शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

संगणक शिक्षण घेणे आवश्यकच आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 9:10 AM

2025 सालपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरच्या वरती नेण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पण, हे लक्ष्य पूर्ण करत असताना आपली अवस्था शंकूसारखी झाली आहे. 

2025 सालपर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलरच्या वरती नेण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे. पण, हे लक्ष्य पूर्ण करत असताना आपली अवस्था शंकूसारखी झाली आहे. अनय जोगळेकर, माहिती - तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक भारत हा विरोधाभासांचा देश आहे. कोणत्याही क्षेत्रात दोन टोकांची परिस्थिती राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि कधी कधी घरांमध्येही दिसून येते. आयटी म्हणजे केवळ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी नसून इंडियाज टुमॉरो असल्याचे प्रतिपादन अटल बिहारी वाजपेयींनी केले होते. २१व्या शतकात प्रवेश करत असताना भारत आयटी क्षेत्रातील उदयोन्मुख महासत्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानंतरच्या दोन दशकांमध्ये भारतीय लोक जागतिक आयटी कंपन्यांचे नेतृत्त्व करताना दिसू लागले. देशाच्या निर्यातीतील सेवा क्षेत्राचा आणि त्यातही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा आहे.  

सन २०२०-२१ मध्ये सांख्यिकी मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत १५ ते २९ वयोगटातील सुमारे ११ लाख तरुणांच्या माहिती तंत्रज्ञानासाठी आवश्यक मूलभूत कौशल्यांबाबत केले गेलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. संगणकावर कॉपी पेस्ट करणे, फाइल एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे, संगणकावर एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करणे अशी सामान्य कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची संख्या एक तृतीयांशाहून कमी आहे. संगणकीय कोडिंगसारखी तुलनेने अवघड कौशल्ये आत्मसात असणाऱ्यांची टक्केवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी आहे. यातही देशाच्या दक्षिण आणि उत्तर भागातील आणि शहरी तसेच ग्रामीण युवक यांच्यातील दरी खूप मोठी आहे.

एकीकडे अमेरिकेतील परदेशात जन्म झालेल्या लोकांनी स्थापन केलेल्या युनिकॉर्न कंपन्यांमध्ये भारतीय पहिल्या क्रमांकावर असताना एवढी साधी कौशल्ये शालेय पातळीवर आपण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवण्यात असफल ठरत असू तर हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे अपयश आहे. हे सर्वेक्षण कोविड १९ च्या काळात केले गेले होते, जेव्हा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी किमान एक शालेय वर्ष डिजिटल पद्धतीने शिकण्यात घालवले. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका सेवा क्षेत्रापुरता मर्यादित राहिला नसून, चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ड्रोनचा वापर वाढत आहे. अशा वेळेस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

या क्षेत्रात मूरचा नियम लागू पडतो. म्हणजेच दोन वर्षांच्या काळात तंत्रज्ञान दुप्पट वेगाने पुढे जात असताना किमती निम्म्याने कमी होतात. त्यामुळे या सुविधा उभारताना काळाच्या पुढे दोन पावले राहिले नाही तर अनेक पांढरे हत्ती तयार केले जाण्याची भीती आहे. असे असले तरी या सर्वेक्षणात तयार केलेल्या प्रश्नावलीबद्दलही शंका उपस्थित करण्यास वाव आहे. आज देशामध्ये स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ८० कोटींच्या वर गेली असून, गेल्या वर्षी भारतीयांनी युपीआयद्वारे ८३ अब्ज व्यवहार केले. आज भारत स्मार्टफोन निर्मिती आणि निर्यातीच्या बाबतील जगातील आघाडीचा देश आहे. म्हणजेच संगणकीय कौशल्ये बेताची असणारे अनेक लोक आज मोबाइलद्वारे पैशांचे व्यवहार करत आहेत, यु-ट्यूबचा वापर करून अनेक गोष्टी कशा करायच्या, हे स्वतःच स्वतःला शिकवत आहेत आणि इ-रिटेल प्लॅटफॉर्मचा वापर करून खरेदी-विक्रीही करत आहेत.

आज ग्राफिक डिझाइनपासून व्हिडीओ एडिटिंगपर्यंत अनेक कौशल्ये संगणकावर माउसने कॉपी पेस्ट किंवा फाइल ट्रान्स्फर न करता केवळ दोन बोटांच्या सहाय्याने आपल्या स्मार्टफोनवर प्रभावीपणे वापरणे शक्य झाले आहे. की-बोर्डची जागा व्हाइस टायपिंगने घेतली आहे. आजही २१व्या शतकाच्या सुरुवातीला महत्त्वाची मानली गेलेली संगणकीय कौशल्ये तितकीच आवश्यक आहेत का? का निशाणी डावा अंगठा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणाकडे बघण्याचा आणि त्यात मोबाइल तंत्रज्ञानाच्या विकासानुरूप बदल करण्यात एक व्यवस्था म्हणून आपण अपयशी ठरलो आहोत?