शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते...

By विजय दर्डा | Updated: February 27, 2023 08:46 IST

लाहोरमधल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी आपल्या खास झोंबणाऱ्या शैलीत पाकिस्तानला आरसा दाखवला, हे उत्तमच झाले!

- विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

जिधर जाते हैं सब, जाना उधर अच्छा नहीं लगता मुझे,पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता,ग़लत बातों को ख़ामोशी से सुनना, हामी भर लेना,बहुत हैं फ़ायदे इसमें मगर अच्छा नहीं लगता...- सुप्रसिद्ध गीतकार, शायर आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांचा हा शेर त्यांना स्वत:लाच सर्वाधिक लागू पडतो. पाकिस्तानात जाऊन  झोंबणाऱ्या शैलीत ते खुलेआम खरे ते बोलले, ते त्यांचे व्यक्तिमत्त्वच आहे. बऱ्याच वर्षांपासून त्यांची आणि माझी मैत्री आहे, त्या हक्काने मी सांगतो, कितीही कडवे असू दे, खरे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगायला जावेदभाई मागेपुढे पाहात नाहीत. सुप्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  लाहोरमध्ये आयोजित केलेल्या सातव्या फैज महोत्सवात एका प्रेक्षकाने जावेदभाईंना  म्हटले ‘हिंदुस्थानात जाऊन सांगा, पाकिस्तान मित्र आहे, तो प्रेम करणारा देश आहे.’

त्यांच्याजागी दुसरा कुणी असता तर प्रसंग साजरा करायचा म्हणून सहज म्हणाला असता, ‘जी जरूर’.. पण विचारणाऱ्याच्या मनातला हेतू बरोबर ओळखून जावेदभाई म्हणाले, ‘एकतर आपण दोघांनी एकमेकांवर दोषारोप करू नयेत. वातावरण निवळले पाहिजे, हे तर खरेच! आम्ही  मुंबईत राहातो. आमच्या शहरावर झालेला दहशतवादी हल्ला आम्ही पाहिला आहे. हल्ला करणारे नॉर्वे किंवा तुर्कस्थानातून आलेले नव्हते. ते लोक  इथे पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत...’

जावेद अख्तर इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, ‘हिंदुस्थानने तर नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांचे जोरदार स्वागत केले; पण पाकिस्तानने लताजींना कधी प्रेमाने बोलावले नाही...’

- खरेतर, ही प्रत्येकच भारतीयाच्या मनातली भावना होय! दक्षिण आशिया एडिटर्स फोरमचा अध्यक्ष या नात्याने आणि संसदीय प्रतिनिधी मंडळात सहभागी होऊन पाकिस्तानात अनेकदा जाण्याची संधी मला मिळाली.  एकदा माझ्याबरोबर अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पंजाब केसरीचे तत्कालीन संपादक अश्विनीकुमार चोपडाही होते. अशाच एका भेटीत पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख परवेज मुशर्रफ यांना मी विचारले होते; ‘आपण कधीच लताजींना का नाही बोलावले? मेहंदी हसन, गुलाम अली, साबरी बंधू, नुसरत फतेह अली खान किंवा अबिदा परवीन; या सगळ्यांचा हिंदुस्थानात भरपूर सन्मान झाला.’ 

- ‘लताजींचा कार्यक्रम करावा इतके मोठे मैदान आमच्याकडे नाही’, असे सांगून परवेज मुशर्रफ यांनी उत्तर देण्याचे टाळले होते.एका लाहोर दौऱ्याच्या वेळी तेथील पत्रकारांनी मला विचारले होते, दोन्ही देश एकदमच स्वतंत्र झाले. दोघांत फरक काय आहे?मी म्हणालो, ‘आमच्याकडे गांधीजी आहेत, आपल्याकडे नाहीत. आमच्याकडे वृत्तपत्रे स्वतंत्र आहेत, आपल्याकडे वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमचा कोणीही नेता आपले घर भरण्यासाठी अन्य कुणाच्या हातचे बाहुले बनून आपल्या देशाची विक्री करत नाही!’

