शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

आदिमायेचा जागर

By admin | Published: October 08, 2016 4:00 AM

नवरात्रात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात आपल्या पूर्ण देशात उत्साहाने पूजिले जाते.

विश्वाचे चलन वलन चालवणारी, डोळ्यांना न दिसणारी, पण कार्यरूपाने प्रकटणारी, अशा शक्तीला देवीचे, मूळमायेचे, आदिमायेचे रूप देऊन नवरात्रात, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात आपल्या पूर्ण देशात उत्साहाने पूजिले जाते. अग्नी आणि त्याची दाहक शक्ती जशी एकरूप असते तसेच परब्रह्म आणि प्रकृती (शक्ती) एकरूपच असतात. देवी भागवत, देवी उपनिषद, देवी पुराण, मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजेच दुर्गासप्तशती यातून समाजाच्या सर्व स्तरांसाठी देवीपूजा सांगितली आहे. देवी महात्म्यात तर म्हटले आहे की जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या साऱ्यात देवीचेच रूप आहे. अग्निवर्णा, तप:तेजाने आणि सूर्यशक्तीने तेजस्वी दिसणारी, कर्मफळ देणारी असे ऋग्वेदातील श्रीसूक्तात तिचे वर्णन आहे.भगवान नारायणांनी गणेशजननी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, सावित्री, राधा या पाच देवींचा प्रकृती म्हणून नारदांना परिचय करून दिला आहे. शक्तीप्रकृतीच्या उल्लेखानेच देवी भागवत सुरू होते. महालक्ष्मी, दुर्गा, जगदंबा, सरस्वती, सावित्री, गायत्री, रेणुका, अंबा, शारदा ही सारी या देवीचीच भिन्न नावे व रूपे आहेत. विश्वातील मातृरूप चैतन्यशक्ती समान रूपात सर्वत्र असते. त्यामुळे स्त्री पुरुष भक्तांकडून समानतेची, अभेदाची अपेक्षा केली जाते. विश्वातील सर्व जीव ही तिची मुले आहेत. हीच तिची मूल्यवान संपत्ती आहे. सर्व जीवांमधील स्पंदनांची उत्पत्ती या आदिमायेमुळेच होत असते.शारदा हे या देवीचेच वाणीरूप. रामदासस्वामींनी शारदास्तवनासाठी दासबोधात एक स्वतंत्र समास लिहिला आहे. ज्ञानदेवांनी ‘अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी’ म्हणून तिला वंदन केले आहे. शंकराचार्यांनी तिच्यावर स्तोत्र लिहिले आहे. या शब्दशक्तीत विश्वाचे प्राण आहेत आणि या प्राणशक्तीविना सारे विश्व मृतवत् होईल, याची जाण या साऱ्यांना आहे. साऱ्या विद्या, कला, प्रतिभा, कल्पना आणि बुद्धी ही तिचीच रूपे आहेत. त्यामुळे अमृतानुभवात ‘बाप उपेगी वस्तू शब्दू’ असे म्हटले आहे. ‘शब्दचि आमुच्या जिवीचे साधन’ असे संत तुकाराम मोठ्या गौरवाने म्हणतात. प्रत्येक शरीरातील आत्मा जसा त्या असीम परमतत्त्वाचा एक भाग तसेच घटातील आकाश त्या असीम, अमर्याद आकाशाचा अंश. पिढ्यान् पिढ्या जीवांचे जतन करणारी ही सृजनशक्ती, तिच्या गौरवासाठी गरबा. विश्वव्यवहार, विश्वगती अविरत चालू ठेवणारी ही शक्ती आपण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली म्हणून पूजितो. पाणी, वायू, सूर्य, पृथ्वी साऱ्यांना गतिशील ठेवणाऱ्या देवतेला, सर्व स्तरातून ‘कीर्ति: श्री:, वाक्, स्मृतिर्मेधा, धृति: क्षमा’ (गीता १०.३४) हे स्त्रीतले सुप्त गुण जागवण्यासाठी (जागरता), आदिमायेकडे मागितलेला हा जोगवा आहे.-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे