टीत आणून मानवी जीवनाला आनंदाचा मार्ग दाखविण्यासाठी दर्शने सिद्ध झाली. आणि अध्यात्मशास्त्र सूत्रात मांडले गेले.