शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जयशंकर, गुहा, लिफ्टन, ट्रम्प आणि बुद्ध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 19:43 IST

सरदार हे ‘भारतीय लोकशाहीचे स्तंभ’ असल्याचे नेहरूंनीच नमूद केले असून हे माउंटबॅटन यांच्या सल्ल्यावरून असू शकत नाही, हे स्पष्टच आहे.

- डॉ. मुकुल पै रायतुरकर नारायणी बसू यांनी माजी सनदी अधिकारी, संविधानविषयक सल्लागार व भारताच्या फाळणीच्या वेळी प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे राजकीय सुधारणा आयुक्त व्ही. पी. मेनन यांच्यावर लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच देशाचे परराष्ट्रमंत्री  एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. या पुस्तकातील कही संदर्भ वापरून जयशंकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अशी प्रतिक्रिया दिली की पंडित जवाहरलाल नेहरूंना आपल्या पहिल्या मत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेलांचा समावेश करण्याची इच्छा नव्हती; लॉर्ड माउंटबॅटन यांनी आग्रह केल्यामुळेच पटेलांचा समावेश नेहरूंनी मंत्रिमंडळात केला.

या ट्विटची दखल तात्काळ घेतली ती इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी. परराष्ट्र मंत्र्यांनी खोटय़ा बातम्यांचा प्रसार करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. माजी मंत्री जयराम रमेश आणि शशी थरूर यांनीही सक्षम ऐतिहासिक वस्तुस्थिती आणि तारीखवार पत्रव्यवहाराचे पुरावे देत नेहरूंनी स्वेच्छेनेच सरदारांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते, हे सिद्ध करून दाखवले. सरदार हे ‘भारतीय लोकशाहीचे स्तंभ’ असल्याचे नेहरूंनीच नमूद केले असून हे माउंटबॅटन यांच्या सल्ल्यावरून असू शकत नाही, हे स्पष्टच आहे. मात्र, फ्रँक मोराईश यांनी लिहिलेल्या ‘विटनेस टू एन इरा’ या पुस्तकातील मजकूर जयशंकर यांचे प्रतिपादन खरे असल्याचे सांगतो.

इथे सत्य काहीही असले तरी सगळे प्रयत्न चालले आहेत ते भूतकाळावर नियंत्रण मिळवण्यासाठी भूतकाळावर स्वामित्व मिळवत वस्तुस्थितीलाही आपल्या कलाने करून घ्यायचे आणि अशा प्रकारे भविष्यालाही आपल्याला अनुकूल करायचे, यासाठीच. वस्तुस्थितीवर कब्जा करायची अशा प्रकारची धडपड तेव्हाच सुरू होते जेव्हा वैचारिक एकाधिकारशाहीच्या सन्मुख आपण येत असतो. बहुतेक वेळा वैचारिक एकाधिकारशाहीचे समर्थक आपणच केवळ सत्याचे प्रवर्तक असल्याच्या थाटात एखादे स्वत:भोवती फिरणारे सत्य ‘पिकवतात’ आणि जनतेला सादर करतात. वैचारिक वा राजकीय एकाधिकारवाद ही मानसिक शिकार साधण्यासाठीची पूर्वतयारी असते, असे डॉ. रॉबर्ट जेय लिफ्टन सांगतात.

अमेरिकी वायुदलासाठी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाण-या लिफ्टन यांनी चिनी विचार प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास केला होता. मनोनियंत्रणावरल्या संशोधकाचे पितृत्व त्यांच्याकडे जाते. ‘लुजिंग रियालिटी’ या आपल्या पुस्तकात डॉ. लिफ्टन म्हणतात, ‘मानसिक शिकार करू पाहाणारे केवळ व्यक्तींच्या मनांना जमेस धरत नसतात तर वास्तवावरही कब्जा करण्याची त्यांची धडपड असते.’आपल्याला हवी तशी सत्यनिर्मिती करणा-यांचे उदाहरण म्हणून डॉ. लिफ्टन यांनी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उदाहरण दिलेले आहे.

डॉ. लिफ्टन असेही म्हणतात की ‘वैचारिक एकाधिकारवाद आणि पंथांशी साधर्म्य असलेले वर्तन केवळ एकमेकांत बेमालूम मिसळणारेच नव्हे तर दोन्ही एकाच अस्तित्वाचे भाग आहेत.’ आजचे जग जलदगतीने धावत सुटले आहे. अशा परिस्थितीत आपल्या समाजात वावरणा-या व मानसिक शिकार करण्यास टपलेल्या घटकांनी निर्मिलेल्या पर्यायी सत्याला आपण बळी पडू नये आणि वास्तवाचे आपले भान सुटू नये, यासाठी एखाद्याने कशी ज्ञानप्राप्ती करावी? कसे काय सतर्क राहावे?

शेवटी, गौतम बुद्धानेच तर सांगितले आहे की सत्याला मिथ्यापासून वेगळे करण्याची क्षमता लाभणे म्हणजेच आत्मज्ञानाची प्राप्ती होणे. जे कल्पित आहे त्याचा कल्पित म्हणूनच स्वीकार करणे आणि जे सत्य आहे ते तसेच स्वीकारणे, हाच तर एखाद्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्याचा संकेत. सजग राहणे, भवतालाचे भान ठेवणे, शास्त्रीय चिकित्सेला अभिप्रेत असलेली चौकस बुद्धी वापरून संशोधनाच्या, तपासाच्या साधनाचा समग्र वापर करणे, हाच मला तरी यावरला उतारा वाटतो. तसे केले तरच आपण भोवतालच्या शिकारी वृत्तीपासून आपल्या जाणिवांचा बचाव समर्थपणे करू शकू. 

टॅग्स :Twitterट्विटर