पाकिस्तानी जनता भले भारताशी मैत्रीच्या गोष्टी करत असेल; पण तेथील राज्यकर्त्यांची संपूर्ण दुकानदारी भारत विरोधावरच चालते. भारत विरोधाची ही मात्रा जनतेला चाटवणे बंद केले गेले, तर त्या भुकेल्या देशात विद्रोह उसळेल. आज तिथे पिठासाठी रांगा लागत असून सगळीकडे हाहाकार माजला आहे. भारताने पाकिस्तानला मदत केली पाहिजे, असे सगळे जण म्हणत असले तरी  बिलावल यांच्यासारख्या बालीश राजकारण करणाऱ्या नेत्यांनी भारताविरुद्ध आग ओकणे थांबवलेले नाही. असे असताना मैत्रीच्या पोकळ गप्पांचा काय उपयोग?

जावेदभाई पाकिस्तानमधून बाहेर पडताच तिथले एक अभिनेते, निर्माते इजाज असलम यांनी ट्वीट केले, ‘जावेद अख्तर यांच्या मनात जर इतकी घृणा आहे तर त्यांनी इथे यायलाच नको होते. तरीही उपकार माना, आम्ही त्यांना इथून सुरक्षितपणे जाऊ दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, असे त्यांना वाटत असेल तर ते आमच्या देशात आलेच का?’ 

- आपल्या घरी आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत  बोलताना ही अशी भाषा? या उद्धटपणामुळेच पाकिस्तान आज संकटात सापडला आहे. फैज महोत्सवामध्ये कुणा अज्ञात प्रेक्षकाचा हवाला देऊन सूत्रसंचालकाने जावेदभाईंना विचारले, ‘शबाना आजमी यांच्याशी आपली मैत्री जास्त आहे की प्रेम?’

जावेदभाई सहज म्हणाले, ‘ज्यामध्ये मैत्री नाही, ते प्रेम कसले? आणि ज्यात सन्मान, आदर नाही ती मैत्री तरी खरी कशी?’ - पुढे ते हसून म्हणाले, ‘हमारी दोस्ती इतनी अच्छी, की शादी भी कुछ ना बिगाड पायी! एकमेकांबद्दल काही वाटत नसेल, आत्मसन्मान सांभाळला जात नसेल तर दोन माणसे कधीही आनंदी राहू शकत नाहीत. वर्षानुवर्षे दोघांतला एक नाखुश राहिला आहे. तेव्हा हे खरे, की वाईट सवय लागली आहे. बहुत तकलीफ होगी, लेकिन सुधर जाइए!’  

रीतिरिवाजांच्या बहाण्याने घराच्या चार भिंतीत कैद करून ठेवले जाते, स्त्रियांना केवळ उपभोगाची वस्तू मानले जाते; या अस्वस्थ वास्तवावर त्यांनी नेमके बोट ठेवले. ते म्हणाले, ‘ये  दुनिया इन्सानोंका क्लब है, किसीके पास भी इसकी स्थायी सदस्यता नही है। पहिल्यांदा इथे आलेल्या माणसांनी जे घडवले त्याचा फायदा आपल्याला मिळतो आहे. किमान जे परंपरेने मिळाले, ते तरी नष्ट करू नका!’जावेदभाई, वसुधैव कुटुंबकम् हे जीवनाचे सूत्र असलेल्या  एखाद्या भारतीय माणसाकडेच विचारांची अशी विशालता असू शकते. तरीही लोक आपल्यावर हल्ला करायला टपलेले असतात, याचे वाईट वाटते! तुम्हीच लिहिले आहे ना...पंछी नदियां पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके,सरहदें इन्सानों के लिये है, सोचो तुमने और मैने क्या पाया इन्सां होके...

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPakistanपाकिस्तान