शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

IPL 2020: ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’; मुंबई इंडियन्सचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 06:56 IST

मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे.

- द्वारकानाथ संझगिरी

मुंबई इंडियन्सने अपेक्षेप्रमाणे पाचव्यांदा आयपीएल जिंकली. दिल्लीने तेजस्वी यादव व्हावं अशी किमान अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. मुंबई संघ जिंकला नसता तर मला प्रचंड धक्का बसला असता. कंगना शहाण्यासारखी बोलल्यावर बसेल तसा. या स्पर्धेतला तो सर्वोत्कृष्ट संघ होता. ‘आयपीएल मेरी मुठ्ठी में’ म्हणावं इतकी त्याची यंदाची हैसीयत होती. चांगल्या संघाचा कस हा कठीण परिस्थितीतच लागतो. मुंबई संघ तेल लावलेल्या पहिलवानासारखा वारंवार कठीण परिस्थितीतून निसटला.

मुंबईचा संघ हा अकराव्या मजल्यावर टेरेस फ्लॅटचा रहिवासी होता तर दिल्लीचा संघ हा सातव्या मजल्यावरचा. मधले सगळे मजले रिकामे होते. मुंबईच्या या उंचीचं कारण हा अत्यंत समतोल होता. आयपीएलमध्ये संघ कसा असावा, याचं मूर्तिमंत उदाहरण ! आधी फलंदाजी- रोहित, डीकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, पोलार्ड, कुणाल पंड्या आणि कुल्टरनाइल. यातला प्रत्येक फलंदाज अत्यंत हुकमीपणे मोठे फटके खेळू शकतो. रोहित, सूर्यकुमार, किशन, डीकॉक यांची फलंदाजी सुसंस्कृतपणाच्या साजूक तुपात घोळलेली आहे. त्यांना टी-२०चे कपडे फिट बसतात, ही त्यांची गुणवत्ता आहे.

हार्दिक पंड्या, पोलार्ड हे  षटकार ठोकतात तेव्हा ते मला घटोत्कच वाटतात. ते मायावी युद्ध तर खेळत नाहीयेत ना, अशी शंका येते.  शेवटच्या तीन षटकांत वगैरे ५०, ६० धावा घेणं हे त्यांच्यासाठी कधीकधी हातचा मळ आहे, असं वाटतं. त्यापेक्षा  त्यांना ताडगोळा सोलणं जास्त कठीण जाईल. मुंबईच्या गोलंदाजीत प्रचंड असं वैविध्य आहे. डावखुरा आणि उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज, लेग स्पिनर, ऑफ स्पिनर, मध्यमगती असे सगळ्या प्रकारचे गोलंदाज मुंबई संघात आहेत.  त्यात  मुंबईला दिल्लीने बोल्ट दिला.  एखादा संघ आपल्याला नको असलेला खेळाडू दुसऱ्या संघाला विकू शकतो. त्यावर मालक पैसे कमावतात.  दिल्लीने  बोल्टला घटस्फोट दिला. मुंबईने लग्न केलं. या बोल्टने मुंबईला वारंवार जिंकून दिलं.  आखातातल्या वातावरणात त्याने धमाल उडवून दिली. मुंबई संघ बोल्टवरच गुजराण करतो असं नाही. त्यांच्याकडे चक्क बुमराह आहे. म्हणजे द्रौपदीची थाळीच. विकेट हवीय?- ही घे. इतकं सोपं काम असतं त्याचं. त्याची चार षटकं कशीही वाटा, त्याचं ताट विकेटने भरलेलं असायचं. अंतिम सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाताना त्याला दृष्ट लागू नये म्हणून नियतीने  लावलेली तीट असावी ही. रोहित शर्मा हा चांगला कर्णधार आहे.

मुंबई त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा जिंकली यातच प्रशस्तिपत्र लिहिलेलं आहे. तो मैदानावर शो ऑफ करत नाही. पण गरज पडेल तेव्हा आक्रमक क्षेत्ररचना, गोलंदाजीमधला एखादा अफलातून बदल यातून आपलं नेतृत्व दाखवतो. आयपीएलच्या फायनलमध्ये रोहितने आपण फिट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याने फॉर्मात यायलासुद्धा अंतिम सामन्याचा मुहूर्त गाठला. रोहितला निवड समिती आणि विराटला दाखवून द्यायचं होतं की तो फिट तर आहेच, शिवाय धावा अजूनही त्याच्या बॅटवर प्रेम करतात. पहिल्याच षटकामध्ये त्याने अश्विनला पुढे सरसावत सरळ षटकार ठोकला.

योग्यवेळी ज्वालामुखी जागा झाला. रोहितला असा सूर लागला की तो बाद होईपर्यंत एकदाही बेसूर झाला नाही. गंमत म्हणजे फिरकी गोलंदाजांना  काही वेळेला तो फॉरवर्ड डिफेन्सिव शॉट्स खेळला. कदाचित आपला फॉरवर्ड बचाव हा आपण विसरलेलो नाही ना? याची त्याला खात्री करून घ्यायची असावी ! पण ज्याक्षणी त्याला हवेत चेंडू किंचित जास्त वेळ दिसला त्यावेळेला पुढे सरसावत त्याने थेट षटकार चढवले. अंतिम सामन्यात मुंबई कधीच अडचणीत नव्हती. तो बाद झाल्यावर तर नव्हतीच नव्हती. जी गोष्ट रोहितला जमली, ती आयआयपीएलमध्ये विराटला नाही जमली. किमान टी-२० आणि वनडेत, रोहितने नेतृत्वासाठी आव्हान उभं केलंय का?...नको, उगीच आगीत तेल कशाला टाकूया?

टॅग्स :IPL 2020IPL 2020Mumbai Indiansमुंबई इंडियन्स