शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सिंचन घोटाळ्याचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:59 IST

८० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास खरंच गांभीर्याने सुरू आहे का, की राजकीय दबावतंत्राचा तो भाग आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना वारंवार भेडसावत असतो.

८० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास खरंच गांभीर्याने सुरू आहे का, की राजकीय दबावतंत्राचा तो भाग आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना वारंवार भेडसावत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना या घोटाळ्यावरून तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला धारेवर धरायचे. विधिमंडळाच्या याच हिवाळी अधिवेशनात ते या घोटाळ्याचे बैलबंडीभर पुरावेही घेऊन गेले होते. भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लागेल आणि खरे गुन्हेगार गजाआड होतील, असा विश्वास सा-यांनाच होता. सुरुवातीच्या काळात या घोटाळ्याच्या कारवाईची दिशा योग्य मार्गानेच होती. पण, नंतर मात्र राजकीय कुरघोडीचा भाग म्हणून सरकारच्या कारवाईकडे बघितले जात आहे. जनमंच या स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यामुळे आणि न्यायालयात वेळोवेळी या घोटाळ्याची सुनावणी होत असल्यामुळे सरकारवर काही प्रमाणात अंकुश तरी आहे, अन्यथा आतापर्यंत हा घोटाळा निकालात निघून सर्व आरोपी निर्दोषही सुटले असते. भाजपाशी युती करून शिवसेना राज्यात सत्तेवर आली असली तरी या पक्षाच्या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे फडणवीसांना संकटकाळात राकाँची मदत लागू शकते. त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या राकाँ नेत्यांना दुखवायचे कसे, हाही प्रश्न फडणवीस सरकारपुढे असतो. परवा काँग्रेस-राकाँचा हल्लाबोल मोर्चा विधिमंडळावर धडकल्यानंतर लगेच काही अधिकाºयांवर गुन्हे दाखल झाले. मोर्चात आक्रमक असलेले नेते अचानक बॅकफूटवर गेले. साधारणत: असे विशाल मोर्चे निघाले की त्याची तीव्रता कायम ठेवण्यासाठी आंदोलनकर्ते, नेते अधिक आक्रमक होत असतात. इथे नेमके उलटे झाले. राकाँचे नेते दुसºया दिवसापासून अचानक शांत झाले. त्यांच्या मौनाचे रहस्य सिंचन घोटाळ्याच्या गुन्ह्यात दडलेले तर नाही ना, अशी शंका येते. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा मतितार्थ असा की, सरकारला राजकीय गुन्हेगार पकडायचे नाहीत. अधिका-यांवर कारवाई करून हे प्रकरण थंड करायचे आहे आणि या प्रकरणाचा जमेल तेवढा राजकीय लाभही उठवायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कितीही प्रामाणिक इच्छा असेल पण तरीही ते या घोटाळ्यातील राजकीय नेत्यांवर कारवाई करायला पुढे धजावणार नाहीत. त्यांची ही हतबलता वेळोवेळी दिसून येत असते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस