शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नाणारकरिता एक डाव भुतांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:04 IST

पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात.

संदीप प्रधान|

अमावस्येची रात्र होती... कीर्र अंधार काजळासारखा कोपऱ्याकोपºयांत ठासून भरला होता... कौलारू घरं भेदरलेल्या मांजरासारखी चिडीचूप निपचित पडली होती... घरांच्या पडवीतील एकाकी बल्ब मांजराच्या डोळ्यासारखा अंधारात लुकलुकत होता... त्या बल्बभोवती सैरभैर चिलटं जीवाच्या आकांतानं घोंघावत होती... कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज शांततेच्या चिंध्या करत होता... गावाच्या वेशीवरील अवाढव्य पिंपळ अक्राळविक्राळ भासत होता... त्याच्या पानांची सळसळ हृदयात कापरं भरवणारी होती... पिंपळावर कोकणातील भुताखेतांची मीटिंग बोलावली होती. समंध आणि मुंजा फांद्यांना लटकून गिरक्या घेत असतात. हडळ झाडाखाली बसून केसांतील उवा नखानं ठेचून मारत असते. जखिण मानेला आळोखेपिळोखे देत स्वत:शी बोलत व हसत असते. खविस आपलं डोकं झाडाच्या अजस्र बुंध्यावर आपटून घेत असतो. तेवढ्यात, वेताळ तिथं येतो. सारी भुतं वेताळाभोवती गोळा होतात. वेताळ घसा खाकरतो. आताच मंत्रालयातून आलो. नाणार प्रकल्प जाणार, या वल्गना आहेत. कालच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला आपण सारेच होतो. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केल्यावर हा मुंजा कोलांटउड्या मारत या पिंपळावरून त्या पिंपळावर बागडला. तेव्हाच मी म्हटलं की, माझा यावर विश्वास नाही. लागलीच मी मंत्रालयाकडं जाणारी एसटी पकडली. नाणार प्रकल्प उभा करण्याकरिता हा पिंपळ पाडला जाणार, येथील रस्ते रुंद होणार, दिवाबत्ती होणार, अहोरात्र वर्दळ वाढणार... मग, समंध कसा कुणाला त्रस्त करणार, मुंजा विहिरीपाशी पाणी काढायला येणाºयांना कसा घाबरवून सोडणार आणि हडळ सुवासिनींच्या पोटात गोळा कशी उठवणार... ते काही नाही, नाणार प्रकल्प येणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी. वेताळाच्या निर्धारावर भुतांनी अचकटविचकट अंगविक्षेप करत जल्लोष केला. आपण विरोध करायचा म्हणजे करायचे तरी काय? देवचार आणि गिºहा यांनी एका सुरात प्रश्न केला. वेताळ म्हणाला की, गुजरातहून कुणी मोदी, शहा जमिनीचे व्यवहार करायला आले, तर घरातील बाया, बाप्ये यांच्या शरीरात लागलीच प्रवेश करायचा आणि खेळ सुरू करायचा. खविस तू गावातील खाटकाची पाठ सोडू नको. कुणी जमीनखरेदीला आला, तर चॉपर घेऊन त्याच्या पाठी लाग. झोटिंगा, तू गावातील सारंगाच्या शिडात हवा भर. देवचारा, तू आपल्या गावातील गंगू नाभिकाचा वस्तरा ताब्यात घे. वेताळानं प्रत्येकावर जबाबदारी सोपवली. तेवढ्यात, म्हसोबा पुढं आला आणि म्हणाला की, वेताळा ही काय आपली कामं आहेत का? मग, ते खळ्ळ-खट्याकवाले काय करणार? शिवाय, स्वाभिमानची पोरं राडे घालायला उतावीळ आहेतच. वर्षभरावर निवडणुका आल्यामुळं हे धूमशान सुरू झालंय. निवडणुका होऊ दे. नंतर सारं आपसूक शांत होईल. म्हसोबा समजावणीच्या सुरात बोलला. मागं जैतापूरवरून रान उठलं, तेव्हा आपण हवालदिल झालो होतो. आता कुणी त्याचं नाव पण काढत नाही. तेवढ्यात, झाडाखाली हालचाल दिसली. कुणीतरी मुंडी कापलेलं कोंबडं आणून झाडाखाली भिरकावून धूम ठोकली. सारी भुतं मेजवानीवर तुटून पडली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्प