शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

त्याचा अर्थ तोच की

By admin | Published: January 12, 2016 2:59 AM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही राजकारण्यांप्रमाणेच ‘आपण तसे बोललोच नाही वा आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला’, असा खुलासा करण्याची वेळ यावी म्हणजे फारच झाले. भारत आणि पाकिस्तानच्या परारष्ट्र सचिवांच्या पातळीवरील चर्चा येत्या शुक्रवारी होऊ घातली आहे. जर पठाणकोट हवाई तळावर घातपाती हल्ला झाला नसता आणि त्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भक्कम पुरावे भारत सरकारच्या हाती लागले नसते तर काही प्रश्न नव्हता. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चर्चा झालीच असती. पण हा हल्ला झाला आणि सारी समीकरणे बदलून गेली. पण एक झाले, याआधी चर्चेपूर्वी असा काही हल्ला झाला की तत्काळ चर्चेचा कार्यक्रम भारताकरवी एकतर्फी रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले जात असे, यावेळी तसे झाले नाही. पाकी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतातर्फे सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करण्याचे मान्य केले आणि अमेरिकेनेही पाकवर तसे दडपण आणले. भारताने केवळ इतकेच म्हटले की जे काही करायचे ते पंधरा तारखेपूर्वी करा. अजित डोवाल याना एका प्रसार माध्यमाने याच विषयावर छेडले असता ते म्हणाले की, ‘पाकिस्तानने कारवाई केली तरच आम्ही चर्चा करु’. त्यावर संबंधित माध्यमाने या विधानाचा श्लेष काढताना डोवाल यांनी चर्चा रद्द झाल्याचे जाहीर केले असे म्हटले. त्यावरतीच आचा डोवाल यांनी खुलासा करताना आधी तर आपण असे काही म्हटलेलेच नाही असे विधान केले आणि नंतर तर मुलाखतच दिल्याचे नाकारले. मुळात जे विधान केल्याचे डोवाल आजही नाकारीत नाहीत त्या विधानातच ‘जर तर’ची भाषा आहे. कारवाई केली तरच चर्चा करु असे म्हटले जाते तेव्हां कारवाई केली नाही तर चर्चा नाही असाच त्याचा सरळ अर्थ होतो. मुंबईवरील हल्ल्यासंबंधी सारे पुरावे दिले त्याला आठ वर्षे होत आली असताना अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नसताना केवळ आठवडाभरात पाकिस्तान काय कारवाई करणार आणि त्यातून भारताचे कसे समाधान होणार या वास्तवदर्शी तर्काच्या आधारे व खुद्द डोवाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चर्चा रद्द केली जाणे हेच वास्तव उरते. पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा एक सनदी किंवा गणवेशधारी नोकरशहा असतो. तो निर्णयकर्त्यांना सल्ला देतो किंवा देऊ शकतो पण स्वत: निर्णयकर्ता असत नाही. परिणामी माध्यमांपासून ‘समान दूरी’ हेच तत्त्व त्यांच्यासाठी योग्य ठरते. त्याला मुरड बसली व खुलासे करीत बसण्याची वेळ आली.